एक्स्प्लोर

JEE Main 2023:  जेईई मेन परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार, परीक्षा पुढे ढकलण्यास हायकोर्टाचा नकार

JEE Main 2023: परीक्षेतील 75 टक्के गुणांच्या पात्रता निकषाबाबत पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला

JEE Main 2023: जानेवारी महिन्याच्या शेवटी होणारी अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणारी जेईई मेन परीक्षा ही ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. याचिकेमुळे भलेही 50 हजार विद्यार्थ्यांना फायदा होईल, मात्र त्यासाठी 5 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आपलं शिक्षण धोरण जरी योग्य नसलं तरी न्यायालयानं त्यात हस्तक्षेप करू नये असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. मात्र परिक्षेकरता किमान 75 टक्के गुणांच्या पात्रतेचा निकष शिथिल करण्याची याचिकेतील मागणी कायम ठेवत याचिकेवरील सुनावणी 21 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे  यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.

या याचिकेला नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्यावतीनं जोरदार विरोध करण्यात आला. एनटीएची बाजू मांडताना एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला सांगितलं की, साल 2019 पासून जेईई मेन ही परीक्षा जानेवारी आणि एप्रिल अश्या दोन सत्रात घेतली जाते. जे विद्यार्थी जानेवारीत चांगले गुण कमवण्यात अपयशी ठरतात ते एप्रिलमध्य पुन्हा प्रयत्न करू शकतात. जानेवारीतील परिक्षेसाठी लाखो विद्यार्थ्यांनी तीन-चार महिने आधीपासून जोरदार तयारी केलेली आहे. त्यामुळे काही जणांच्या मागणीसाठी संपूर्ण परीक्षा पुढे ढकलता येणार नाही.

काय आहे याचिका -

येत्या 24 ते 31 जानेवारीदरम्यान होणारी जेईई मेन ही परीक्षा पुढे ढकलण्यासह आयआयटीमध्ये प्रवेशास पत्र होण्यासाठी 75 टक्के गुणांचा पात्रता निकष शिथिल करावा, अशी मागणी करत वकील आणि सामाजिक कर्यकर्ता अनुभा श्रीवास्तव-सहाय यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच जेईई मेन परीक्षा घेण्याबाबत आणि परीक्षेच्या पात्रता निकषाबाबत केंद्रीय परीक्षा संस्थेनं (एनटीए) 15 डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेलाही याचिकेतून आव्हान दिलेलं आहे. आयआयटीमधील प्रवेशासाठी उच्च माध्यमिक परीक्षेतील किमान 75 टक्के गुणांचा पात्रता निकष उत्तीर्ण गुणांपर्यंत शिथिल करण्यात यावा. मागील वर्षी 75 टक्के गुणांचा पात्रता निकष लागू नव्हता, असंही सहाय यांनी या याचिकेत म्हटलेलं आहे. अचानक करण्यात पात्रता निकषांतील या बदलामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसू शकतो, असा दावाही याचिकेतून केलेला आहे.

जेईई परीक्षेच्या कालावधीत 12 वी बोर्डाच्या तसेच विविध राज्य व अन्य परीक्षा मंडळांच्या पूर्वपरीक्षा होणार आहेत. बहुतांश राज्य मंडळांनी जानेवारीमध्ये त्यांच्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षांचं वेळापत्रक आखलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आयआयटी जेईई मेन ही परीक्षा देणं शक्य होणार नाही. जेईई परीक्षेची घोषणा शेवटच्या क्षणी करण्यात आली असून साधारणपणे वेळापत्रकाच्या तीन-चार महिने आधी परीक्षा जाहीर होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळतो. परंतु जानेवारीमधील नियोजित मुख्य परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना जेईईच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, असा दावाही याचिकेतून केला होता.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Embed widget