एक्स्प्लोर

Konkan Rain | रत्नागिरी, सिंधुदुर्गात जनजीवन अद्यापही विस्कळीत; भाजीपाल्याचा तुटवडा, तर अनेक रस्ते बंद

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात अद्यापही पाऊस कायम आहे, परिणामी जिल्ह्यात दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर सिंधुदुर्गातील अनेक रस्ते बंद असून काही गावांशी संपर्क तुटला आहे.

रत्नागिरी/सिंधुदुर्ग : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचं पाणी अद्याप ओसरलेलं नाही. त्यामुळे जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात अद्यापही पाऊस कायम आहे, परिणामी जिल्ह्यात दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर सिंधुदुर्गातील अनेक रस्ते बंद असून काही गावांशी संपर्क तुटला आहे. रत्नागिरी पाऊस अपडेट कोल्हापूर-रत्नागिरी आंबा घाटात महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरु सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आंबाघाटातील रस्ता मधोमध खचला असून दोन दिवस वाहतूक बंद होती. जिल्ह्यात होणारा दुधाचा आणि भाज्यांचा तुटवडा पाहून आज घाटातून एकेरी वाहतूक सुरु केली. चिपळूण-खेड पावसाचा जोर कमी, नद्यांचं पाणी ओसरायला सुरुवात मुंबई-गोवा महामार्गावरील खेड आणि चिपळूण याठिकाणच्या जगबुडी आणि वाशिष्टी या नद्यांच्या पाण्याची पातळी कमी झाली असून तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तर महामार्गावरील संगमेश्वर बावनदी आणि आरवली येथील गडनदी या नद्यांचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी दुधाचा आणि भाज्यांचा तुटवडा असल्याने कराड-कोल्हापूर-आंबाघाट मार्गे वाहतूक केली जात आहे. पावसाची रिपरिप सुरुच, राजापूरमध्ये अजूनही पुराचं पाणी चिपळूण, खेड या ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला तरी राजापूर, लांजा याठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. राजापूरच्या काही सखल भागात अजूनही पुराचं पाणी असल्याने तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजापुरातील काकये धरणाला भेगा जिल्हातील काही धरणे मातीची असून सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यातील एक राजापूरमधील कोंडवशी गावातलं काकये धरण. सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून ओव्हरफ्लो झालं आहे. या धरणाला मोठ्या भेगा पडल्या असून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. त्यामुळे धरणालगतच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. परिणामी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सिंधुदुर्ग पाऊस अपडेट मुंबई-गोवा सागरी महामार्ग बंद मुसळधार पावसामुळे उद्धवलेल्या पूरस्थितीमुळे केळुस गावात पाणी आहे. त्यामुळे मुंबई-गोवा सागरी महामार्गावरील वाहतूक चौथ्या दिवशीही बंद आहे. तर भनसाळ नदीच्या पुराचे पाणी ओसरल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. अनेक रस्ते बंद कोल्हापूर जिल्ह्यातील पाडगाव आणि कुडाळमधील निळेली धरणाचे दरवाजे उघडल्याने कुडाळ तालुक्यातील आंबेरी फुलावर पाणी आलं आहे. कुडाळमधील कर्ली नदीची पूरस्थिती कायम आहे. तर तिलारी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने बांदा, दोडामार्ग रस्ता बंद करण्यात आला आहे. तसंच मनेरी गावात पूलावरुन पाणी जात असल्याने तो रस्ताही बंद केला आहे. 27 गावांचा संपर्क अजूनही तुटलेला याशिवाय कुडाळ तालुक्यातील माणगावमधील ब्रिटिशकालीन आंबेरी पुलावरुन गेल्या चार दिवसापासून पाणी जात असल्याने 27 गावांचा संपर्क अजूनही तुटलेला आहे. बांदा, खारेपाटण, माणगाव बाजारपेठेत दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. आतापर्यंत 150 जणांना वाचवण्यात यश वेंगुर्ले, केळुस गावातील 40 ते 50 लोक गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुराच्या पाण्यात अडकलेली आहेत. मात्र प्रशासनाकडून अजून कोणत्याही प्रकारची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. तर कुडाळ सरंबळ गावात पूरस्थिती कायम आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 150 जणांना वाचवून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Babanrao Gholap : काल शिंदे गटाला जय महाराष्ट्र, आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुलाला तिकीट मिळाल्यानंतर बबनराव घोलपांची घरवापसी
काल शिंदे गटाला जय महाराष्ट्र, आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुलाला तिकीट मिळाल्यानंतर बबनराव घोलपांची घरवापसी
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' चार मतदारसंघात भावांच्या तुलनेत लाडक्या बहिणी सर्वाधिक मतदान करणार! कोणासाठी निर्णायक ठरणार?
कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' चार मतदारसंघात भावांच्या तुलनेत लाडक्या बहिणी सर्वाधिक मतदान करणार! कोणासाठी निर्णायक ठरणार?
Radhakrishna Vikhe Patil : 'हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं', राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
'हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं', राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
दापोली मतदारसंघातील ठाकरेंचा उमेदवार बदलला जाणार; योगेश कदमांचा दावा, सांगितलं राज'कारण'
दापोली मतदारसंघातील ठाकरेंचा उमेदवार बदलला जाणार; योगेश कदमांचा दावा, सांगितलं राज'कारण'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ganesh Gite Nashik : उमेदवारी मिळाल्यानंतर गणेश गीतेंचं नाशिकमध्ये स्वागतThackeray Group Ghatkopar :  घाटकोपर पश्चिममध्ये ठाकरे गटाकडून संजय भालेराव यांना उमेदवारीKolhapur BJP Conflict : कोल्हापुरातील भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावरGulabrao Patil Jalgaon : बाप्पाचं दर्शन घेत गुलाबराव पाटलांनी केली प्रचाराला सुरूवात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Babanrao Gholap : काल शिंदे गटाला जय महाराष्ट्र, आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुलाला तिकीट मिळाल्यानंतर बबनराव घोलपांची घरवापसी
काल शिंदे गटाला जय महाराष्ट्र, आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुलाला तिकीट मिळाल्यानंतर बबनराव घोलपांची घरवापसी
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' चार मतदारसंघात भावांच्या तुलनेत लाडक्या बहिणी सर्वाधिक मतदान करणार! कोणासाठी निर्णायक ठरणार?
कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' चार मतदारसंघात भावांच्या तुलनेत लाडक्या बहिणी सर्वाधिक मतदान करणार! कोणासाठी निर्णायक ठरणार?
Radhakrishna Vikhe Patil : 'हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं', राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
'हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं', राधाकृष्ण विखे थोरातांवर कडाडले
दापोली मतदारसंघातील ठाकरेंचा उमेदवार बदलला जाणार; योगेश कदमांचा दावा, सांगितलं राज'कारण'
दापोली मतदारसंघातील ठाकरेंचा उमेदवार बदलला जाणार; योगेश कदमांचा दावा, सांगितलं राज'कारण'
Amol Mitkari: अकोल्यात आमच्या पक्षाला एकही जागा न मिळणं वेदनादायी, अमोल मिटकरींनी जाहीरपणे मनातली खंत दाखवली बोलून
अकोल्यात आमच्या पक्षाला एकही जागा न मिळणं वेदनादायी, अमोल मिटकरींनी जाहीरपणे मनातली खंत दाखवली बोलून
क्षमस्व! मी निवडणूक लढवणार नाही, प्रभाकर देशमुखांची माण खटावच्या मैदानातून माघार, पडद्यामागं नेमकं काय घडलं?
क्षमस्व! मी निवडणूक लढवणार नाही, प्रभाकर देशमुखांची माण खटावच्या मैदानातून माघार, पडद्यामागं नेमकं काय घडलं?
Mahayuti seat sharing: महायुतीचा अंतिम फॉर्म्युला आजच जाहीर होणार, सागर बंगल्यावर यादीवर शेवटचा हात फिरवणार, मुंबईत कोणते उमेदवार?
महायुतीचा अंतिम फॉर्म्युला आजच जाहीर होणार, सागर बंगल्यावर यादीवर शेवटचा हात फिरवणार, मुंबईत कोणते उमेदवार?
Jayashree Thorat : आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सभेतील प्रमुखांना....
आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सभेतील प्रमुखांना....
Embed widget