एक्स्प्लोर

Jayant Patil: गद्दारांना धडा शिकवा अन् नव्याने इतिहास घडवा; शिवस्वराज्य यात्रेतून जयंत पाटील यांचा हल्लाबोल

Jayant Patil : गद्दार आमदाराला धडा शिकवा आणि पुन्हा एकदा 2019 ला जो इतिहास घडवला तो इतिहास घडवा, असे आवाहन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

Jayant Patil भंडारा : गद्दार आमदाराला धडा शिकवा आणि पुन्हा एकदा 2019 ला जो इतिहास घडवला तोच इतिहास पुन्हा घडवा, असे आवाहन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. भंडारा येथील शिवस्वराज्य यात्रेतून जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारवर हल्लाबोल करत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.  यावेळी ते म्हणाले कि नव्याने इतिहास घडवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. म्हणून आज आम्ही सगळे आपल्या दारात आलेले आहोत. राज्यात विकासकामे होत नाही म्हणून लोकं त्रस्त झाले आहेत. पैसे दिल्याशिवाय काम होत नाहीत. त्यामुळं लोकसभा निवडणूक झाल्यानंतर सरकार घाबरलं आणि घाबरलेल्या सरकारने आपल्या तिजोरीचे दार काढून बाजूला ठेवलं. जाहिराती करून सरकारला समाधान नाही. त्यामुळं सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी घराघरात जाहिरात केली जात आहे.

सगळ्यांनी एकमताने काम केलं पाहिजे, आता एवढी जण आहेत, चार पाच जण मिळून सरकार चालवत आहेत. तरी त्यांना यश येत नसल्याची टीकाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

राज्यात लाडक्या बहिणीच सुरक्षित नाही-जयंत पाटील 

आगामी विधानसभेसाठी उमेवादर निवडनं अवघड आहे. म्हणून आपण सगळ्यांनी किती क्षमतेने माणसं गोळा केलेली आहे, हे बघण्यासाठी देखील शिवस्वराज्य यात्रा ऐन गणपतीचा महोत्सव चालू असताना आम्ही सगळे आपल्या दारात घेऊन बघण्याचा प्रयत्न करतोय. आनंददायी बाब म्हणजे जेवढे पुरुष आहेत बहुतेक तेवढ्याच महिला तुम्ही गोळा केलेल्या आहेत. महाराष्ट्रातलं युतीचं सरकार घालवण्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे.लहान मुलं मुली शाळेत जातात त्यांच्यावर अत्याचार कोणी करणार नाही, याची खात्री आम्ही महाराष्ट्राला देऊ. त्यामुळे आज लाडक्या बहिणीच सुरक्षित नाही. ही समाजात पसरलेली भावना कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. असेही जयंत पाटील म्हणाले. 

आपण ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जातो, जिल्हा रुग्णालयात जातो ती उत्तम सेवा तिथे तुम्हाला मिळाली पाहिजेत.  तुमच्या सगळ्या शेतीच्या पाण्याचे प्रश्न असतील, आता धापेवाडा सिंचन योजना प्रलंबित आहे. मी या खात्याचा मंत्री असताना बऱ्याच बैठका झाल्या प्रकल्पाला गती देण्याचं काम केलं, फॉरेस्टचे काही प्रश्न होते पण या सगळ्या योजना पूर्ण झाल्यानंतर शेतकरी सुजलाम सुफलाम होईल, असा विश्वासही जयंत पाटील यांनी बोलतांना व्यक्त केला आहे.

हेलिकॉप्टर खरेदी करणाऱ्याला सुट, सायकल खरेदी केली तर लूट

हेलिकॉप्टर खरेदी करणाऱ्याला सुट आणि गाडी, मोटरसायकल, सायकल खरेदी केलं तर त्याच्या 28 टक्के 18 टक्के किंवा 24 टक्के कर सरकार लावत आहे. महाराष्ट्राची महागाई कमी झाली पाहिजे. तुमच्या शेतीमालाला चांगला दर मिळाला पाहिजे. कपाशीला चांगला दर मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणारे महाराष्ट्रातलं सरकार असलं पाहिजे, अतिवृष्टी होते सरकार इकडं बघत नाही आणि मग सरकारच्या सभा होतात सामान्य माणसे यांच्या सरकारच्या सभांना जायला बंद झालेली आहेत.लोकसभेला तुम्ही काय केलं, भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी मतदान केले.

भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी कारण काय तर हे सरकार भारतीय जनता पक्ष हा पक्ष या देशांमध्ये घटनेतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या तरतुदी बदलण्याचा, घटना बदलण्याचं काम करणार होतं. पण काहीही करून भाजपचं सरकार आलं नाही. दुसऱ्या दोन पक्षांना मदत घेऊन यांनी केंद्रात सरकार स्थापन केले. उमेदवार हा महाविकास आघाडीच्या संमतीने तुतारी वाजवणारा माणूस उभा राहिला तर ते चिन्ह घराघरापर्यंत पोचवण्याचं काम देखील तुम्ही केलं पाहिजे. असे आवाहनही जयंत पाटील यांनी बोलतांना केले आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget