एक्स्प्लोर

कोकणातील गणेशोत्सवावर देखील कोरोनाचं सावट; आरती, भजन, चाकरमान्यांसाठी नियम

कोकणातील गणेशोत्सवावर देखील आता कोरोनाचं सावट दिसू लागलं आहे. कारण, मोठ्या थाटात, जल्लोषात साजरा केला जाणारा कोकणातील गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय आता गावकरी करताना दिसत आहेत.

रत्नागिरी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या देशासह राज्यात देखील लॉकडाऊन अद्याप देखील सुरूच आहे. याचा परिणाम अनेक उद्योगधंद्यांवर देखील झाला आहे. शिवाय, मार्चपासून आलेले सण देखील अत्यंत साधेपणानं साजरे केले गेले. त्यानंतर आता या कोरोनाचा परिणाम गणेशोत्सवावर देखील होताना दिसत आहे. मुंबईतील अनेक प्रसिद्ध मंडळांनी गणेशोत्सव अत्यंत साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोकणातील गणेशोत्सवावर देखील आता कोरोनाचं सावट दिसू लागलं आहे. कारण, मोठ्या थाटात, जल्लोषात साजरा केला जाणारा कोकणातील गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय आता गावकरी करताना दिसत आहेत. आरती, भजन आणि मुंबई-पुण्यासह आपल्या कोकणातील मूळ गावी येणाऱ्या चाकरमान्यांना देखील काही नियम आखून दिले जाणार आहेत. त्याचं पालन करणं हे सर्व चाकरमान्यांना बंधनकारक असणार आहे. यामागे केवळ एकच उद्देश तो म्हणजे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणं. कारण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आता कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना काही नियम आखून दिले जात आहेत. शिवाय, दोन्ही जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती याबाबतचा ठराव देखील करताना दिसून येत आहेत. चाकरमान्यांना काय असणार नियम? गणेशोत्सव आणि कोकण याचं नातं सर्वांना ठाऊक आहेच. अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या कोकणी माणूस बाप्पा घरी विराजमान होणार म्हटल्यावर आपल्या कोकणातील मुळगावी येतो. कोकणात घरोघरी बाप्पाचं आगमन होतं. विद्युत रोषणाई आणि बाप्पाचं गुनगाण गाणाऱ्या गाण्यांनी सारं वातावरण प्रसन्न तर होतं शिवाय, भारावून देखील जातं. गजानन घरी विराजमान झाल्यापासून ते अगदी पाच दिवस ते एकवीस दिवस बाप्पाचं विसर्जन होईपर्यंत घरांघरांमध्ये भजन आणि आरतीचे सूर ऐकू येतात. गणरायाच्या नैवेद्यासाठी होणारी लगबग तर काय विचारता. अगदी मध्यरात्री ते पहाटेपर्यंत भजनाचे सूर ऐकू. ढोलकी, मृदुंगावर पडणारी थाप कानी पडते. मुंबई, पुणे किंवा जगाच्या पाठीवर कुठंही असला तरी कोकणी माणूस घरी येतो आणि विघ्नहर्त्याला जल्लोषात आपल्या घरी आणतो. त्याच्या मिरवणुकीचा थाट तर काय वर्णावा! पण, यावर यंदा मर्यादा येणार आहेत. आरती, भजनं आणि मिरवणुका किती मोठ्या प्रमाणात निघतील याबाबत देखील आता शंका निर्माण झाली आहे. कोरोनाच्या वाढच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकानं आपल्या घरी किंवा शक्य झाल्यास दोन घरांनी एकत्र येत लंबोदराची आरती करावी आणि भजन करावं असा मतप्रवाह आता पुढे येत आहे. शिवाय, चाकरमान्यांनी गावी येताना किमान गावी आल्यानंतर 14 दिवसांचा क्वारंटाईनचा नियम पूर्ण करावा. विसर्जनावेळी निघणारी मिरवणूक शक्यतो रद्द करत अत्यंत साधेपणानं विसर्जन व्हावे याबाबत आता गंभीरपणे विचार सुरू झाला आहे. गावातील जाणकार याबाबत आता पुढाकार घेताना दिसत आहेत. केवळ कोरोनाला रोखणं हाच यातील उद्देश असून आता आपल्या लाडक्या बाप्पाचा सण साधेपणानं साजरा करताना कोकणी माणूस आपल्या मनाला देखील मुरड घालणार आहे. मूर्तीशाळांमध्ये देखील निर्माण होत आहेत समस्या! अवघ्या दीड महिन्यांवर गणपती बाप्पाचं आगमन येऊन ठेपलं आहे. पण, सध्या शाडूची माती मिळवताना देखील मूर्तीकारांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय रंग देखील वेळेवर उपलब्ध होतील की नाही याबाबत देखील शंकाच आहे. दुकानं बंद असल्यानं लाखो, करोडोंची उलाढाल ठप्प झाली आहे. तसंच आता सर्व व्यवहार आणि कामधंदे देखील ठप्प असल्यानं मूर्तीकारांना देखील आर्थिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय, अनेकांनी मूर्ती लहान साकारा अशी सुचना देखील मूर्तीकारांना केली आहे. त्यामुळे कोकणातील गणेशोत्सवावर देखील कोरोनाचं संकट असून जगावरचं संकट टळू दे, पुढच्या वर्षी मोठ्या जल्लोषात आणि दिमाखात तुझं स्वागत करू असं गाऱ्हाणंचं कोकणी माणूस विघ्नहर्त्यासमोर आतापासूनच घालत आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगसस्ट 2026 | गुरुवार
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Embed widget