एक्स्प्लोर

Devendra Fadanvis : महाराष्ट्रात महिला सुरक्षित, रात्री 12 वाजताही फिरताना महिलांना सेफ्टी वाटतं; देवेंद्र फडणवीसांनी मांडली आकडेवारी

Devendra Fadanvis On Women's Safety : महाराष्ट्रात महिला या एकदम सुरक्षित असून राज्यातील गुन्ह्यांच्या संख्येमध्येही मोठी घसरण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

मुंबई: महाराष्ट्र हा गुन्ह्यांच्या बाबतीत देशात 20 व्या क्रमांकावर आहे, राज्यातील महिला सुरक्षित असून मुंबईत रात्री 12 वाजताही महिला सुरक्षित फिरतात अशी माहिती आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधान परिषदेत दिली. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेती स्थिती काय आहे याची आकडेवारी फडणवीसांनी माडंली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? (Devendra Fadanvis On Women's Safety) 

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यावर विधानपरिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईत रात्री 12 वाजता फिरताना महिलांना जी सेफ्टी वाढते ती दिल्लीत वाटत नाही. राज्यात 3 लाख 94 हजार गुन्हे घडले होते आता त्यात 20 हजाराची कमी आली आहे. गुन्ह्यांच्या बाबत आपण देशात आठव्या क्रमांकावर आहोत. खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यांमध्ये आपण 16व्या क्रमांकावर आहोत. महिलांवरील गुन्ह्याच्या बाबत देखील आपण मागे अहोत. बलात्काराच्या संदर्भात 16 व्या क्रमांकावर आहोत. अपहरण संदर्भात विचार केला तर आपण नवव्या क्रमांकावर आहोत. 

महिला अत्याचार प्रकरण हातळण्यासाठी आपण व्यवस्था केली आहे. महाराष्ट्र गुन्हेगारीकडे वळला आहे अशी परिस्थिती नाही. नर्कोटिक्स मध्ये 2020 साली 5 हजार 300 आरोपी वर कारवाई केली आहे. मागील 2 वर्षांत आपण 24 हजार आरोपींवर कारवाई केली आहे. मुंबईत 2 हजार 400 पान टपऱ्या आपण नष्ट केल्या आहेत.  नागपूरमध्ये ड्रग फ्री नागपूर अशी मोहीम राबवली. यामध्ये 1150 ड्रग पेडलर पकडले आहेत. 

ललित पाटील प्रकरणात खुलासा आधीच केला आहे. ललित पाटील याचा कारखाना 2020 साली सुरू करण्यात आला होता. अमली पदार्थांवर कारवाई करण्यासाठी आपण सर्व युनिटला सूचना दिल्या आहेत. मागील 8 महिन्यात 8 हजार आरोपी ताब्यात घेतले आहेत. 1167 नव्या कारवाया आपण केल्या 967 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. हुक्का पार्लर वर कडक कारवाई केली जाईल. 

पोलीस भरती केली, पोलीस दलाचा तणाव कमी केला

राज्यातील पोलीस पदे रिक्त होती. 23 हजार पदे आपण भरली आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाची मर्यादा वाढवली आहे. लोकसंख्येच्या अनुषंगाने आपण आता नव्याने आकृतीबंध करत आहोत. 187 नवी पोलीस ठाणे निर्माण करण्याला आपण परवानगी दिली आहे. 329 कोटी रूपयांची मंजुरी देखील दिली आहे. पोलीस दलाचा तणाव कमी करण्यासाठी आम्ही विविध योजना केल्या आहेत. 55 वर्ष वरच्या पोलिसांना 8 तास करावी अशा सूचना दिल्या आहेत. 

महिला आणि मुलींच्या बाबत एक चर्चा समोर आली आहे. 2020 साली 4 हजार 517 मुली आणि 63 हजार महिला बेपत्ता झाल्या होत्या.  मुलीच्या प्रकरणात आपला तपास 90 टक्के आहे तर महिलांच्या बाबत आपलं डीटेक्शन हे 86 टक्के आहे. 

नागपूरबाबत माहिती द्यायची आहे की मागील आठ महिन्यात 338 मुली बेपत्ता झाल्या आहेत यातील केवळ 12 मुलींचा शोध लागणे बाकी आहे. बाकी सर्व मुली मिळाल्या आहेत. 67 हजार महिला आणि पुरुष यांचा तक्रारी पोलिसांनी ऐकून घेतल्या आहेत. तसेच वृद्ध नागरिकांच्या नोंदी देखील ठेवल्या आहेत. 

वर्धा आणि गडचिरोलीमध्ये दारू एक्सपोर्ट होते अशी माहिती विरोधी पक्षनेते यांनी दिली. आपण याठिकाणी करवाई वाढवत आहोत. सायबर गुन्ह्यांच्या बाबत आपण एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करत आहोत. यामधे बँकिंग, सोशल आशा विविध क्षेत्रातील लोकांना आपण एका ठिकाणी आणून क्विक रिस्पॉन्स साठी प्रयत्न करत आहोत.

मधल्या काळात जे सरकार होते त्यांनी विदर्भात अधिवेशन घेतलं नव्हतं. या अधिवेशनात आमची अपेक्षा होती की विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी प्रस्ताव येईल मात्र तसं झालं नाही. आमच्याकडे मंत्र्यापेक्षा महामंत्री पॉवरफुल असतो. आगामी काळात कोण मुख्यमंत्री होईल सांगता येणार नाही. प्रत्येकाचे अच्छे दिन येणार आहेत. प्रत्येकाने अपेक्षा ठेवायची आहे

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget