एक्स्प्लोर

मंगळसूत्र गहाण ठेवून बैलाला वाचवण्याचे प्रयत्न अखेर अपयशी

एका तरुण शेतकऱ्याने आपला बैल आजारी असल्याने त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. प्रसंगी पैशांअभावी मंगळसूत्र गहाण ठेवून औषधे खरेदी केली. बैलावर उपचार केले, पण दुर्दैवाने बैलाने या जगाचा निरोप घेतला.

नांदेड : बळीराजासाठी बैल, गाय हे त्याचे सच्चे साथीदार. या जनावरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोग होतोच, शिवाय जोडधंदाही मिळतो. असेच एका तरुण शेतकऱ्याने आपला बैल आजारी असल्याने त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. प्रसंगी पैशांअभावी मंगळसूत्र गहाण ठेवून औषधे खरेदी केली. बैलावर उपचार केले, पण दुर्दैवाने बैलाने या जगाचा निरोप घेतला. वाघमारे परिवाराच्या गोठ्यात आज निरव शांतता पसरली आहे. हा गोठा एका बैलाचा हक्काचा होता. इथे तो बैल विश्रांती घ्यायचा, चारा खायचा. पण अचानक त्याचे पोट फुगले, बैल तडफडू लागला, चारा खाणे कमी झाले... वाघमारे परिवार त्यामुळे अस्वस्थ झाला. बैलावर घरी डॉक्टर बोलवून उपचार केले. गोठ्यात पडलेली औषधी त्याची साक्ष देते. पण बैलाची तब्येत खालावत गेली. अखेर बैलाला लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात असलेल्या दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. वाघमारे यांचे गाव नांदेड जिल्ह्यातील कुंद्राळा.. बैलाला उपचार करण्यासाठी त्यांनी लातूर जिल्ह्यात उदगीर येथील सरकारच्या पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालयात नेले. कुंद्राला येथून उदगीरला जाण्यासाठी रिक्षाचालकाने चार हजार रुपये भाडे घेतले. डॉक्टरांनी या बैलाचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगत वाघमारे यांच्या हातात लांबलचक औषधांची यादी दिली. अमोल वाघमारे हा आपल्या मावशीसोबत नजीकच्या मेडिकलमध्ये गेला. औषधांचे बिल झाले साडेतीन हजार रुपये. पण अमोलच्या खिशात केवळ दोन हजार रुपये होते. बैलाला काहीही करून वाचवण्याचा त्याने प्रयत्न केला होता. मावशीने पैसे कमी पडत असल्याने मेडिकल चालकाला स्वतःच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून दिले. त्यानंतर मेडिकल चालकाने औषधी दिली. अखेर बैलाचे ऑपरेशन झाले. एवढे सगळे कष्ट घेऊन आज त्या बैलाने या जगाचा निरोप घेतला. पण प्रश्न असा आहे, की शासकीय दवाखान्यात शासनाकडून सध्या हॅन्ड ग्लोजचा पुरवठा नाही का? पशुवर उपचार करण्यासाठी औषधींचा पुरवठा नाही का? जर शासनाने सर्व काही पुरवठा करून दिला असेल तर मग एखाद्या शेतकरी कुटुंबाला आपले मंगळसूत्र गहाण ठेवून औषधं का आणावी लागतात हा प्रश्न आहे. आता तरी सरकारने या प्रकरणांची गंभीर दाखल घेऊन दोषींवर कारवाईचे करण्याची गरज आहे. जेणेकरुन इतर शेतकऱ्यांवर अशी दुर्दैवी वेळ येणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget