एक्स्प्लोर

लॉकडाऊनमुळे बारा बलुतेदारांवर उपासमारीची वेळ तर नाभिक समाजाचा सरकारला इशारा 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात पंधरा दिवसांची संचारबंदी जाहीर केली त्याचवेळी गरीबांसाठी काही मदत पॅकेजही जाहीर केलं. मात्र सरकारच्या मदतीपासून काही हातावर पोट असणारा घटक मात्र अजूनही वंचित आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेची नाडी समजल्या जाणाऱ्या बारा बलुतेदारांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. 

नांदेड: काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात पंधरा दिवसांची संचारबंदी जाहीर केली त्याचवेळी गरीबांसाठी काही मदत पॅकेजही जाहीर केलं. मात्र सरकारच्या मदतीपासून काही हातावर पोट असणारा घटक मात्र अजूनही वंचित आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा पाश्वभूमीवर सरकारने लॉकडाउनची घोषणा केलीय. परंतु या सततच्या लॉकडाऊनमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेची नाडी समजल्या जाणाऱ्या बारा बलुतेदारांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. 

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेची चाके ही साळी, कोळी, चांभार, माळी, कुंभार, सुतार, वडार अशा बारा बलुतेदारांवर चालतात. परंतु या सततच्या लॉकडाऊनमुळे ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची चाके सध्या रुतून बसली आहेत. या बारा बलुतेदारांची सरकार दरबारी कोणतीही नोंद नसल्यामुळे यांच्या माध्यमातून होणारी आर्थिक उलढालीची कुठेही नोंद होत नाही. परंतु कोरोनाच्या या दुष्टचक्राचा मोठा परिणाम या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील कणा समजल्या जाणाऱ्या या बारा बलुतेदारांवर झाला आहे. 

या बारा बलुतेदारांपैकी एक असणाऱ्या चर्मकार व्यावसायिकांवर सध्या उपासमारीची वेळ ओढवली आहे. लॉकडाऊन अगोदर मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ, सण, उत्सवासाठी बूट, चप्पल यासह इतर चामड्याच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होऊनआर्थिक उलाढाल होत असे.त सेच यांच्याकडून बनवण्यात येणाऱ्या विविध चामड्याच्या बूट, चप्पल यांची बाहेर राज्यात निर्यात होत असे. पण लॉकडाऊनमुळे ही निर्यात बंद होऊन लाखों रुपयांचा माल घरात धूळखात पडून आहे. 

तसेच वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारने लग्नसमारंभ, सण उत्सवावर निर्बंध घातले. त्यामुळे खरेदी विक्री बंद होऊन यांची आर्थिक घडी आता विस्कटलीय. सण ,उत्सव, लग्नसमारंभाच्या वेळेस ग्रामीण व शहरी भागात यांच्याकडून मोठी आर्थिक उलाढाल होते.  परंतु त्यावर ही सरकारने बंदी घातल्यामुळे आता केलेला खर्च, किराया, लाईट बिल यासह पोट भरणे देखील आता अवघड झाले असल्याचं बारा बलुतेदार बांधव सांगत आहेत.  
 
नाभिक समाजाचा सरकारला इशारा

आमच्यासाठी दोन दिवसात पॅकेज जाहीर करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा महाराष्ट्रातील नाभिक समाजाने दिलाय. आज कोल्हापुरातील नाभिक समाजाने एबीपी माझाकडे ही भूमिका मांडली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये नाभिक समाजाचा विचार केला नाही. त्यामुळे नियम घालून द्या, त्यानुसार दुकानं चालू ठेवतो अशी विनंती करण्यात आलीय. जर सरकारने आमचा विचार केला नाही तर हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येईल, असंही नाभिक समाजाने बोलून दाखवलं आहे.

पूजा साहित्य विक्रेते, फुल विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ
राज्यभरात आज रात्री पासून लॉकडाऊन सुरु होणार असल्याने गोदा काठावर असणारे पूजा साहित्य विक्रेते, फुल विक्रेते यांची दुकानंही बंद होणार असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.  सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केलीय, त्यामुळे लॉकडाऊन लागू न करता सरकारने निर्बंध कडक करावे अन्यथा दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी व्यावसायिक करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE Updates: राज्यभरात पावसाचं धुमशान, नाशिकमध्ये हायअलर्ट, तर वसई-विरारमध्ये अतिवृष्टी, मुंबई-पुण्याची परिस्थिती काय?
Maharashtra Rain LIVE Updates: राज्यभरात पावसाचं धुमशान, नाशिकमध्ये हायअलर्ट, तर वसई-विरारमध्ये अतिवृष्टी, मुंबई-पुण्याची परिस्थिती काय?
Nashik Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget