एक्स्प्लोर

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला, भाविकांची मागणी

पाच ठिकाणी भंगलेल्या देवीची मूर्तीवर मस्तकाभिषेक गेली तेरा वर्षे घातलेला नाही. ही मूर्ती अभिषेक, आंघोळ यापासून दूर असल्याने 'पारोशी' अशीच राहिलेली आहे.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती बदलण्यात यावी, अशी मागणी अंबाबाईच्या काही भक्तांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मूर्ती बदलण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आलं आहे. अंबाबाईची मूर्ती पाच ठिकाणी भंगली आहे. तसंच गेली 12 वर्षे देवीला मस्तकाभिषेक घालण्यात आलेला नाही. त्यामुळे धर्मशास्त्राप्रमाणे भंगलेली मूर्ती त्वरित बदलून नवीन मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जावी, अशी मागणी या भक्तांनी केला आहे. अंबाबाई देवीचे 1917 पासून आजपर्यंत शंभर वर्षात पाच ठिकाणी भंगलेले मूर्तीचे फोटो उपलब्ध आहेत. खरंतर मूर्तीची अवस्था पाहावत नाही. 2016 मध्ये मूर्तीचे संवर्धन केलं. त्यावेळी संवर्धन प्रक्रिया केली तरी मूर्तीची झीज मोठ्या प्रमाणात झाल्याने संवर्धनाची गॅरंटी देता येत नाही, असे पुरातत्त्व खात्याने जाहीर केलं होतं. यावेळी देवीच्या मूर्ती संवर्धन प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं होतं. तत्कालीन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी हे चित्रीकरण पाहिल्यानंतर हे चित्रीकरण म्हणजे 'जिवंत बॉम्ब' आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र हे चित्रीकरण भक्तांसमोर आणण्यात आलेलं नाही. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्यातील मूळ मूर्तीची नित्य पूजा म्हणजे अभिषेक स्नान, आरती, मंत्रपठण झालंच पाहिजे. श्री अंबाबाईचे स्थान जागृत आहे. ते जागृत ठेवण्यासाठी या सर्व प्रक्रिया नित्यनियमाने होणे गरजेचं असतं. पाच ठिकाणी भंगलेल्या देवीची मूर्तीवर मस्तकाभिषेक गेली तेरा वर्षे घातलेला नाही. ही मूर्ती अभिषेक, आंघोळ यापासून दूर असल्याने 'पारोशी' अशीच राहिलेली आहे. देवदेवतांचे देवत्व अबाधित राखण्यासाठी या सर्व प्रक्रिया नित्यनेमाने होत नाहीत, याची कल्पना असूनही याकडे प्रशासन आणि पुजारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भक्तांनी केलेला आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षभरात लाखो भाविक संपूर्ण देशातून कोल्हापुरात दाखल होत असतात. तिरुपती, शिर्डीच्या साई मंदिराप्रमाणेच कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात ही देवीचा मस्तकाभिषेक भाविकांना पाहता यावा अशी मागणी भक्तांकडून होती. 2014 सली भंगलेली मूर्ती बदलण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं. मात्र मधल्या काळात मंदिरातील पुजारी हटाव आंदोलन सुरु झालं, यासह विविध आंदोलनांमुळे मूर्ती बदलाची मुख्य मागणी बाजूला पडली. यासंदर्भात श्रीपूजक आणि देवस्थाने पुढाकार घेतला तर देवीची भंगलेली मूर्ती बदलून त्या ठिकाणी नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होऊ शकते. मात्र हा विषय भावनिक असल्यामुळे या विषयात हात घालण्यासाठी कोणीही तयार होताना दिसत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात पाऊस पडणार की नाही? पुढील पाच दिवस कसं असेल हवामान? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
राज्यात पाऊस पडणार की नाही? पुढील पाच दिवस कसं असेल हवामान? कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली
मी एकनाथ शिंदेंना खूप मानते, मराठी संस्कृतीचं अनुसरुन काम करते; नवी मुंबईत गौतमीचा जलवा, दहीहंडी उत्सवात थिरकली

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
Embed widget