![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे, लवकरच बारसं करायला मिळेल अशी अपेक्षा : मुख्यमंत्री
औरंगाबादमधील संत एकनाथ महाराज रंगमंदिर नाट्यगृहाच्या नूतनीकरणानंतर त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवत कार्यक्रमात सहभाग घेतला.
![औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे, लवकरच बारसं करायला मिळेल अशी अपेक्षा : मुख्यमंत्री CM Uddhav Thackeray Speech at Inauguration of the renovated building of Sant Eknath Maharaj Rangmandir Natyagriha औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे, लवकरच बारसं करायला मिळेल अशी अपेक्षा : मुख्यमंत्री](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/25/8b6627b5d9f95fa246f1cfc368ade604_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद : काही काळापासून रखडलेल्या औरंगाबादमधील संत एकनाथ महाराज रंगमंदिर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले असून नुकताच त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवत उपस्थितांसह अवघ्या महाराष्ट्राला संबोधित केले. यावेळी औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. तसंच तेथील निवडणूकीत शिवसैनिकांनी कधीच निराश केलं नाही पुढेही करणार नाहीत असा विश्वासही दर्शवला. दरम्यान औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून लवकरच केंद्राचा आदेश येईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाला उपस्थित राहिले असताना ठाकरे यांनी औरंगाबादमधील अनेक प्रश्न शिवसेने सोडवले असल्याचं सांगितलं. यावेळी सर्वात मुख्य असं समांतर जलवाहिन्यांच्या कामाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. तसंच मी स्वत: येऊन या कामाची तपासणी करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान संभाजीनगर या नावाचा प्रश्न कायम असून येथील विमानतळाला मात्र छत्रपती संभाजीनगर विमानतळ नाव देण्याचा प्रस्ताव सर्वांनी मंजूर केला असून हा प्रस्ताव सध्या केंद्र दरबारी असून तो लवकर मान्य होईल अशी आशा व्यक्त करत विमानतळाच्या बारसं करायला मिळेलं असंही ते म्हणाले. तसंच जनतेची सेवा करताना राजकारण त्यामध्ये आणता कामा नये. असं ठाकरे यांनी आवर्जून सांगितलं.
मनोरंजन सुविधाही महत्त्वाच्या
नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत असल्याने ठाकरे यांनी प्राथमिक सुविधांसोबत मनोरंजनांची साधनं ज्यामध्ये नाट्यगृह विविध उद्यानं येतात. ती देखील तितकीच महत्त्वाची असल्याचं सांगितलं. त्यामुळे महत्त्वाच्या बांधकामांसह अशाप्रकारच्या वास्तूही उभारणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. तसंच संत एकनाथ महाराज नाट्यगृहाचं नव रुप मला तिथे येऊन पाहायचं आहे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. तसंच या नुतणीकरणासाठी हातभार लागलेल्या सर्वांचे आभार त्यांनी यावेळी मानले.
हे देखील वाचा-
- मुंबई महापालिकेत भाजपचा स्वबळाचा नारा; आरपीआय आणि छोट्या पक्षांना सोबत घेणार
- कौतुकास्पद! जर्मन नौदलाच्या अधिकाऱ्याची तब्येत अचानक खालावली, भारतीय नौदलाकडून तात्काळ मदत
- Mumbra News : पुनर्वसनाशिवाय घरांवर कारवाई होऊ देणार नाही, घरांबाबतच्या मध्य रेल्वेच्या नोटिशीनंतर खासदार शिंदेंची आक्रमक भूमिका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)