एक्स्प्लोर

Nashik Sambhajiraje : किती दिवस मोर्चे, आंदोलन करायचे, मिशन 2024 फिक्स; संभाजीराजेंनी मांडली भूमिका

Nashik Sambhajiraje : स्वराज्याची ताकद वाढवून महाराष्ट्रात नाव करायचंय, किती दिवस मोर्चे आणि आंदोलन करायचे, असा सवाल संभाजी राजेंनी उपस्थित केला आहे.

Nashik Sambhajiraje : स्वराज्याची ताकद वाढवून महाराष्ट्रात नाव करायचंय, किती दिवस मोर्चे आणि आंदोलन करायचे, सामान्य माणसाला ताकद देणं महत्वाचे आहे. त्यामुळे स्वराज्य हे निश्चित राजकारणात येईल आणि 2024 निश्चितच स्वराज्य लढवेल, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chatrapati) यांनी मांडली आहे. 

नाशिकमध्ये (Nashik) संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आज ते नाशिकमध्ये असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले की, स्वराज्य संघटना 2024 च्या निवडणुकीत (Mission 2024) 100 टक्के राजकारणात उतरेल. 2024 हे निश्चित ध्येय असणार असून महाराष्ट्रात जे काही मोठे पक्ष असतील त्यांना आमचा विरोध नसणार आहे.  2024 च्या निवडणुकांसाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत, असं म्हणत संघटने विषयीची भविष्यातल्या निवडणुकांविषयीची भूमिका संभाजीराजेंनी मांडली. 

ते पुढे म्हणाले की, स्वराज्यांनी राजकारणात यावं यासाठी लोकांच्या अपेक्षा आहेत. सामान्य माणूस राजकारणात यायला हवा. पैशांचा प्रभाव आणि घराणेशाही असली की तोच राजकारणात यायला पाहिजे, असं थोडं चालतं. त्यामुळे जनसामान्य माणूस हा राजकारणात येण्यासाठी स्वराज्य हा पर्याय उभा केला आहे. स्वराज्य हे राजकारणात येणार आहे, मात्र अजून कुठले इलेक्शन लढणार हे निश्चित केले नाही. मात्र 2024 हे मिशन निश्चित झाले असून 2024 हे महत्त्वाचं टार्गेट आहे. स्वराज्य कडून महाराष्ट्रातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे स्वराज्य मैदानात उतरत आहे, त्यामुळे जनता आता ठरवेल. त्याचबरोबर स्वराज्याची ताकद वाढवून महाराष्ट्रात नाव करायचंय, किती दिवस मोर्चे आणि आंदोलन करायचे, सामान्य माणसाला ताकद देणं महत्वाचे आहे, असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. 

भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप मिशन 200 ची घोषणा केली. यावर त्यांना विचारले असता संभाजी राजे म्हणाले कि, ते मोठे लोकं आहे..मी त्याविषयी काही बोलू इच्छित नाही..मात्र सामान्य लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहे. आम्हाला स्पेस आहे की नाही, हे जनता ठरवेल. त्याचबरोबर स्वराज्य संघटना सर्वांसाठी खुली राहणार असून स्वराज्यसाठी राजकारणातील सर्व पर्याय खुले आहे. स्वराज्य हे एका जातीसाठी नाही, सर्वच अठरा पगड जातीसाठी उघडे असल्याने सामान्य माणूस आमदार, खासदार व्हायला हवा, याच अपेक्षेतून स्वराज्य 2024 ची  निवडणूक लढवेल, स्वराज्यचे उमेदवार दिसतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

नाशिकच्या लोकांचं माझ्यावर प्रेम... 

नाशिकच्या लोकांचं माझ्यावर खूप प्रेम असून नाशिककरांचे मनापासून आभार, कोल्हापूर सोडून माझा वाढदिवस इतर कुठे साजरा केला नव्हता. मात्र कार्यकर्त्यांची भावना होती की, नाशिकमध्ये वाढदिवस साजरा व्हावा आणि म्हणूनच काल वाढदिवस साजरा झाला. जेवढे प्रेम मला कोल्हापूरकर देतात, तेवढे प्रेम नाशिककरांनी दिलं, मन भरून आलं, त्यामुळे मी नेहमीच नाशिकला येत असतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania vs Dhananjay Munde : अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंवर आरोपांची सरबत्तीTop 100 | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 04 Feb 2025 ABP MajhaAnjali Damania VS Dhananjay Munde : कोट्यवधींचा घोटाळा, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्याABP Majha Headlines : 05 PM : 04 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊद्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला
लाडक्या बहीण योजनेतील 'त्या' बहिणींकडून पैसे परत घेण्याचा उपदव्याप नको, छगन भुजबळांचा सरकारला सल्ला
Varsha Bungalow: वर्षा बंगल्यात काळी जादू, रेड्यांची पुरलेली शिंगं; संजय राऊतांचा स्फोटक दावा
वर्षा बंगल्यावर खड्डा खणून बळी दिलेल्या रेड्यांची शिंगं का पुरली? संजय राऊतांचा धक्कादायक दावा
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
राज्याच्या कॅबिनेट बैठकीत 3 महत्वाचे निर्णय; पुणे अन् सातारा जिल्ह्याला थेट लाभ, अभय योजनेसही मुदतवाढ
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
अकोल्यातील 50 महिलांनी सोडला लाडकी बहीण योजनेचा लाभ; आता बँकेत पैसे येणार नाहीत
Embed widget