एक्स्प्लोर

LIVE UPDATES | पोलीस कर्मचार्‍याने परळीतील उड्डाणपूलावरुन मारली उडी

Exclusive : कोरोना लसीकरण कोणत्याही अडथळ्याविना, दोन्ही लशी सुरक्षित : आरोग्यमंत्री राजेश टोपे केंद्र शासनाने दारिद्र रेषेखालील घटकांना कोरोना विरोधातील लस मोफत पुरवावी : राज्यमंत्री यड्रावकर दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

LIVE UPDATES | पोलीस कर्मचार्‍याने परळीतील उड्डाणपूलावरुन मारली उडी

Background

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Exclusive : कोरोना लसीकरण कोणत्याही अडथळ्याविना, दोन्ही लशी सुरक्षित : आरोग्यमंत्री राजेश टोपे

सकाळपासून कोरोना लसीकरण कोणत्याही अडथळ्याविना पार पडलं आहे. लस घेतलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळालं. लसीकरणाचा पहिला टप्पा तीन ते चार महिने चालेल, अशी माहिती एबीपी माझाच्या मुलाखतीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते म्हणाले की, लसीकरणासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसारच काम सुरू आहे. केंद्र शासनाच्या सूचना संपूर्ण राज्यासाठी बंधनकारक आहेत आणि त्यांच्या सूचनेचे स्वागत होत आहे. देशामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम केंद्र शासनाच्या वतीने जात आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही चुकू नये एवढी काळजी घेतली आहे, असं ते म्हणाले.

टोपे म्हणाले की, आज देण्यात आलेल्या कोवॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लशी सुरक्षित आहेत. थोड्या टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या आहेत. लसीबाबत शासन आणि वैज्ञानिकांवर विश्वास ठेवा. यात सहभाग घेऊन सकरात्मक प्रतिसाद देऊन सुरक्षित राहावे असं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले की, सर्वांच्या चेहऱ्यावर मी आज आनंद पाहिला. नर्स, वार्ड बॉय यांच्या लसीकरणाच्या वेळी मी त्यांच्यासोबत होतो. हे लसीकरण चांगले पार पडण्याचा मला विश्वास आहे, असं ते म्हणाले.

केंद्र शासनाने दारिद्र रेषेखालील घटकांना कोरोना विरोधातील लस मोफत पुरवावी : राज्यमंत्री यड्रावकर

कोरोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ म्हणजे, कोरोना विरोधातील लढाईचा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज असून ही लसीकरण मोहीम राज्यात प्रभावीपणे राबविली जाईल, असे सूतोवात राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं. तसेच केंद्र शासनाने कोरोना विरोधातील लस मोफत देण्याच्या यादीत दारिद्र रेषेखालील घटकांचा समावेश प्राधान्याने करावा अशी मागणी राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी केली आहे. काल कोल्हापूर जिल्ह्यातील कोविशिल्ड या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरोळ ग्रामीण रुग्णालयामधून करण्यात आला.

कोरोना महामारी आणि लसीकरणासाठी 24X7 कॉल सेंटर; हेल्पलाईन नंबर जारी

कोविड -19 विरुद्ध देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार आहे. यासाठी सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे. सर्वात आधी फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोनाची लस दिली जाणार आहे. कोविड 19 महामारी, लसीकरण सुरुवात आणि को-विन सॉफ्टवेअरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक समर्पित 24x7 कॉल सेंटर - 1075 - देखील स्थापन करण्यात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की, कोविड 19 साथीचे रोग आणि लसीकरणाविषयी माहिती मिळावी यासाठी 24 तास कॉल सेंटर सुरू केले आहे. कोरोना व्हायरस आणि कोरोना लसीकरणाबाबत विविध माहिती साठी 1075 हा नंबर सर्वांसाठी देण्यात आला आहे.

21:31 PM (IST)  •  18 Jan 2021

परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचार्‍याने परळीतील उड्डाणपूलावरुन उडी मारली. ही खळबळजनक घटना रात्री साडे आठला घडली कर्मचार्‍याने उडी का मारली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुनील घोळवे असे पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती आहे. सायंकाळच्या सुमारास घोळवे यांनी शहरातील उड्डाणपुलावर दुचाकी उभी केली. त्यानंतर पुलावरुन खाली उडी मारली. यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पायाला गंभीर जखम झाल्यामुळे लातुर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
11:16 AM (IST)  •  18 Jan 2021

धनंजय मुंडे यांच्याविरोधात भाजप महिला कार्यकर्त्यांचं आंदोलन, 'धनंजय मुंडे राजीनामा द्या'; भाजपची मागणी, मुंबईत चित्रा वाघ यांच्या नेतृत्त्वात आंदोलन.
08:44 AM (IST)  •  18 Jan 2021

समृद्धि महामार्गाच्या कामामुळे 5 गावांचा विद्युत पुरवठा खंडित. मेहकर तालुक्यातील साब्रा, फर्दापुर , कंबरखेड, गौढाळा, व कल्याना या पाच गावातील समृद्धी महामार्गावरील कामामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतातील पिकांचं पाण्याविना नुकसान होत आहे. पाच गावातील ग्रामस्थ पाण्यापासुन वंचित असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावरील कच्च्या रस्त्यावर मोटरसायकली आडव्या लावून रास्ता बंद केला. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या तसेच समृद्धी ठेकेदारकडे सुद्धा कित्येक वेळा गेले असता उडवाउडवीची उत्तरे देत आहेत त्यांमुळे आता काम बंद करुण रस्ता अडविला आहे जो पर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत सुरु केला जात नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच शेतातील पिकांचे पाण्याविना झालेल्या नुकसानाची भारपाई देण्यात यावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे
23:00 PM (IST)  •  17 Jan 2021

पालघर - पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यात पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का,3.5 क्षमतेचा बसला धक्का. अनेक दिवस डहाणू तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के शमले होते. मात्र आज पुन्हा 10 वाजून 45 सेकंदाच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद झाली आहे. हा धक्का तलासरीमधील अच्छाड, धुंदलवाडी, आंबोली, बहारे या भागात तर डहाणू तालुक्यातील कासा, सुर्यानगर ,धानीवरी, ऊर्से या भागात जाणवल्याची माहिती नागरिकांना दिली आहे
19:20 PM (IST)  •  17 Jan 2021

मुंबईत एका 32 वर्षीय तरुणानं ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल 22,000 लोकांना फसवल्याचे समोर आलं असून याद्वारे त्याने 70 लाख रुपयांना गंडा घातला आहे.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget