एक्स्प्लोर

राज्यातील सत्तेच्या खेळात शेतकरी मात्र वाऱ्यावर, हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली, विरोधकांकडून सरकारवर ताशेरे

Maharashtra Rain Updates : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन जवळपास 25 दिवस उलटले आहेत. मात्र जुलैमधील पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

Maharashtra Rain Updates : राज्यात गेल्या महिन्याभरापासून सत्तेचा खेळ सुरु आहे. बंडखोरी, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, कोण गद्दार, कोण निष्ठावान, कुणाला कोणतं निवडणूक चिन्ह अशा राजकारणात मात्र राज्यातला शेतकरी वाऱ्यावर पडला आहे. राज्यभरात पावसानं धुमशान घातलं आहे. अनेक गावा-खेड्यांमध्ये पूरस्थिती उद्भवली असून खेड्यापाड्यांचा संपर्क तुटला आहे. एवढंच नाहीतर मुसळधार पावसानं (Maharashtra Rain) बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. 

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन जवळपास 25 दिवस उलटले आहेत. मात्र जुलैमधील पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जुलैमध्ये झालेल्या पावसात राज्यातील आठ लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, कापूस, धान आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे. नांदेड जिल्ह्यांत सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका बसला असून तेथील 2 लाख 97 हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, फळपिकांचं नुकसान झालं आहे. विदर्भात जवळपास अडीच लाख हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली आहेत. वर्धा, नागपूर, गडचिरोलीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानाचे पंचनामे कधी होणार, मायबाप सरकार मदत कधी करणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 


राज्यातील सत्तेच्या खेळात शेतकरी मात्र वाऱ्यावर, हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली, विरोधकांकडून सरकारवर ताशेरे

...तर लोकप्रतिनिधींना शेतकरी रस्त्यावर फिरु देणार नाही : रविकांत तुपकर 

लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50 हजाराची मदत जाहीर करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. तसेच, बळीराजाला राग आला तर लोकप्रतिनिधींना शेतकरी रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. 

शिंदे सरकारनं राज्य वाऱ्यावर सोडलंय : एकनाथ खडसे 

राज्यातल्या शेतकऱ्यांच्या स्थितीवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. शिंदे सरकारनं राज्य वाऱ्यावर सोडलं अशी खडसेंनी टीका केली आहे. सध्या राज्यात जनता अडचणीत असताना सरकारकडून मदतीची अपेक्षा असते, मात्र लोकप्रतिनिधी नसल्यानं सरकारनं राज्य प्रशासनाच्या हवाली करून जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याची टीका राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर केली आहे. सध्या राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसानं पूर परिस्थिती निर्माण होऊन नुकसान झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत, अशा वेळी सरकारनं जनतेला तातडीनं मदत जाहीर करणं अपेक्षित असते. मात्र राज्यात सध्या मंत्री मंडल अस्तित्वात नसल्याने सरकारने सर्व काही प्रशासनाच्या हाती हवाला केले आहे,प्रशासन काम करीत असले तरी ते एका चौकटीत राहून काम करीत असतात,राज्य अडचणीत असताना लोकप्रतिनिधी नसल्याने सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले असल्याचं चित्र राज्यात सध्या पाहायला मिळत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकार वर केली आहे. 

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून सातत्यानं टीकांची तोफ डागली जात आहे. नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा प्रश्न सातत्यानं सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येत आहे. एकीकडे राज्यात पावसानं धुमशान घातलं असून अद्याप राज्याला कृषीमंत्री, मदत आणि पुनर्वसन मंत्री राज्यात नाही. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती असून अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसानं हिरावून घेतला आहे. पूरग्रस्त भागांचे पंचनामे होणार असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. मात्र ही मदत कधी मिळणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget