एक्स्प्लोर

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यात वाघाच्या हल्ल्यात तब्बल 9 लोकांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात मागच्या वर्षी म्हणजे 2020 साली जवळपास 30 लोकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. वाघाच्या हल्ल्यातील मृत्यूंची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात आज वाघाच्या हल्ल्यात मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा मृत्यू झाल्याची अतिशय दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. सिंदेवाही तालुक्यातील पवनपार गावालगतच्या जंगलात आज सकाळी मोहफुल वेचण्यासाठी गावातील लोकं गेले होते आणि त्याच वेळी वाघाने कमलाकर उंदीरवाडे आणि धुर्वास उंदिरवाडे यांना हल्ला करून ठार केले. एकाच वेळी वाघाने दोन लोकांना ठार केल्याची ही घटना अतिशय दुर्मिळ असून या मुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यात वाघाच्या हल्ल्यात तब्बल 9 लोकांचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढल्याचं चित्र आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मागच्या वर्षी म्हणजे 2020 साली जवळपास 30 लोकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. वाघाच्या हल्ल्यातील मृत्यूंची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. मात्र गेल्या 2 महिन्यात ज्या प्रमाणात वाघांचे हल्ले वाढतांना दिसत आहेत त्यावरून यावर्षी हा आकडा देखील मागे टाकला जाईल की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. अवघ्या दोन  महिन्यात  9 जणांचे वाघाच्या हल्ल्यात बळी गेल्याने वनविभाग आणि जंगलाशेजारी राहणाऱ्या गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.

चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत शेतीची कामं संपतात आणि त्यानंतर ग्रामस्थ लाकूड-फाटा, बिडीपत्ता, गवत, मोहफूल आणि टेम्भरं गोळा करण्यासाठी जंगलात शिरतात. त्यामुळे त्यांचा वन्यप्राण्यांसोबत सामना होतो आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. गेल्या वर्षी आलेल्या कोरोनामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक कामगार जे शेतीचा हंगाम संपल्यावर जिल्ह्याबाहेर किंवा राज्याबाहेर मजुरी साठी जातात ते जिल्ह्यात परत आले आहेत. कोरोनामुळे यावर्षी देखील त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शेतीचा हंगाम संपल्यावर म्हणजे अंदाजे फेब्रुवारीपासून हे लोकं जंगलात शिरायला सुरुवात झाली आहे आणि याच वेळी वाघाच्या या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे हे विशेष. चंद्रपूर जिल्ह्यात किमान 700 ते 800 गावं ही जंगलाशेजारी आहे आणि जिल्ह्याच्या 50 टक्के भूभाग हा जंगलांनी व्याप्त आहे. यावरून चंद्रपूर जिल्ह्यात जंगल आणि गाव हे किती घट्ट समीकरण आहे हे तुमच्या लक्षात येईल.

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षात वन्यजीवांच्या संरक्षणात आणि जंगलांच्या राखीव क्षेत्रात वाढ झाल्याने वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात सध्या किमान 300 वाघ असल्याचा अंदाज आहे. साहजिकच हे वाघ आपला अधिवास तयार करण्यासाठी नवीन क्षेत्रात जातात आणि त्यांचा माणसांसोबत संघर्ष होतो. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा सारखा तालुका जिथे वाघाचा कधीच अधिवास नव्हता तिथे 8 लोकांचा वाघाच्या हल्ल्यात मागच्या वर्षी जीव गेला हे याचंच उदाहरण म्हणावं लागेल.

यावर्षी देखील चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वच भागात कोरोना आणि बेरोजगारी यांची मागच्या वर्षी प्रमाणेच स्थिती आहे आणि त्यामुळे साहजिकच यावर्षी देखील अनेक लोकं वाघांच्या हल्ल्यात बळी पडतील अशी भीती आहे. त्यामुळे या लोकांना पर्यायी रोजगार देता येईल का यावर सरकारने तातडीने उपाय शोधणे गरजेचे आहे. याशिवाय लोकांनी जंगलात जातांना जास्तीत जास्त काळजी घेतली आणि या कामात वनविभागाने त्यांना मदत केली तरच वाघांच्या हल्ल्यात लोकांचे होणारे हे मृत्यू काही प्रमाणात कमी करता येईल. लोकांना वाघापेक्षा सध्या पोटाची खळगी भरण्याची जास्त काळजी आहे आणि त्यामुळे लोकांना जंगलात जाण्यापासून रोखणे हा त्यावर उपाय असूच शकत नाही हे मात्र नक्की...

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar On Chakan MIDC Pune: चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Manoj Jarange: 'बावनकुळे साहेब तुम्ही मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणून तुमच्यावर रडकुंडीला येण्याची वेळ; एकदा माफ केलं, इथून पुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही' : मनोज जरांगे पाटील
'बावनकुळे साहेब तुम्ही व्यथित झालात, आईचं नाव घेतलं याचं आम्हालाही वाईट वाटलं; एकदा माफ केलं, इथून पुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Government: जमिनीचे दावे वर्षानुवर्षे अडकलेत? आता मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जमिनीचे दावे निकाली निघणार; राज्य सरकारचा मेगा प्लॅन
जमिनीचे दावे वर्षानुवर्षे अडकलेत? आता मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जमिनीचे दावे निकाली निघणार; राज्य सरकारचा मेगा प्लॅन
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Embed widget