एक्स्प्लोर

Aurangabad Scam : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या 30-30 घोटाळा प्रकरणी पहिला गुन्हा; हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

Aurangabad Scam : 30-30 Scam : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा 30-30 घोटाळा मराठवाड्यातील एक मोठा घोटाळा. याप्रकरणी आता पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Aurangabad Scam : 30-30 Scam : मराठवाड्यातील एक मोठा घोटाळा (Big Scam in Marathwada) अशी चर्चा असणाऱ्या आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या 'तीस-तीस' घोटाळ्यात पहिला गुन्हा औरंगाबाद ग्रामीण पोलिसात दाखल झाला आहे. औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला आहे. यातील मुख्य आरोपी संतोष उर्फ सुनील राठोड याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. 

मराठवाड्यातील 30 -30 घोटाळ्याचे औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अधिकचा व्याजदर देण्याचे अमिष दाखवून संतोष राठोड यानं 'तीस-तीस' योजनेत पैसे गुंतवण्यासाठी सर्वांना भरीस पाडलं. बँकेत मिळणाऱ्या व्याजाच्या चारपट अधिक व्याज देऊन सुरुवातील स्वतःचं मार्केटींग केल्यानंतर राठोड गेल्या 8 महिन्यांपासून फरार आहे. त्यामुळे अधिकच्या व्याजदरासह पैशांबाबत अपेक्षाभंग झाल्यानं पैठण तालुक्यातील जांभळी गावातील गुंतवणूक करणाऱ्या महिलनं बिडकीन पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.   

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा घोटाळा कोट्यवधींचा आहे. विशेष म्हणजे, यात मोठ्याप्रमाणावर शेतकरी अडकले आहेत. ज्या भागांत सरकारी प्रकल्प राबवले जातात, त्या भागांतील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यावर राठोड याने लक्ष ठेवून शेतकऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. पोलीस आता राठोड यांचा शोध घेत असून, तो सध्या फरार झाला असल्याचं बोलले जात आहे.

'तीस-तीस' घोटाळा नक्की आहे तरी काय?

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी ( DMIC) जमिनी गेलेल्या भागांत शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. विशेष म्हणजे, औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवलं गेलं. सुरुवातीला शेतकऱ्यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याचं मार्केटिंग या तरुणानं केलं.  त्यानंतर मात्र या तरुणानं पुढे महिन्याला 25 टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरुवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत 'तीस-तीस' नावाचा ग्रुप बनवला. मग अलिशान गाड्यांचा ताफा गावा-गावात फिरू लागला. लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यांमधून पैसे आणले जाऊ लागले, त्यामुळे लोकांचाही या भामट्यावर आंधळा विश्वास बसला. पुढे पाहता पाहता परिसरातील अंदाजे 30 गावांतील शेतकरी आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम या तरुणाने केलं. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी सुनील राठोड गेल्या 8 महिन्यांपासून फरार आहे. पैसे मिळण्याची शक्यताच धुसर झाल्यानं पैठण तालुक्यातील जांभळी गावातील गुंतवणूक करणाऱ्या महिलेनं बिडकीन पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर फसवणूक झालेल्यांनी पुढं यावं, असं आवाहनही पोलीस करत आहेत. तसेच शेतकऱ्यांना देशोधडीला लावणआऱ्या या भामट्याचा पोलीस कसून शोधही घेत आहेत. 
 
महत्त्वाची बाब म्हणजे, काही राजकीय नेत्यांनीसुद्धा यात पैसे गुंतवणूक केल्यानं शेतकऱ्यांनासुद्धा विश्वास बसला आणि उरल्या सुरल्या लोकांनीसुद्धा कोट्यावधी रुपये अधिकचं व्याज मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले. पण आता गेली 8 महिने झाले व्याज सोडा मुद्दल सुद्धा मिळणं अवघड झालं आहे. त्यामुळं हजारो शेतकरी देशोधडीला लागण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget