एक्स्प्लोर

चालू बिल भरलेल्या शेतकर्‍यांच्या वीजजोडण्या कापू नयेत; देवेंद्र फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश 

Devendra Fadnavis : चालू बिल भरलेल्या शेतकर्‍यांच्या वीजजोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.  

मुंबई : ज्या शेतकर्‍यांनी शेतीपंपाचे चालू बिल भरले आहे अशा शेतकर्‍यांच्या वीजजोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी चालू बिल भरलेल्या शेतकऱ्यांचे विज जोडणी कापल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. 

वीज बिल न भरल्याने वसुली सुरु असते. परंतु, अतिवृष्टीमुळे यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचं नुकसान झाल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना सूट द्यावी असे आदेश दिले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ज्यांकडे नुकसान नाही त्यांनी नियमित वीज भरणा करावा. नुकसानग्रस्त भागात भविष्यात वसुली करता येईल. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे कनेक्शन तोडू नका असे आदेश दिले आहेत.   

यंदा प्रथम अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशातच आता शेतीपंपांची बिले थकल्याने वीज वितरण कंपन्यांनी शेतीपंपांची कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर महावितरणने बिल वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याचा, छोट्या डीपी काढण्याचा धडाका लावला आहे. किमान थकलेली दोन बिले तरी शेतकऱ्यांनी भरावीत असे आवाहन महावितरण करत आहे.

वीज वितरण कंपन्यांच्या कनेक्शन तोडणी मोहिमेमुळे विहिरीत पाणी असून देखील शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकं सुकून जात आहेत. आधी अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन तोडणी मोहिमेमुळे दुहेरी फटका बसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू बिल भरलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे कनेक्शन तोडू नका असे आदेश दिले आहेत.  

शेतकऱ्यांमध्ये संताप 
थकलेली वीज बिले वसूल करण्यासाठी वीज कंपन्यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यात वीजपूरवठा खंडीत केला जात आहे. यामध्ये लातूर, बीडसह उस्मानाबाद जिल्ह्यातील 18 हजार कृषिपंपांची वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात देखील शेती पंपांचे कनेक्शन तोडण्याची मोहीम राबवली जात आहे. वीज कंपन्यांच्या या मोहिमेविरोधात शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  

महत्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांना आता वसुलीचा शॉक! लातूर, बीडसह उस्मानाबाद जिल्ह्यातील 18 हजार कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडीत 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
Embed widget