एक्स्प्लोर

Konkan Refinery Project: रिफायनरी प्रकल्पाला कोयना धरणातील पाणी, लोकप्रतिनिधींच्या बैठकीत काय झालं? सामंत यांनी स्पष्टच सांगितले

Konkan Refinery Project: कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी कोयना धरणातील पाणी वापरण्यात येणार असून स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Konkan Refinery Project: बारसू येथील रिफायनरी प्रकल्पासाठी(Kokan Refinery Project) शेतकऱ्यांवर स्थानिकांवर कोणताही दबाव टाकला जाणार नसल्याची ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. या प्रकल्पासाठी अर्जुना धरणातील पाणी न वापरता कोयना धरणातील पाणी वापरण्यात येणार असून बारसूपर्यंत पाईपलाईन टाकण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. 

कोकणातील प्रस्तावित बारसू रिफायनरीबाबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयात आज लोकप्रतिनिधींची  बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती तटकरे आणि उद्योग खात्यातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी माहिती दिली. 

उदय सामंत यांनी सांगितले की, रिफायनरी कशाप्रकारे होणार आहे, याची माहिती देण्यासाठी आजची बैठक घेण्यात आली. रिफायनरी प्रकल्पासाठी 6200 एकर जागेची आवश्यकता आहे. त्यापैकी 2900 एकर जमीन मालकांनी संमतीपत्रे दिली आहेत. उर्वरित जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. नाटेसाखरमध्ये क्रूड ऑईलचा साठा तयार होणार आहे. त्याठिकाणी बोअर खोदण्याचे काम झाले आहे. तर, इतर काही ठिकाणी काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने दोन लाख कोटींहून अधिक गुंतवणूक होणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष रोजगार 3000 जणांना उपलब्ध होणार आहे. तर, 75000 अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. 

रिफायनरीसाठी अर्जुना धरणातून पाणी घेतल्यास कोकणात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता असल्याचा मुद्दा आमदार राजन साळवी यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या मुद्याचा गांभीर्याने विचार करण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पासाठी कोयना धरणातून पाणी घेण्यासाठी तत्वत: मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. ही पाईपलाइन ज्या गावातून जाईल त्या गावांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्याची पाणीपट्टी ग्रामपंचायतीला भरावी लागणार आहे. बारसूपर्यंत पाईपलाईन येणार आहे. प्रकल्पासाठी 160 एमएलडी पाणी आवश्यकता लागणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. 

या प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिकांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करणार आहे. भुवनेश्वरमध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मतदारसंघात असलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या धर्तीवर हे केंद्र असणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. रिफायनरी परिसरात हिरवळ राहण्यासाठी झाडे लावण्यात येणार आहे. मात्र,  ही झाडे कोकणात आढळणारी झाडे असणार आहे. यामध्ये काजू, आंबा आदी झाडांचा समावेश असणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

जमिनीला अधिक चांगला दर मिळाला पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. लोकांच्या मागण्यांचा विचार न झाल्यास रिफायनरीच्या पाठिंब्याचा पुनर्विचार करू असे आमदार राजन साळवी यांनी म्हटले असल्याचेही सामंत यांनी सांगितले. राजन साळवी यांनी प्रकल्पाबाबत घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करत असल्याचे सामंत यांनी सांगितले. हा मोठा प्रकल्प साळवी यांच्या मतदारसंघात येत असल्याने त्यांच्या सूचनाही लक्षात घेण्यात आल्याची माहितीदेखील सामंत यांनी दिली. आमदारांप्रमाणे जनतेनेदेखील सकारात्मक भूमिका घ्यावी,  असे आवाहन त्यांनी केले. 

जनतेला विश्वासात घेऊन हा प्रकल्प पूर्ण करू, शेतकऱ्यांवर स्थानिकांवर कोणताही दबाव टाकून प्रकल्प पूर्ण करणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. रिफायनरीविरोधकांनासोबतही चर्चा करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी म्हटले. 

रिफायनरीवरून ठाकरे गटात मतभेद?

या रिफायनरीला आमदार राजन साळवींचं समर्थन असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले. आजच्या बैठकीला राजन साळवी यांनी उपस्थितीदेखील दर्शवली. तर, दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे ठाकरे गटात रिफायनरीच्या मुद्यावरून मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget