![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Chhagan Bhujbal : मनुस्मृती अभ्यासक्रमावर भुजबळ आक्रमक, चातुर्वर्ण्य परंपरा आम्हाला मान्य नाही; परखड भाष्य
Chhagan Bhujbal : राज्यात मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात सहभाग होऊ देणार नसल्याचा थेट इशारा छगन भुजबळांन दिला आहे.
![Chhagan Bhujbal : मनुस्मृती अभ्यासक्रमावर भुजबळ आक्रमक, चातुर्वर्ण्य परंपरा आम्हाला मान्य नाही; परखड भाष्य Chhagan Bhujbal NCP Ajit Pawar Group leader against to include Manache Sholk and Bhagavad Gita in School study Maharashtra Politics Detail marathi news Chhagan Bhujbal : मनुस्मृती अभ्यासक्रमावर भुजबळ आक्रमक, चातुर्वर्ण्य परंपरा आम्हाला मान्य नाही; परखड भाष्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/5b8d876948e8f995cdac72081b83fa901716808069806720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chhagan Bhujbal : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा सहभाग करण्यावर सध्या चर्चा सुरु आहे. पण यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आक्रमक पवित्रा घेत या सगळ्याला विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची असून राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे राज्यातील शालेय शिक्षणांमध्ये मनुस्मृतीचा समावेश हा कदापी सहन करणार नाही. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत आहे तोपर्यंत मनुस्मृती ही शाळांमध्ये शिकवू देणार नाही, असं थेट इशारा यावेळी भुजबळांनी दिला.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी भुजबळांनी यासंदर्भात आपली स्पष्ट भूमिका मांडली. दरम्यान भुजबळांच्या या भूमिकेमुळे महायुतीच्या सरकार आता यासंदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भुजबळांनी काय म्हटलं?
भुजबळांनी म्हटलं की, 'हा महाराष्ट्र ज्या महापुरुषांनी घडवला त्या महापुरुषांची शिकवण लहान मुलांना देणे गरजेचे आहे.जे कां रंजले गांजले । त्यासि ह्मणे जो आपुले ॥ तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥ असा उपदेश देणारे तुकाराम महाराज असतील किंवा अवघे विश्वची माझे घर असे शिकविणारे संत ज्ञानेश्वर महाराज असतील. ‘धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी’ असे शिकवण देणारे महात्मा फुले असतील किंवा "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे"! असं ठणकावून सांगणारे अण्णाभाऊ साठे यांची शिकवण मुलांना दिली गेली पाहिजे.'
पुढे भुजबळांनी म्हटलं की, 'लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पार हा नारा दिल्यानंतर देशामध्ये संविधान बदलले जाणार असा प्रचार विरोधकांनी केला. त्यामुळेच अनेक ठिकाणी दलित वर्ग नाराज झाल्याचं पाहायला मिळतंय. ही चर्चा कुठे शांत होत नाही तर लगेच मनुस्मृतीच्या चर्चा सुरू व्हायला लागल्या आहेत.त्यामुळे आगामी काळात याचा देखील फटका आपल्याला बसू शकतो, हा विचार देखील आपण करायला हवा.'
विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळायला हवा - भुजबळ
भुजबळांन यावेळी विधानसभा निवडणुकांवरही भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीत 2019 ला निवडून आलेल्या जागांचा निकष आमच्यासाठी लावण्यात आला. आता विधानसभेला लोकसभेसारखी जागावाटपाची खटपट होता कामा नये. यासाठी आताच भाजपाला त्यांनी 80-90 जागा देण्याचा शब्द दिलेला त्याची आठवण करून द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. आपण महायुतीमध्ये आलो तेव्हा भाजपाने शब्द दिलेला. विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळायला हवा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)