एक्स्प्लोर

Corona Lockdown | मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील ऐतिहासिक अमृतांजन पूल पाडणार

या दरम्यानची वाहतूक अंडा पॉईंट ते लोणावळा एक्झिट दरम्यानची वाहतूक ही जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळवण्यात येणार आहे.

पिंपरी : कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. आपल्या जीवनातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होत आहे. पण याच कोरोनाचा फायदा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील रखडलेल्या एका कामासाठी होणार आहे. कोरोनामुळं वाहनांमध्ये लक्षणीय घट झाल्याने याच मार्गावरील ऐतिहासिक अमृतांजन पूल हटविण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. जून 2017 मध्ये हा पूल हटवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तेव्हा तसं जाहीर केलं होतं. मात्र ब्रिटिशकालीन हा ठेवा जतन करण्याची मागणी धरत तेव्हा यास विरोध झाला होता. पण आता भारत लॉकडाऊन असल्याने कोणीच घराबाहेर पडू शकणार नाही, हीच बाब लक्षात घेत 4 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान हा पूल नेस्तनाबूत केला जाईल. या दरम्यानची वाहतूक ही जुन्या पुणे-मुंबई अर्थात राष्ट्रीय महामार्ग नंबर चार कडे वळवण्यात येणार आहे. 1830 साली हा ऐतिहासिक अमृतांजन पूल उभारण्यात आला होता. खंडाळा-बोरघाटातील मार्ग सुकर करण्यासाठी ब्रिटिश अधिकारी सर कॅप्टन ह्युजेस यांनी जनरल जॉन मालकोल्म जी.सी.ई. अँनो डोमिनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूल उभारण्यात आला होता. बोरघाटातील रेल्वेच्या रिव्हसिंग पॉइंट येथे उभारलेला हा पूल कोनशिला पुलाच्या प्राचीनतेची साक्ष देतो. जुन्या पुणे-मुंबई महामार्गासाठी हा पूल ब्रिटिशांकडून बनविण्यात आला होता. मात्र या मार्गावर ताण वाढू लागला म्हणून 2000 साली पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग उभारण्यात आला. हा द्रुतगती मार्ग याच अमृतांजन पुलाखालून जातो. पण कालांतराने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची अपघात आणि वाहतूक कोंडी अशी ओळख झाली. त्यात अमृतांजन पुलाचा मोठा वाटा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कारण सहा पदरी असणारा 90 किलोमीटरचा हा मार्ग अमृतांजन पुलाखाली चार पदरी होतो आणि हीच बाब वाहतूक कोंडी आणि अपघातास कारणीभूत ठरते. म्हणूनच जून 2017 मध्ये पूल हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि आता एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तो हटविण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. कोरोनामुळं द्रुतगती मार्गावरील वर्दळ कमी झाल्याचा असा फायदा घेतला जाणार आहे. येत्या 4 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान हा ऐतिहासिक पूल नेस्तनाबूत केला जाईल. तेव्हा अंडा पॉईंट ते लोणावळा एक्झिट दरम्यानची वाहतूक ही जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळवली जाईल. अमृतांजन पूल रेल्वे विभागामध्ये मोडतो. त्यामुळं रेल्वे विभाकडे ही एमएसआरडीसी आधीच पत्र व्यवहार केलेले आहेत. पण प्रश्न हा आहे की ऐतिहासिक अमृतांजन पूल हटवल्यानंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी रोखली जाणार आहे का? हा प्रश्न उपस्थितीत होतो. Mumbai-Pune Expressway | कोरोनामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वाहतुसाठी बंद, अत्यावश्यक सेवेसाठी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget