एक्स्प्लोर

राज्यात रखडलेल्या पोलीस भरतीचा प्रश्न अखेर मार्गी; 31 डिसेंबरपूर्वी 5 हजार 200 रिक्त पदं भरणार

राज्यात रखडलेल्या पोलीस भरतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. 31 डिसेंबरपूर्वी 5 हजार 200 रिक्त पदं भरणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

पुणे : राज्यात रखडलेल्या पोलीस भरतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार आहे. 31 डिसेंबरआधी 5 हजार 200 पदं भरण्यात येणार आहेत. त्यानंतर सात हजार पदं भरले जातील अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली. 

महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबरपूर्वी 5 हजार 200 पदांची भर्ती करण्यात येणार असून त्यानंतर 7 हजार पदं भरली जातील, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यावेळी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "बऱ्याच दिवसांपासून रखडलेली पोलीस भरती आहे. त्या पोलीस भरतीच्या संदर्भातील निर्णय आम्ही घेतलेला आहे. सूचना दिलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबरपूर्वी ही 5 हजार 200 पदांची भर्ती करण्याचा निर्णय केलेला आहे. यासाठी कॅबिनेटनं मंजूरीही दिली आहे. अशी आणखी 7 हजार पदं आहेत. या पदांचा निर्णय मार्गी लागल्यानंतर आपण आणखी त्या 7 हजार पदांचीही भरती करण्याचा निर्णय घेणार आहोत. यासंदर्भातील प्रक्रियाही लवकरात लवकर सुरु केली जाईल."

दरम्यान, पोलीस दलात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनंतर बढती दिली जाते. सहायक फौजदार झाल्यानंतर तो कर्मचारी सेवानिवृत्त होतो. मात्र निवृत्त होताना पोलिसांमधील सहायक फौजदार पदावरील कर्मचाऱ्यांचे वेतन हे उपनिरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांएवढे आहे. किंबहुना अनेक हवालदारांचे वेतन उपनिरीक्षकांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे त्यांना निवृत्तीपर्यंत उपनिरीक्षकपदापर्यंत बढती देण्याचा विचार गृह विभागाने घेतल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha : 11 PmABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 March 2025Special Report | Santosh Deshmukh | 90 दिवस! वडील गमावले, वैभवीने प्रश्न विचारले..Special Report| Raj Thackeray | कुंभ आणि गंगा, 'राज'कीय पंंगा; वादांचा मेळा, प्रतिक्रियांची डुबकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
Embed widget