एक्स्प्लोर

.... तर मोदींचा पुतळा कसा लटकवायचा ते ठरवू! : आ. बच्चू कडू

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमची मागणी मान्य केली नाही, तर मोदींचा सर्वात मोठा पुतळा यवतमाळमध्ये बनवू आणि तो उलटा लटकवायचा का ते बघू? असं म्हणत प्रहार संघटनेचे आमदार बच्च कडू यांनी मोदींना इशारा दिला आहे. बच्चू कडू यांनी काढलेली आसूड यात्रा आज यवतमाळमध्ये पोहोचली. त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शेतमालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी ही यात्रा काढण्यात आली. यावेळी बच्च कडू यांनी राज ठाकरेंवरही टीका केली आहे. विशेष म्हणजे, नोटाबंदीच्या निर्णयावरुनही आ. बच्चू कडू यांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडलं. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला फायदा होणार आहे का? असा प्रश्न विचारला होता. पण त्यावर नुसती आश्वासनंच मिळाली. अच्छे दिनच्या नाववरुन आमच्याकडून मतं घेऊन आमची फसवणूक केली, असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आमदार बच्चू कडू यांनी यावेळी राज ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. राज ठाकरे काम काही करत नाहीत, पण नुसती भाषणबाजी करुन 13 आमदारांना निवडणूक आणतात. आपल्या भाषणात मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा अशी गर्जना करतात. मग महाराष्ट्रातील जनता पाकिस्तानची आहे का? असा सवाल करत त्यांच्या घोषवाक्याची खिल्ली उडवली. दरम्यान, आमदार बच्चू कडू यांच्या आसूड यात्रेला काल मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधून सुरुवात झाली. ही यात्रा महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातून जाणार असून, सुमारे दीडशे सभा होणार आहेत. तर नंदुरबारमधून ही यात्रा गुजरातमध्ये प्रवेश करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहनगर असलेल्या वडनगरमध्ये 21 एप्रिल रोजी सुमारे एक हजार शेतकरी रक्तदान करुन, मोदींना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असे धोरण आखण्याचा आवाहन करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget