एक्स्प्लोर

महाराष्ट्रातल्या 'या' गावात चेरापुंजीपेक्षाही जास्त पावसाची नोंद

देशात चेरापुंजी या गावात सर्वाधिक पाऊस पडतो. परंतु महाराष्ट्रातल्या एका गावाने चेरापुंजीला मागे टाकलं आहे. साताऱ्यामधील लामज या गावात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

सातारा : देशात चेरापुंजी या गावात सर्वाधिक पाऊस पडतो. परंतु महाराष्ट्रातल्या एका गावाने चेरापुंजीला मागे टाकलं आहे. साताऱ्यामधील लामज या गावात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरजवळ असलेल्या लामज गावामध्ये तब्बल 10 हजार मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरात सर्वाधिक पाऊस या लामज गावात पडला असल्याचा दावा केला जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात अशा नावाचं गाव आहे, याची खबरही कुणाला नव्हती. परंतु पावसामुळे लामज प्रकाशझोतात आलं आहे. लामज गावात जाणं सोपं नाही लामजला जाण्यासाठी आधी साताऱ्यापासून 100 किलोमीटरवर बामणोली गाठायचं. त्यानंतर कोयनेच्या बॅकवॉटरमधून कारने पलिकडचा तीर गाठायचा. त्यानंतर तिथून पुढे 35 किलोमीटरच्या कच्च्या रस्त्याने प्रवास करत लामजला पोहोचता येतं. जुलैपासून सुरु झालेला पाऊस अद्याप थांबलेलाच नाही. गावातल्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. येथील शेती आणि जनावरांचं मोठं नुकसान झालं आहे. गावातले लोक घाबरले आहेत. गाव सोडून जावं, अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. परंतु सर्वत्र पाणीच पाणी, रस्ता नाही, त्यामुळे कुठे आणि कसं जावं हा प्रश्न इथल्या लोकांसमोर आहे. गावातील लोकवस्ती जेमतेम काही उंबऱ्यांची आहे. त्यामुळे येथील लोकांच्या मतांना निवडणुकीच्या गणितामध्ये फारशी किंमत मिळत नाही. कितीही पाऊस पडला, कितीही नुकसान झालं तरी प्रशासन, लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. कधीही त्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. भारतातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून मेघालयमधल्या चेरापूंजी गावाची ओळख आहे. पावसामुळे या गावात पर्यटन सुरु झालं आहे. लामजच्या लोकांनीदेखील निसर्गाचा हा प्रकोप संधी म्हणून बघायला हवा. तसेच प्रशासनादेखील त्याकडे लक्ष दिलं तर कदाचित लाममध्येही पर्यटन सुरु होऊ शकतं. देशातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून लामज मिरवू शकतं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
Ajit Pawar Plane Crash: व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन, पिंकी माळीच्या कुटुंबाला धमक्या, अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप
व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन, पिंकी माळीच्या कुटुंबाला धमक्या, अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप
Nashik Gas Shortage: गॅस टंचाईने नाशिकमधील उद्योग अडचणीत; 100 हून अधिक कंपन्यांकडे फक्त एक दिवसाचा साठा, कंपन्या बंद ठेवण्याची वेळ
गॅस टंचाईने नाशिकमधील उद्योग अडचणीत; 100 हून अधिक कंपन्यांकडे फक्त एक दिवसाचा साठा, कंपन्या बंद ठेवण्याची वेळ
VK Singh On Ajit Pawar Plane Crash: सीआयडीच्या चौकशीत VSR कंपनीच्या मालकाचा धक्कादायक जबाब; अजितदादांच्या अपघातावर काय म्हणाले?
सीआयडीच्या चौकशीत VSR कंपनीच्या मालकाचा धक्कादायक जबाब; अजितदादांच्या अपघातावर काय म्हणाले?

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Gas Shortage ECA Act: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Embed widget