एक्स्प्लोर

Ratan Tata: रतन टाटांना महाराष्ट्र सरकारची अनोखी सलामी, 'भारतरत्न'साठी शिंदे सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला!

Ratan Tata: आज ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला.

मुंबई- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर राज्यात आज (गुरुवारी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर आज ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला आहे.

या शोकप्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हादेखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही श्री. टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत श्री. टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे.

टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू होते. टाटा समुहाचे अध्यक्ष म्हणून आणि नंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून या समुहाचा कारभार अनेक वर्ष पाहिला. देशातल्या सर्वात जुन्या अशा टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून अतिशय परोपकारी वृत्तीने त्यांनी काम पाहिलं.

टाटा यांनी नैतिक मूल्यांची जी जपणूक केली, ती इतर उद्योजकांसाठी आणि उद्योगविश्वातील भावी पिढ्यांसाठीही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरतील. ते तत्त्वनिष्ठ कर्मयोगी होते. स्वातंत्र्यानंतर देशाची पुन्हा उभारणीत टाटा समूहाचा वाटा सिंहाचा होता. या समूहाच्या माध्यमातून रतन टाटा यांनी भारताचा झेंडा जागतिक पातळीवर दिमाखाने फडकता ठेवला. मोटारीपासून मिठापर्यंत आणि कंप्युटरपासून कॉफी-चहापर्यंत असंख्य उत्पादनांशी टाटा हे नाव अभिमानाने जोडले जाते. शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातही रतन टाटा यांनी आपले अनन्यसाधारण योगदान दिले. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा स्मरणात राहणार आहे. कोविड काळात रतन टाटा यांनी पीएम रिलीफ फंडाला तत्काळ 1500 कोटी रुपये दिले. तसेच कोविड काळात रुग्णांसाठी त्यांची बहुतांश हॉटेलही उपलब्ध करून दिली. हा त्यांचा मोठेपणा कायम लक्षात राहणारा आहे.

नवनिर्मिती आणि दानशूरता यांचा अपूर्व संगम त्यांच्या ठायी होता. त्यांनी कधीही आपल्या 'टाटा मूल्यां' शी तडजोड केली नाही. तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात तरुणांच्या कौशल्याला वाव आणि रोजगाराची संधी देण्यासाठी त्यांनी इनोव्हेशन सेंटर सुरू केलं. महाराष्ट्र सरकारचा पहिला 'उद्योग रत्न' हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनाचा महाराष्ट्राला सदैव झाला. रतन टाटा यांच्या निधनाने आपला देश आणि महाराष्ट्राचेही कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. टाटा समूहाच्या विशाल परिवाराच्या दुःखात मंत्रिमंडळ सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो, ही प्रार्थना. देशाच्या या महान सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने राज्य मंत्रिमंडळ भावपूर्ण श्रद्धांजली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पीडब्ल्यूडीकडून सील! सामान रस्त्यावर फेकल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
दिल्लीत थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पीडब्ल्यूडीकडून सील! सामान रस्त्यावर फेकल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
Ratan Tata death: टेल्कोमध्ये नोकरीला असणाऱ्या सुधा मूर्तींनी 'ती' गोष्ट मागितली, रतन टाटांनी क्षणभराचा विचार न करता हवं ते देऊन टाकलं
माझ्या आयुष्यातील ध्रुवतारा लुप्त झाला! रतन टाटांच्या निधनानंतर सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा
15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश, जरांगे संतापले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का?
15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश, जरांगे संतापले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का?
Pune Porsche case : पुण्यातील धनिकपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून सोडणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाचे दोन सदस्य बडतर्फ
पुण्यातील धनिकपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून सोडणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाचे दोन सदस्य बडतर्फ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah pays tributes Ratan Tata : अमित शाहांनी घेतलं रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनRatan Tata Funeral Superfast News : रतन टाटा अंत्यविधी : 10 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 10 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaRatan Tata Passed Away : उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीत थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पीडब्ल्यूडीकडून सील! सामान रस्त्यावर फेकल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
दिल्लीत थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान पीडब्ल्यूडीकडून सील! सामान रस्त्यावर फेकल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप
Ratan Tata death: टेल्कोमध्ये नोकरीला असणाऱ्या सुधा मूर्तींनी 'ती' गोष्ट मागितली, रतन टाटांनी क्षणभराचा विचार न करता हवं ते देऊन टाकलं
माझ्या आयुष्यातील ध्रुवतारा लुप्त झाला! रतन टाटांच्या निधनानंतर सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा
15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश, जरांगे संतापले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का?
15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश, जरांगे संतापले; आता महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का?
Pune Porsche case : पुण्यातील धनिकपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून सोडणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाचे दोन सदस्य बडतर्फ
पुण्यातील धनिकपुत्राला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून सोडणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाचे दोन सदस्य बडतर्फ
Faqir Chand Kohli Father Of Indian IT Industry : जन्म पाकिस्तानचा, शिकला सुद्धा पाकिस्तानात; पण भारताच्या IT क्रांतीचा जनक झाला! टाटांच्या 'TCS'चा रिअल हिरो माहीत आहे का?
जन्म पाकिस्तानचा, शिकला सुद्धा पाकिस्तानात; पण भारताच्या IT क्रांतीचा जनक झाला! टाटांच्या 'TCS'चा रिअल हिरो माहीत आहे का?
Gold Silver Rate : दसऱ्याच्या तोंडावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव
दसऱ्याच्या तोंडावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या सोन्याचा आजचा भाव
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय; नॉन क्रिमिलयरची मर्यादा 8 वरुन 15 लाख
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की
Embed widget