एक्स्प्लोर

Jitendra Awhad : विरोधी पक्षातील काहीच नेत्यांना निधी, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार म्हणाले, मी निधी मागायला कोणत्या मंत्र्याकडे गेलो नव्हतो

काहींच्या ताटात पिठलं भाकरी तर काहींना श्रीखंड मिळाल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले. त्यावर आपल्याला इतरांपेक्षा कमी निधी मिळाल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) उत्तर दिलं. 

मुंबई: विरोधी पक्षातील काही नेत्यांना श्रीखंड तर काहींना पिठलं भाकरी मिळाली, काही ठराविक मोठ्या नेत्यांनाच निधी मिळाला तर 90 टक्के आमदारांना निधीच मिळाला नसल्याची तक्रार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली. विरोधी पक्षाच्या ज्या नेत्यांना निधी मिळाला आहे त्यांनी तो घेऊ नये, एकत्रित राहायचं आहे तर सर्वांनी एकसारखं वागाययला हवं असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारकडून निधी मिळवणाऱ्या विरोधी पक्षातील काही प्रमुख नेत्यांना सुनावलं. त्यावर आपण निधीसाठी कोणत्याही मंत्र्याकडे गेलो नव्हतो असं विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले. 

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले या चार नेत्यांना सरकारकडून मतदारसंघासाठी मोठा निधी मिळाला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या उपस्थितीत खडे बोल सुनावल्याची चर्चा आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यांतर विजय वडेट्टीवारांनी त्याला उत्तर दिलं.  त्यामुळे विरोधकांमध्ये निधीच्या प्रश्नावरून धुसमूस असल्याची चर्चा आहे. 

विरोधी पक्षातील काहींना श्रीखंड तर काहींना पिठलं भाकरी

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "आमदारांना निधी न मिळणे हे दुर्दैवी आहे. विरोधी पक्षातील 90 टक्के आमदारांना निधी मिळाला नाही. मात्र विरोधी पक्षातील काही प्रमुख नेत्यांना निधी देण्यात आला. आम्ही प्रमुख नेते नाही म्हणून आम्हाला निधी मिळाला नाही. प्रमुख नेत्यांना निधी देणे आणि इतर आमदारांना निधी न देणे अन्यायकारक आहे. प्रमुख नेत्यांनीही तो निधी घ्यायला नको होता, त्यांनी तो नाकारायला हवं होतं मात्र त्यांनी तसं केलं नाही. एकत्रित राहायचं असेल तर सर्वांनी एकसारखं वागायला हवं. काहींना पिठलं भाकरी आणि काहींनी श्रीखंडाचा जेवण जेवण योग्य नाही."

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मला माझ्या मतदारसंघासाठी 25 कोटी मिळाले. मात्र ते मागण्यासाठी मी कुठल्याही मंत्र्याकडे गेलो नव्हतो. रस्त्याच्या कामासाठी मला ते पैसे मिळाले. इतरांना माझ्यापेक्षा जास्त पैसे मिळाले.

अधिवेशन जनतेसाठी आहे हे सरकार हेच विसरले. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा अभ्यासही यांच्या मंत्र्यांचे नव्हते. एकंदरीत दिल्लीची पद्धत महाराष्ट्रात येत आहे. ही हुकूमशाही पद्धती असून यांना विरोधक ठेवायचे नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले.  

राज्य सरकारवर टीका करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "कंत्राटदारांना दिवाळीत पैसे दिले जायचे, मात्र आता कंत्राटदारांना संप करावे लागले. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती एवढी खालावली नव्हती. या तिघांच्या भांडणात महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. यांच्या रुसवारुसवीमध्ये नुकसान होत आहे. मुख्यमंत्र्यांचा वेळ या नेत्यांची समजूत घालण्यामध्ये जात आहे. ट्रिपल इंजिनचे सरकार महाराष्ट्राचे नुकसान करत आहे."

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
Abdul Sattar: भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
Embed widget