एक्स्प्लोर
Advertisement
यूपीएससी परिक्षार्थीचा रेल्वे अपघात, दोन्ही पाय गमावले
मुंबई : आयएएसची परीक्षा देण्यासाठी मुंबईला आलेल्या एका विद्यार्थिनीचं स्वप्न रेल्वे अपघातामुळे भंग झालं आहे. गुरुवारी कल्याण रेल्वे स्टेशनवर इंद्रायणी एक्स्प्रेस पकडण्याच्या घाईत सायली ढमढेरे नावाची तरुणी गाडीतून खाली पडली आणि थेट गाडीच्या खाली गेली.
या अपघातात सायलीनं आपला डावा पाय गमावला आहे. तसंच उजवा पायही गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे हा पायही कापावा लागू शकतो. सायलीला ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. मात्र तिचा उपचाराचा खर्च कसा करायचा हा प्रश्न कुटुंबियांसमोर आहे.
जुन्नरमध्ये राहणारी सायली बहिणीच्या प्रेरणेमुळे आयएएसची स्वप्न पाहू लागली होती. यासाठी तिनं यूपीएससीची जोरदार तयारीही सुरु केली. या अपघातामुळे तिचं आयएएस होण्याचं स्वप्न कठीण झालं आहे. गेल्या काही दिवसात रेल्वेतून पडून होणाऱ्या अपघातांचं प्रमाण वाढलं आहे.
पाहा व्हिडीओ :
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
बातम्या
विश्व
मुंबई
Advertisement