एक्स्प्लोर

हिंदू मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करा आणि हिंदूंना सोपवा; तिरुपती बालाजी मंदिर प्रकरणावरून विश्व हिंदू परिषदेची मागणी

Vishva Hindu Parishad : आम्ही केलेली मागणी संदर्भात सरकारने निर्णय घेतलेला नाही, त्याचेच विपरीत परिणाम तिरुपतीमध्ये दिसून आल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे यांनी व्यक्त केले आहे.

VHP on Tirupati Laddu Controversy : विश्व हिंदू परिषदेने चार वर्षा आधी प्रस्ताव पारित करत सरकारी नियंत्रणातील सर्व मंदिरे भाविक आणि हिंदू धर्म यांच्याकडून संचालित ट्रस्टला द्यावे, अशी मागणी केली होती. त्या मागणी संदर्भात सरकारने निर्णय घेतलेला नाही, त्याचेच विपरीत परिणाम तिरुपतीमध्ये दिसून आल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे (Vishva Hindu Parishad) महाराष्ट्र व गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केले आहे. तिरुपती मंदिर सरकारी नियंत्रणात असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेप तिथे होता  आणि लाभाच्या उद्दिष्टाने कंत्राटदाराने प्रसादात भेसळ केली. त्यामुळे आमची मागणी आहे की सरकारी नियंत्रणातील सर्व मंदीरे भाविकांकडून संचालित ट्रस्टला देण्यात यावे, अन्यथा तिरुपती सारखी गडबड इतर मंदिरात होऊ शकते, असेही गोविंद शेंडे यावेळी म्हणाले. 

तिरुपती सारखी गडबड इतर मंदिरात होऊ नये, भाविकांच्या भावनेशी खेळ होऊ नये, यासाठी हिंदू मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करावे आणि हिंदूंना सोपवावी, अशी आमची पुन्हा मागणी असल्याचे ही ते म्हणाले. येणाऱ्या दिवसात ही मागणी पूर्ण झाली नाही तर विश्व हिंदू परिषद राज्यात आणि देशात मोठे आंदोलन उभे करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

शेख सुभान अली कोणते पुस्तक वाचून शिवचरित्रकार झाले?- गोविंद शेंडे

कथित शिवचरित्रकार शेख सुभान अली यांचे वक्तव्य सर्व शिवभक्तांचा अपमान करणारे आहे. शेख सुभान अली यांनी त्यांच्या चुकीच्या वक्तव्या संदर्भात सर्व शिवभक्तांची माफी मागावी आणि पुन्हा असे वक्तव्य करू नये, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. शेख सुभान अली कोणते पुस्तक वाचून शिवचरित्रकार झाले, हे आम्हाला माहित नाही, त्यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नीट वाचावा, असा सल्ला विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी दिला आहे. शेख सुभान अली यांनी शिवभक्तांची माफी मागावी, अशी मागणी गोविंद शेंडे यांनी केली आहे.

ती स्वराज्याची लढाई होती : संजय गायकवाड 

तर यावर बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात अनेक मुस्लीम होते. पण शिवाजी महाराजांनी कधीही त्यांना मुस्लीम धर्मीय म्हणून ठेवलं नाही ती स्वराज्याची लढाई होती. हे खरं आहे की, त्याकाळी मनुवादी प्रवृत्तीला विचारल्याशिवाय समुद्रात प्रवेश करता येत नव्हता. मात्र शिवाजी महाराजांनी सगळे निर्बंध धुडकावून समुद्रात प्रवेश केला. त्यांच्यासोबत काही प्रमाणात मुस्लीम मावळे देखील होते. पण 100 टक्के मुस्लीम होते, असं नाही. याकुत बाबांना छत्रपती शिवाजी महाराज मानायचे. त्यामुळेच त्यांना त्याकाळी शिवाजी महाराजांनी मोठी जमीन देखील दिली हे खरे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Travel: केवळ तिरुपती बालाजी मंदिरच नाही, तर प्रसादासाठी प्रसिद्ध असणारी देशातील 'ही' 6 मंदिरंही माहित आहेत? एकदा नक्की आस्वाद घ्या...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला

व्हिडीओ

John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report
Shivsena BJP Seat Sharing : पालिका निवडणुकीसाठी 50-50 फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही Special Report
Devendra Fadnavis Vidhan Sabha : विरोधकांची नाराजी, सत्ताधाऱ्यांची जोरदार टोलबाजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
Embed widget