एक्स्प्लोर

राज्यासमोरचा मोठा प्रश्न, 'अनलाॅक की लाॅकडाऊन?'

एकीकडे वाढती रुग्णसंख्या आणि दुसरीकडे अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे स्थानिक पातळीवर अनेक भागांमध्ये पुन्हा पुन्हा लाॅकडाऊनचे प्रयोग सुरू झालेत. या प्रयोगामुळे पुन्हा एकदा व्यापाऱ्यांचे अर्थकारण बिघडू लागले आहे. रोजगारांवर गदा आली आहे. उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. राज्यासमोर लाॅकडाऊन की अनलॉक असा प्रश्न उभा राहिला आहे.

उस्मानाबाद : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. काल दिवसभरात सात हजार नव्या रुग्णांची भर पडली. एकीकडे वाढती रुग्णसंख्या आणि दुसरीकडे अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे स्थानिक पातळीवर अनेक भागांमध्ये पुन्हा पुन्हा लाॅकडाऊनचे प्रयोग सुरू झालेत. या प्रयोगामुळे पुन्हा एकदा व्यापाऱ्यांचे अर्थकारण बिघडू लागले आहे. रोजगारांवर गदा आली आहे. उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. राज्यासमोर लाॅकडाऊन की अनलॉक असा प्रश्न उभा राहिला आहे. कोरोनाचा सामना सर्वांनी एकत्र येऊन करायला हवा याबद्दल मतभेद असू शकत नाही. पण कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी लाॅकडाऊन हा पर्याय कसा? याबद्दल सगळ्यांच्याच मनात प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. पुर्वीच्या लाॅकडाऊन काळाचा उपयोग करून घेऊन आरोग्य व्यवस्था सुधारणे हाच एकमेव पर्याय होता. आजही तोच पर्याय आहे. परंतु तो पर्याय टाळून महाराष्ट्रात सर्वत्र पुन्हा एकदा लाॅकडाऊन सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांचा आर्थिक गाडा पुन्हा एकदा रूतू लागला आहे. उत्पादनही सुरू होईना आणि व्यापारी होईना याचा शेवट राज्य सरकारवरच परिणाम होणार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे माजी अध्यक्ष राम भोगले यांच्या मते पहिले 72 दिवसाचे लॉकडाऊन झाले तेव्हा सरकारने योग्य त्या आरोग्यव्यवस्था उपाययोजना करायला हव्या होत्या. सरकारला तेव्हाच कळले होते की हजारो लोक पॉझिटिव्ह निघतील. पण प्रशासनाने त्याप्रमाणे विलगीकरण केंद्र निर्माण केली नाहीत. त्यामुळे आता कोरोनाची भीती दाखवून पुन्हा लाॅकडाऊन करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. सरकार आणि प्रशासन आपले अपयश झाकण्यासाठी पुन्हा पुन्हा लाॅक डाऊन करत आहेत. उस्मानाबादच्या व्यापार महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांना ‘मास्क, पीपीई कीट पासून वेंटिलेटर पर्यंत सर्व आरोग्य सुविधा हळूहळू उपलब्ध झाल्यात. तरीही सरकार आणि प्रशासन लॉकडाउनच्या का मागे लागलं आहे’ असा प्रश्न पडला आहे. लाॅकडाऊनमुळे देश कोरोना मुक्त होणार असेल तर त्यास स्थानिक व्यापाऱ्यांची तयारी आहे. सरकार आणि प्रशासनाने लाॅकडाऊनमुळे देश कोरोना मुक्त होण्याची हमी द्यावी. संजय मंत्री यांच्या मते लाॅकडाऊन मुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेल. सामाजिक प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे लाॅक डाऊन न करता नियमांचं पालन करण्यावर सर्वांनी भर द्यायला हवा. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत रेल्वे उपलब्ध नाही. हॉटेल, रेस्टॉरंट, कारखाने, बांधकाम व्यवसाय, दुकाने धंदे बंद आहेत. परप्रांतीय कामगार गावी गेले आहेत. स्थानिक कामगारांना जाण्यावर निर्बंध आले आहेत. अनेक वस्तूंच्या मागणीत प्रचंड घट आहे. नवे उत्पादन होत नसल्याने उत्पादन ठप्प आहे. अनलाॅकनंतर काही व्यवसाय जूनमध्ये पूर्वपदावर आले होते. पण लाॅकडाऊन वाढविल्यामुळे पुन्हा व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे वीज बिल कामगारांचा पगार दुकानाचे भाडे तर द्यावेच लागेल नियोजनबद्ध पद्धतीने लॉकडाऊन राहून ही दुकाने चालू ठेवावीत असे मत व्यापारी व्यक्त करत आहेत. दुसरीकडे राज्य सरकार समोरचा प्रश्न गहन होत चालला आहे. राज्यातली कोरोना रूग्णांची संख्या दोन लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. काल एकाच दिवशी सात हजाराहून अधिक रूग्ण संख्या आढळून आली. त्यामुळे हवालदिल झालेल्या प्रशासनाने पुन्हा लाॅकडाऊन सुरु केले आहे. अनेक शहर आणि जिल्ह्यात रोज नवे रुग्ण आढळत असल्याने लाॅकडाऊन, संचारबंदी आणि इतर निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाली आहे. संसर्ग वाढू नये यासाठी सरकारतर्फे ही पावले उचलली जात असली तरी यामुळे राज्याचे अर्थकारण अधिकाधिक बिघडत चाललं आहे. या निर्बंधांमुळे उद्योग सुरू करण्यात अडचणी येत आहेत. लोकांच्या रोजगारावर गदा आली आहेत. दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊन असतानाही संसर्ग थांबू शकलो नाही तर आता चार दिवस, सात दिवस, दहा दिवस संचारबंदी आणि निर्बंध यामुळे रुग्ण वाढ थांबेल का? असा प्रश्न कामगारांपासून व्यावसायिकांपर्यंत सगळे जण विचारत आहेत.

मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Amol Khune On Manoj Jarange: कोणी रसद पुरवली? कोणी पैसे दिले? हजारो कोटीची प्रॉपर्टी जमवली; शिष्टमंडळाच्या हातापाय पडला...; मनोज जरांगेंच्या जुन्या सहकाऱ्याने सगळंच काढलं
कोणी रसद पुरवली? कोणी पैसे दिले? हजारो कोटीची प्रॉपर्टी जमवली; शिष्टमंडळाच्या हातापाय पडला...; मनोज जरांगेंच्या जुन्या सहकाऱ्याने सगळंच काढलं
Sanjay Lakhe Patil On Manoj Jarange: ‘लीलावतीमध्ये जरांगेंचा मुलगा ॲडमिट झाला, त्याच ठिकाणी कट शिजला, एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी दिली’; डॉ. संजय लाखे पाटलांचा सनसनाटी आरोप
‘लीलावतीमध्ये जरांगेंचा मुलगा ॲडमिट झाला, त्याच ठिकाणी कट शिजला, एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी दिली’; डॉ. संजय लाखे पाटलांचा सनसनाटी आरोप

व्हिडीओ

Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Eknath Shinde Mobile: एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
Pune Crime News: लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
Embed widget