एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'गणेशोत्सवासाठी 7 ऑगस्टपर्यंत या, अन्यथा 1000 रुपये दंड', कोकणातील काही गावांची चाकरमान्यांसाठी नियमावली
गणेश चतुर्थी कोकणातील मोठा सण असल्याने या सणाला मोठ्या संख्येने मुंबई-पुण्याहून चाकरमानी गावोगावी दाखल होतात. सध्या कोरोनामुळं चाकरमान्यांच्या गावी येण्याबाबत अनेक नियम घातले जात आहेत.
!['गणेशोत्सवासाठी 7 ऑगस्टपर्यंत या, अन्यथा 1000 रुपये दंड', कोकणातील काही गावांची चाकरमान्यांसाठी नियमावली Come for Ganesh Utsav till 7th August, otherwise a fine of Rs.1000, decision of some villages in Konkan 'गणेशोत्सवासाठी 7 ऑगस्टपर्यंत या, अन्यथा 1000 रुपये दंड', कोकणातील काही गावांची चाकरमान्यांसाठी नियमावली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/20170725/konkan-ganesh.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सिंधुदुर्ग : कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाईन असल्याने उशिरा येणाऱ्या चाकरमान्यांना दंड आकारण्यात येणार आहे. एकीकडे चाकरमान्यांवरून कोकणात राजकीय नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला पहायला मिळतो आहे. तर दुसरीकडे गावागावात वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळेच कोकणात गणपतीला येणाऱ्या चाकरमान्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
याअगोदर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काही बाबी तयार करून राज्य शासनाला पाठवणार आहेत, असं इतिवृत्त व्हायरल झालं. त्यातील सर्व बाबी रद्द करण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला. मात्र त्यातील महत्त्वाची बाब कोरोनाच्या काळात तयार केलेल्या ग्रामसमितीने हेरली आहे. 7 ऑगस्टपर्यंत गावात या स्वागत करू, परंतु 7 ऑगस्ट नंतर आलात, तर दंड आकारू असा ठराव कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रामपंचायतीने घेतला आहे.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येणाऱ्या चाकरमान्यांना बांद्याजवळील रोणापाल गावात येणाऱ्यांना 7 ऑगस्टपूर्वी येण्याचे आवाहन ग्राम कृती दलाने केलं आहे. शासनाचे नियम बाजूला ठेवून स्थानिक ग्राम कृती दलाने घेतलेलेच निर्णय सर्वांना मान्य करावे लागतील. असा एकमुखी निर्णय ग्राम कृती दल समिती व रोणापाल ग्रामस्थांनी घेतला.
कोकणातील गणेशोत्सवावर देखील कोरोनाचं सावट; आरती, भजन, चाकरमान्यांसाठी नियम
गणेशोत्सव जवळ आल्याने कोकणात आता क्वारंटाईन वरुन पुन्हा एकदा गोंधळ सुरु झाला आहे. क्वारंटाईनचा कालावधी 14 वरून 7 दिवसाचा करावा, अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर विरोधी पक्ष भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी क्वारंटाईन कालावधी असूच नये, अशी मागणी केली आहे. मात्र 14 दिवसाचा क्वारंटाईन कालावधी हवाच अशी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची ठाम भूमिका आहे. यामुळे इथे आड तिथे विहिर अशी अवस्था चाकरमान्यांची झाली आहे.
गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना क्वारंटाईनच्या मुद्यावरून मतमंतातरे असताना आता ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन स्थानिक पातळीवर 14दिवसांचाच क्वारंटाईन कालावधी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी चाकरमान्यांना 7 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. सात ऑगस्टपर्यंत तुम्ही या, चौदा दिवस क्वारंटाईन व्हा आणि मगच गणेशोत्सव साजरा करा. कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रामपंचायतीने तर 7 तारखेनंतर येणाऱ्या चाकरमान्यांना एक हजार रूपयांचा दंडच आकारला आहे. पाच ते दहा टक्के चाकरमान्यांनासाठी आम्ही पूर्ण गावातील लोकांच आरोग्य धोक्यात टाकू शकत नसल्याचं येथील सरंपचांच मत आहे. सरकारने कोणताही निर्णय घेतला तरी 14 दिवस क्वारंटाईन आणि उशिरा येणाऱ्यांना एक हजार दंड असा निर्णय आपण बैठकीत घेतल्याचं त्यांनी सांगितलंय.
दोडामार्ग तालुक्यात गणेश चतुर्थीला गावात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी क्वारंटाईनचा कालावधी 14 दिवसांचाच राहणार आहे. गोव्यात दोडामार्ग मधील अनेक जण कामासाठी जातात. मात्र त्यांनाही 14दिवस अगोदर गावात येणं बंधनकारक केलं आहे. तालुक्यातील तीन जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांची गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवरील नियोजनासाठी दोडामार्ग मधील महालक्ष्मी सभागृहात प्रभारी तहसीलदार संजय कर्पे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या संयुक्त बैठकीत हे ठरविण्यात आले.
गणेश चतुर्थी कोकणातील मोठा सण असल्याने या सणाला मोठ्या संख्येने मुंबई-पुण्याहून चाकरमानी गावोगावी दाखल होतात. त्यामुळे चाकरमान्यांचे क्वारंटाईन 14 दिवसांचेच राहील. ज्या चाकरमान्यांना होम क्वारंटाईन करणे सुरक्षेच्या दृष्टीने शक्य असेल अशांचे होम क्वारंटाईन करावे व ज्या चाकरमान्यांचे होम क्वारंटाईन शक्य नसेल त्यांचे गावातच संस्थात्मक क्वारंटाईन करावे. गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय गावागावात घेण्यात येत आहे. मात्र राज्य शासनाने कोकणातील चाकरमान्यासाठी अजून कोणताही निर्णय केलेला नाही.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)