Breaking News LIVE : महिला काँग्रेस अध्यक्षा आणि माजी खासदार सुष्मिता देव यांचा पक्षाला रामराम, सोनिया गांधींकडे सोपवला राजीनामा
Breaking News LIVE Updates, 16 August 2021 : देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
LIVE
Background
आज सोमवारपासून महाराष्ट्रात निर्बंध शिथील होण्याची अंमलबजावणी होणार आहे. खासकरून राज्यभरातील मॉल, शॉपिंग सेंटर मधील दुकानं रात्री दहावाजेपर्यंत उघडी ठेवण्यास सूट देण्यात आली आहे. मात्र, मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना, दुकान मालकांना आणि या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस पूर्ण असतील तरच प्रवेश मिळणार आहे. यासोबतच खाजगी कार्यालये, लोकल ट्रेन यासाठीही सूट देण्यात आली आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात येत असताना महाराष्ट्र अनलॉक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, हे करताना जर रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन करणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलाय.
मंगलकार्यालयांना सूट
खुल्या जागेत जे विवाह सोहळा होणार त्यांना 200 लोकांची मर्यादा आणि हॉल मधील एकूण जागेच्या 50 टक्के मर्यादा परवानगी दिली आहे. नियमांचे पालन करणार नाही त्यांना दंड आकारण्यात येणार आहे.
खाजगी कार्यालयात 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी
खाजगी कार्यालयात एकाचवेळी गर्दी करण्यापेक्षा 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिफ्टमध्ये काम करता येईल. खाजगी कार्यालयातील कर्मचारी यांचे दोन डोस लस झालेली आहे त्यांना शंभर टक्के क्षमतेने कार्यालय सुरू राहतील.
लोकल प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर 1 लाख 21 हजार नागरिकांनी काढला पास; फेऱ्या वाढवण्याचा निर्णय
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे आज 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल्या प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. मात्र, आज 15 ऑगस्ट आणि रविवार असल्याने स्टेशनवर प्रवाशांची गर्दी दिसून आली नाही. तर सोमवारपासून ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे, त्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये देखील वाढ केली आहे. तसेच 11 ऑगस्टपासून आजपर्यंत एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नागरिकांनी पास काढल्याची आकडेवारी रेल्वेकडून देण्यात आली आहे.
सर्वसामान्य प्रवाशांना लसीकरण पूर्ण झाले असल्यास लोकलने प्रवासाची जरी मुभा देण्यात आलेली असली, तरी आज रविवार आणि 15 ऑगस्ट एकत्र आल्याने स्थानकांवर आणि लोकांमध्ये गर्दी नव्हती. सोमवारी देखील बँक हॉलिडे असल्याने गर्दी कमी असण्याची शक्यता आहे. मात्र, मंगळवारपासून ही गर्दी वाढू शकते. त्यासाठीच मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. सध्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर लोकलच्या 1612 फेऱ्या धावत आहेत. त्या वाढवून 1686 फेऱ्या दर दिवशी चालवण्यात येणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर सध्या धावत असलेल्या 1201 लोकल फेऱ्या वाढवुन 1300 करण्यात आल्या आहेत. या अतिरिक्त लोकल फेऱ्या सोमवारपासून चालवल्या जातील.
दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यापासून 15 ऑगस्टपर्यंत तब्बल 1 लाख 21 हजार 197 नागरिकांनी रेल्वेचे मासिक पास काढले आहेत. मध्य रेल्वेवर 79 हजार 8 जणांनी तर पश्चिम रेल्वेवर 42189 जणांनी पास काढले आहेत. मध्य रेल्वेच्या डोंबिवली तर पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकात पास काढणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या वाढलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.
Corona Update : राज्यात आज 4145 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5811 रुग्ण कोरोनामुक्त, आज राज्यात 100 रुग्णांचा मृत्यू
Corona Update : राज्यात आज 4145 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5811 रुग्ण कोरोनामुक्त, आज राज्यात 100 रुग्णांचा मृत्यू
आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद आंदोलन स्थगित, केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांच्या भेटीनंतर नामकरण कृती समितीचा निर्णय
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक भूमीपुत्रांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तीन आंदोलने करूनही सरकार दखल घेत नसल्याने विमानतळाचे सुरू असलेले काम बंद पाडण्याचा इशारा विमानतळ नामकरण कृती समितीने दिला होता. मात्र आता केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया यांची भेट घेतल्यानंतर विमानतळाचे काम बंद पाडण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
अनिल देशमुखांना अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
अनिल देशमुखांना अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचिकाकर्त्याला आम्ही कोणताही दिलासा देऊ इच्छित नाही, सीआरपीसीनुसार उपलब्ध असलेल्या उपायांचाच याचिकाकर्त्यांनी वापर करावा, न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम यांच्या पूर्णपीठासमोर झाली सुनावणी
लसीकरणाच्या आधारे लोकांमध्ये भेदभाव करणं, घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन , सरसकट सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका
लसीकरणाच्या आधारे लोकांमध्ये भेदभाव करणं, घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन,
सरसकट सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका,
लसीकरण ऐच्छिक असताना मुंबईत लोकल प्रवासाच्या परवानगीसाठी लसीकरण सक्तीचं करणं बेकायदेशीर असल्याचा याचिकेत आरोप,
लस न घेतलेल्या नागरीकांच्या उपजीविकेवर सरकारकडनं गदा आणली जात असल्याचा याचिकेत दावा,
हे उपाय सुचवणा-या अधिका-यांवर फौजदारी कारवाईचीही याचिकेत मागणी,
सामाजिक कार्यकर्ता फिरोझ मिठबोरवाला यांच्या याचिकेवर लवकरच हायकोर्टात सुनावणीची अपेक्षा,
देशातील सध्याची कोरोनास्थिती
कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 22 लाख 25 हजार 513
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 14 लाख 11 हजार 924
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 81 हजार 947
एकूण मृत्यू : चार लाख 31 हजार 642
लसीकरणाची एकूण आकडेवारी : 53 कोटी 57 लाख 57 हजार लसींचे डोस