![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून अशांतता पसरवणे आहे : गोपीचंद पडळकर
मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेले समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की, समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे.
![समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून अशांतता पसरवणे आहे : गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar on OBC Reservation Indapur Maharashtra News समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून अशांतता पसरवणे आहे : गोपीचंद पडळकर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/81ae87655671e8e30f5b56c4c266bf08170218530618489_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आरक्षणावरून सध्या मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी (OBC Reservation) असा संघर्ष सुरू झालाय. एकीकडे मनोज जरांगे आव्हानांवर आव्हानं देतायत, तर दुसरीकडे छगन भुजबळही तितक्याच टोकदारपणे प्रतिहल्ला करतायत. अर्थात, आजवर हे शाब्दिक पातळीवरचं युद्ध होतं. मात्र एका घटनेमुळे त्याला आता चप्पलफेकीचं स्वरूप आलं आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर चप्पलफेक देखील करण्यात आली. त्यामुळे या राड्याला उग्र स्वरुप प्राप्त झालं. घडलेलल्या प्रकरानंतर गोपीचंद पडळकरांनी शांत राहण्याचे आवाहन समाजाला केले आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले, इंदापुरात घडलेल्या या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. राज्यात शांतता ठेवावी.
गोपीचंद पडळकर म्हणाले, ओबीसी समाज अत्यंत सयंमाने शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामंध्ये आपली स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडतोय. काल इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत या सुरु असलेल्या आंदोलनास मी जात असताना नौटंकीचा हा प्रकार घडला आहे. या भेकडांनी परत नौटंकीबाज करत मीडियात मुलाखती दिल्या आणि म्हणतात सदर घटना माझ्याच कार्यकर्त्यांनी केली. खरोखर मला यांची कीव वाटते. मुळात आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे की गरीब मराठा समाजला आरक्षण मिळालेच पाहिजे. पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेले समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की, समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे.
11 डिसेंबरला नागपूर येथे सुरू असेल्या हिवाळी अधिवेशनावर इशारा मोर्चा
घडलेल्या प्रकाराचा मुख्य सूत्रधार कोण आहे? हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. कारण तो स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू आहे. काल जर मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते. परंतु आज मी माझ्या ओबीसी बांधवांना हेच आवाहन करतो आपण या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. राज्यात शांतता ठेवावी. कारण आपल्याला डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर आरक्षण दिले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी येत्या 11 तारखेला आपल्याला नागपूर येथे सुरू असेल्या हिवाळी अधिवेशनावर इशारा मोर्चा काढायचा आहे. त्यासाठी आपण लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहून आपला रोष शांततेच्या मार्गाने व्यक्त करावा.
हे ही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)