एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्रात यांना कोणी विचारत नव्हतं तेव्हा आम्ही घेऊन फिरवलं. मात्र, याच भाजपला आता राजकारणातून खांदा देण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला. 

Uddhav Thackeray Dussehra Rally : या देशामध्ये कोणताही पक्ष शिल्लक राहता कामा नये, असं भाजपचं धोरण आहे. तुम्ही आम्हाला संपवायला निघाला आहात. महाराष्ट्रात यांना कोणी विचारत नव्हतं तेव्हा आम्ही घेऊन फिरवलं. मात्र, याच भाजपला आता राजकारणातून खांदा देण्याची वेळ आली आहे, ही वृत्ती संपवावी लागेल, यांचा शिरच्छेदच करावा लागेल, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला. 

आम्हाला भाजपला राजकारणात खांदा द्यायचा आहे 

शिवतीर्थावरून दसरा मेळाव्याला संबोधित करताना भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मी आणि मीच दुसरं कोणी नाही असं चालणार नाही. तुम्ही आम्हाला संपवायला निघाला आहात. आम्हाला भाजपला राजकारणात खांदा द्यायचा आहे. जशी परिस्थिती महाभारतामध्ये अर्जुनची झाली होती मी कोणासोबत लढू, हे माझेच आहेत. कृष्णाने सांगितलं आपला बघू नको. आपल्यासोबत राहतो तो मित्र, आपल्या विरोधात जातो तो शत्रू. कसलाही विचार करू नको आणि लढ. तशी ही लोकं आपल्यावर चालून येत आहेत. त्यांचा शिरच्छेद करावाच लागेल. 

जो शिवाजी महाराज मंदिराला विरोध करेल त्याला महाराष्ट्र माफ करणार नाही 

ठाकरे म्हणाले की, भाजप केवळ मतांसाठी शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला आणि तो पाडला. आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार आहे. ते आपलं दैवत आहे. प्रत्येक राज्यात शिवाजी महाराज यांचा मंदिर उभारल गेलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि राज्याभिषेक दिवशी पुतळे साफ करायचा असा प्रेम नको.  शिवाजी महाराज हे मतं मिळणारे यंत्र नाही, ते ईव्हीएम मशीन नाही. जो शिवाजी महाराज मंदिराला विरोध करेल त्याला महाराष्ट्र माफ करणार नाही. 

गद्दारला नेता मानून आमच्याशी, लढावं लागतंय यातच तुमचा पराभव 

त्यांनी सांगितले की, मोहन भागवत यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, पण तुम्ही हिंदूनो एकत्र या सांगत आहात, पण तुमचे विश्वगुरु हिंदूचे रक्षण करू शकत नाही? तीनवेळा सरकार आले. तुम्हाला गद्दारी दिसली नाही, माझं सरकार खेचलं.100 वर्ष आरएसएस झालं त्याचे चिंतन शिबीर घ्या. आता तुमचा भाजप नाही, हा हायब्रीड भाजप झाला आहे.  इतर पक्षातील नेते भाजपच्या गर्भात बसले आहेत. भारतीय जनता पक्ष जनतेचा राहिला नाही. गद्दारला नेता मानून आमच्याशी लढावं लागतंय यातच तुमचा पराभव आहे 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Embed widget