एक्स्प्लोर

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी राजभवनातच सुरक्षित, संजय राऊत म्हणाले...

विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नेमणुकीचा मुद्दा सहा महिने उलटल्यानंतरही प्रलंबित आहे. 12 आमदारांची यादी राजभवनातच सुरक्षित असल्याची माहिती राजभवनातील सूत्रांनी दिली आहे.

मुंबई : राजभवनातून गायब झालेल्या 12 नावांची यादी अखेर सापडली आहे. गेल्यावर्षी मंत्री अनिल परब, अमित देशमुख आणि नवाब मलिक यांनी दिलेली 12 आमदारांची यादी राजभवनातच सुरक्षित असल्याची माहिती राजभवनातील सूत्रांनी दिली आहे. सहा महिने उलटून गेले तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 12 आमदारांची नियुक्ती केलेली नाही. हे प्रकरण आता न्यायालयातही आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे ही यादी मागितली तेव्हा ती उपलब्ध नसल्याचं उत्तर सचिवालयानं कळवलं होतं. ही फाईल भुतांनी पळवल्याची टीका सामना अग्रलेखातूनही काल करण्यात आली होती. माहिती अधिकारात ज्या अधिकाऱ्याकडे ही माहिती मागवली त्या अधिकाऱ्यांकडे ती फाईल उपलब्ध नव्हती. त्यांनी फाईल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली होती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारात ही माहिती उपलब्ध करून दिली नाही, असं राजभवनातील सूत्रांनी सांगितलं आहे. 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात बोलताना फाईल मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत बोलताना म्हणाले की, "फाईल मिळाली याचा आनंद आहे. पण त्या फाईलवर राज्यपाल ज्यावेळी सही करतील त्यावेळी संपूर्ण राजभवनात आम्ही पेढे वाटू. फाईल मिळाली म्हणजेच, ती भूतांनी पळवलेली नाही. भूतं असतील तर ती त्यांच्या आसपास असतील. प्रश्न एवढाच आहे, जो हायकोर्टानंही विचारला आहे की, याप्रकरणी अद्याप निर्णय का होत नाही? ती पाईल काय बोफर्सची फाईल आहे, की राफेलची आहे? कसली फाईल आहे? ती फाईल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं एकमतानं मंजूर करुन 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी सुचवलेल्या नावांची ती फाईल आहे. त्या फाईलवर जर इतक्या दिवसांत जर निर्णय होत नसेल तर महाराष्ट्राच्या गतीमान प्रशासनाच्या परंपरेला ते शोभेस नाही. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी ती गतिमानता त्यांच्या कामात जर दाखवली, तर नक्कीच महाराष्ट्राची परंपरा गतिमान होईल."

पाहा व्हिडीओ : राज्यपालनियुक्त आमदारांसाठी दिलेल्या 12 नावांची यादी अखेर सापडली

राज्यपाल नियुक्त सदस्यांची फाईल कोणत्या भुतांनी पळवली?, सामनातून केला होता खोचक सवाल

विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नेमणुकीचा मुद्दा सहा महिने उलटल्यानंतरही प्रलंबित आहे. असं असताना राज्यपाल सचिवालयात याबाबतची यादी उपलब्ध नसल्याची माहिती राजभवनानं माहिती अधिकारात केलेल्या अर्जावर दिली होती.  ही बाब समोर आल्यानंतर यावरून शिवसेनेनं सामनातून राज्यपालांवर निशाणा साधला होता. हा भूताटकीचा प्रकार असून राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी भुतांनी पळवल्याची टीका सामनातून करण्यात आली होती. तसेच गतिमान प्रशासनाच्या व्याख्येत महाराष्ट्राचे राजभवन बसत नाही काय? असा प्रश्नही सामनातून उपस्थित करण्यात आला होता. 

"महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे. त्यात भूत, प्रेत, देव, देवस्कीला थारा नाही. तरीही मुख्यमंत्र्यांनी पाठवलेली एक महत्त्वाची फाईल सहा महिने सापडत नाही. आता ती गायब झाली. हे कसले लक्षण म्हणायचे? आता तर मुंबई हायकोर्टानेच राज्यपालांना विचारले आहे, 'साहेब, त्या फाईलचे काय झाले?' त्यामुळे फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा राज्यपालांनाच करावा लागेल.", असं म्हणत सामना अग्रलेखातून राज्यपलांवर टीकास्त्र डागण्यात आलं होतं. तसेच भारतीय जनता पक्षाच्या महामंडलेश्वरांनी ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे, असं म्हणत भाजपलाही टोला लगावला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget