एक्स्प्लोर

राज्यात एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु, अनेक ठिकाणी लालपरी प्रवाशांविना धावली!

राज्यात आजपासून एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु झाली. परंतु अनेक एसटी बस डेपोमधील लालपरी मोकळीच धावत असल्याचं किंवा एखाद-दुसरा प्रवासी एसटीमधून प्रवास करत असल्याचं चित्र आहे.

पंढरपूर/कोल्हापूर/वाशिम : राज्यात आजपासून सर्वसामान्यांच्या एसटीला आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. परंतु राज्यातील अनेक एसटी बस डेपोमधील लालपरी मोकळीच धावत असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी एखाद-दुसरा प्रवासी एसटीमधून प्रवास करत असल्याचं चित्र आहे.

पंढरपूर - कोरोनाच्या भीतीने प्रवाशांची बसकडे पाठ राज्य सरकारने आजपासून आंतरजिल्हा एसटी बससेवा सुरु केल्यानंतर कोरोनाच्या भीतीने प्रवाशांनी बस सेवेकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. आज सकाळीपासून बहुतेक बस मोकळ्याच सोडण्यात आल्या. गेल्या पाच महिन्यापासून एसटी बसची आंतरजिल्हा सेवा बंद होती, त्यामुळे आजपासून बाहेर जिल्ह्यात जाणारे प्रवासी गर्दी करतील अशी अपेक्षा प्रशासनाला होती. मात्र आज सकाळपासून एखादा प्रवासी वगळता प्रवाशांनी बस प्रवास टाळल्याचे दिसत आहे. आज पहिला दिवस असल्याने प्रवासी नसले तरी हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल असा विश्वास प्रशासनाला वाटत असला तरी सध्या मात्र लालपरी मोकळीच धावात आहे.

वाशिम - आरोग्य चाचणी अहवाल बंधनकारक केल्याने प्रवासी संख्या कमी गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या लालपरीला म्हणजे एसटीला आंतरजिल्हा प्रवासाला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र वाशीममधून जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांना आरोग्य चाचणी अहवाल बंधनकारक केल्याने प्रवासी संख्या कमी असल्याचं चित्र आहे. प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यात एक एसटी बस धावणार आहे. मात्र प्रवासी संख्या वाढल्यावर जादा बस सोडल्या जाणार आहेत

राज्यात उद्यापासून 'लालपरी' धावणार! आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी : परिवहन मंत्री अनिल परब

कोल्हापूर - प्रत्येक सीटच्या मध्यभागी पडदा पाच महिन्यानंतर आजपासून लालपरी रस्त्यावर धावू लागली आहे. कोल्हापूर बस स्थानकावर वेगळंच नियोजन केलेली बस पाहायला मिळाली. या बसमध्ये प्रत्येक सीटच्या मध्यभागी एक पडदा बांधण्यात आला आहे. म्हणजे एका प्रवाशाचा दुसऱ्या प्रवाशासोबत कुठलाही संपर्क येऊ नये, यासाठी हे नियोजन करण्यात आलं आहे.

हिंगोली - डेपोतून सोडलेली पहिलीच बस विना प्रवासी धावली जिल्ह्याबाहेर वाहतूक सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर आज हिंगोली आगारातून परभणीच्या दिशेने पहिली बस धावली आहे. मात्र प्रवासी नसल्याने ही बस विनाप्रवासी धावली आहे. वाहक आणि चालक दोघेच बसमधून परभणीच्या दिशेने रवाना झाले आहेत. ग्रामीण भागामध्ये प्रवाशांचा प्रतिसाद पाहून टप्प्याटप्प्याने एसटी बससेवा सुरु करणार असल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन एसटी डेपो आहेत. कळमनुरी डेपोमधून देखील विविध ठिकाणी अकरा बस सुरु करण्यात आल्या आहेत.

ई-पासची गरज नाही गणेशोत्सवानिमित्त आंतरजिल्हा एसटी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही. लालपरी सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे. कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती. परंतु, आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. मात्र, खासगी वाहनांसाठी ई-पास लागू राहणार आहे.

ST Bus | राज्यात आजपासून एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु, सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचं पालन आवश्यक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget