एक्स्प्लोर

औरंगाबादमध्ये दोन गट भिडले, घरं आणि दुकांनांचं नुकसान

मोतीकारंजा परिसरात काही किरकोळ कारणांवरुन दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात दोन गटात झालेल्या वादात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे. सध्या औरंगाबादेत जमावबंदी असून तणावपूर्ण शांतता आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन औरंगाबाद पोलिस आणि प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. काल संध्याकाळी मोतीकारंजा परिसरात काही किरकोळ कारणांवरुन दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास 25 दुकाने जाळण्यात आली आहेत. या घटनेत आतापर्यंत 30 ते 40 जण जखमी झाले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी हवेत गोळीबार केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे कसोशीनं प्रयत्न सुरु आहेत. काल संध्याकाळपासून मोतीकारंजा परिसरात वाद सुरु असल्यानं तणावाची स्थिती आहे. दरम्यान, औरंगाबादचे पालकमंत्री दीपक सावंत, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री (शहर) डॉ. रणजित पाटील हे औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत.

पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याशी बातचित :

या राड्यात पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. सहाय्यक पोलिस आयुक्तांसह दहा पोलीस जखमी झाले आहेत. दोन गटानं केलेल्या दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलीस जखमी झाले. यातील कोळेकर आणि परोपकारी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर इतर पोलिसांना घाटीत दाखल केले. औरंगाबादमध्ये दोन गट भिडले, घरं आणि दुकांनांचं नुकसान प्रकरण काय आहे? महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहिम गुरुवारपासून सुरु केली आहे. पहिल्या दिवशी या भागातील एका धार्मिकस्थळाचे नळ कनेक्शन तोडण्यात आले होते. तेव्हा एका गटाने दुसऱ्या एका धार्मिकस्थळाचे नळ कनेक्शन तोडण्याची मागणी केली. यावरुन मनपाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या धार्मिक स्थळाचे नळ कनेक्शन काल तोडले. याच कारणावरुन दोन गट शुक्रवारी सायंकाळी  भिडले. एका गटाने मोतीकारंजा रोडवरील दिसेल त्या दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात दुकानांबाहेर असणाऱ्या कूलर, सामानासह गाड्यांची तोडफोड, जाळपोळ सुरु केली. हे पाहून दुसरा गटही रस्त्यावर उतरला. दोन्ही बाजूकडील सात ते आठ हजारांचा जमाव रस्त्यावर उतरला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तयारीनिशी घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक करण्यात आली. औरंगाबादमध्ये दोन गट भिडले, घरं आणि दुकांनांचं नुकसान पोलिसांच्या गाड्यांचाही जाळपोळ, दहा पोलिस जखमी यात पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. सहाय्यक पोलीस आयुक्तांसह दहा पोलीस जखमी झाले आहेत. दोन गटाने केलेल्या दगडफेकीत सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलीस जखमी झाले. यातील कोळेकर आणि परोपकारी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर पोलिसांना घाटीत दाखल केले. औरंगाबादमध्ये दोन गट भिडले, घरं आणि दुकांनांचं नुकसान अफवांवर विश्वास ठेवू नये, महापौरांचे आवाहन “पाणी भरण्यावरुन किरकोळ वाद झाला, त्यावरुन तुंबळ हाणामारी झाली. किरकोळ वादातून हे झालं आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. परिस्थिती नियंत्रणात आहे. खासदारही रात्रभर इकडे आहेत. कोणताही चुकिचा प्रकार घडू नये म्हणून सगळेजण प्रयत्न करत आहेत.” असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. स्थानिक आमदार अतुल सावे यांचं जनतेला शांततेचं आवाहन “घटनेची कारणं समोर आली नाहीत. चौकशीनंतर कळेल. पण औरंगाबादकरांना आहन करतो की शांतता पाळावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे घातलं असून, रात्रीच मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे.”, असे स्थानिक आमदार अतुल सावे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. अफवांवर विश्वास ठेवू नका : दीपक केसरकर हा वाद मोठा होण्यामागे अफवांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले. तसेच, आपण घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचेही केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार : गृहराज्यमंत्री रणजित पाटील औरंगाबादमधील घटनेनंतर गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील सकाळी साडेअकराला तातडीने अकोल्यावरुन औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. सरकार या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची माहिती डॉ. रणजित पाटील यांनी दिली. दरम्यान, सोशल मीडियावर अफवा न पसरवता शांतता राखण्याचं आवाहन डॉ. रणजित पाटील यांनी औरंगाबादच्या जनतेला केलं आहे. दरम्यान, औरंगाबादमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून, तणावपूर्ण शांतता आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. पाहा आतापर्यंतचे (सकाळी 7 वा.) अपडेट :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget