![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Corona Cases : राज्यात शुक्रवारी 10, 458 रुग्णांना डिस्चार्ज, 8,992 रुग्णांची भर; 36 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही
राज्यात आज 200 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.03 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही
![Maharashtra Corona Cases : राज्यात शुक्रवारी 10, 458 रुग्णांना डिस्चार्ज, 8,992 रुग्णांची भर; 36 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही maharashtra corona cases patients 10458discharged-today 8992 new cases in the state today Maharashtra Corona Cases : राज्यात शुक्रवारी 10, 458 रुग्णांना डिस्चार्ज, 8,992 रुग्णांची भर; 36 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/04/bd8aa7344496fe24029819cd30ac11ac_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. अशात आज 8,992 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 10 हजार 458 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 440 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.08 टक्के आहे.
राज्यात आज 200 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.03 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 12 हजार 231 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यवतमाळ (23), हिंगोली (86), गोंदिया (80) या तीन जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16,636 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मालेगाव, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 1170 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,35,65,119 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,40, 968 (14.01 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,27,243 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,756 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 600 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 600 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 566 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,00,974 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 7,731 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 892 दिवसांवर गेला आहे.
देशात काल 43,393 नव्या रुग्णांची भर
देशात काल 43,393 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 911 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 44,291 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्या आधी गुरुवारी 45,892 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर 817 बाधितांचा मृत्यू झाला होता. तसेच 44,291 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)