एक्स्प्लोर

अकरावी ऑनलाईन प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांना भेडसावणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

सर्व बोर्डांचे दहावीचे निकाल लागले असून आता 11 वीसाठी प्रवेशाला सुरुवात झाली आहे. परंतु 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालक काही प्रमाणात गोंधळलेले आहेत. प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत.

मुंबई : सर्व बोर्डांचे दहावीचे निकाल लागले असून आता 11 वीसाठी प्रवेशाला सुरुवात झाली आहे. परंतु 11 वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालक काही प्रमाणात गोंधळलेले आहेत. प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबतचा विद्यार्थ्यांसह पालकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी एबीपी माझाने शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे आणि प्रवेश नियंत्रक रमेश देशपांडे यांच्याशी बातचित केली. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबतचे विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. त्यावर अहिरे यांनी दिलेली उत्तरे विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेताना उपयोगी पडतील. 11 वी ऑनलाईन प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांना भेडसावणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे 1) 11 वी प्रवेशावेळी कोणत्या महविद्यालयांना प्राधान्यक्रम द्यावा? - 11 वी प्रवेशाचा प्राधान्यक्रम देताना माहिती पुस्तकेतील किंवा वेबसाईटवरील महविद्यालयांची माहिती नीट वाचून त्या महविद्यालयातील एकूण जागा, कॉलेज अनुदानित आहे की विना अनुदानित, त्या कॉलेजचा मागील वर्षीचा कट ऑफ किती होता. याबाबतचा विचार करुनच महविद्यालयांना प्राधान्यक्रम द्यावा 2) आपण किती महविद्यालय प्राधान्यक्रम म्हणून देऊ शकतो? - आपण कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 10 महविद्यालय प्राधान्यक्रमात पर्याय म्हणून देऊ शकतो 3) पहिल्या प्राधान्यक्रमात दिलेले महविद्यालय पहिल्या गुणवत्ता यादीत मिळाले तर त्या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे का ? - होय, तुम्हाला पहिल्या क्रमांकाचे महविद्यालय प्राधान्यक्रमात मिळाले असेल तर ते तुम्हला घेणे अनिवार्य आहे. अन्यथा तुम्ही प्रवेश फेरी 1 ते 3 मधून बाहेर होऊ शकता 4) विद्यार्थ्याला पहिल्या क्रमांकाचे महविद्यालय मिळाले आणि काही कारणास्तव तो त्या महविद्यालयात प्रवेश घेऊ शकला नाही तर? - असे झाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश फेरी 1 ते प्रवेश फेरी 3 पर्यंत कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेता येणार नाही. त्याला विशेष फेरीमध्ये पुन्हा एकदा प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन उरलेल्या जागांसाठी प्राधान्यक्रम द्यावा लागेल. अकरावी प्रवेशासाठी वाढीव जागा देण्याचा शासनाचा निर्णय, शिक्षणमंत्र्यांची घोषणा | ABP Majha 5) विद्यार्थ्याला प्राधान्यक्रमात क्रमांक 1 चे महविद्यालय न मिळता क्रमांक 2 किंवा क्रमांक 3 चे महविद्यालय पहिल्या फेरीत मिळाले आणि ते महाविद्यालय त्याला नको असल्यास आणि त्याला क्रमांक 1 चे महविद्यालय हवे असल्यास काय करावे? - पहिल्या फेरीत क्रमांक 1 चे महविद्यालय विद्यार्थ्यांला मिळले नाही, तर तो प्रवेश फेरी 2 साठी पुन्हा एकदा प्राधान्यक्रम देऊन क्रमांक 1 च्या महविद्यालयासाठी प्रयत्न करू शकतो. परंतु, पहिल्या फेरीत मिळालेले क्रमांक 2 किंवा क्रमांक 3 किंवा इतर क्रमाकांचे महाविद्यालय हे प्रवेश फेरी 2 मध्ये प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार नाही 6) एकूण किती फेऱ्या असणार? सर्व विद्यार्थ्यांना 11 वी प्रवेश मिळणार का? - एकूण 3 प्रवेश फेऱ्या आहेत. त्यानंतर विशेष फेरी असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. कारण पास विद्यार्थ्यांपेक्षा 11 वी साठी जास्त जागा आहेत. 7) एसएससी विद्यार्थ्यांना महविद्यालयात प्रवेशासाठी जागा वाढवण्यात आल्या आहेत, त्याचा फायदा कसा होणार ? - शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर राज्यभरातील महाविद्यालयांनी 5 ते 10 टक्के जागा वाढवून दिल्या आहेत. त्यामुळे आपल्या आवडीच्या महविद्यालयात प्रवेश मिळण्याचे मार्ग वाढले आहेत. 8) नामवंत अल्पसंख्याक महविद्यालयातील जागा खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी कधी खुल्या होणार? - प्रवेश फेरी 1 ते प्रवेश फेरी 3 नंतर विशेष फेरी दरम्यान अल्पसंख्याक महविद्यालयातील 50 टक्के अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या उरलेल्या जागा या खुल्या प्रवर्गासाठी खुल्या करण्यात येतील.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget