एक्स्प्लोर

Anil Deshmukh on Devendra Fadnavis : दोन दिवसांपासून राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहे? बदलापूर घटनेवर उत्तरे कधी देणार आहेत! अनिल देशमुखांचा सवाल

बदलापूर घटनेनंतर दोन दिवस होऊनही गृहमंत्री कुठे गायब आहेत? अशी विचारणा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी ट्विट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. 

Anil Deshmukh on Devendra Fadnavis : बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या घृणास्पद प्रकारानंतर अवघा महाराष्ट्र संतापला आहे. देश पातळीवरही पडसाद उमटत आहेत. दरम्यान, बदलापूर घटनेनंतर दोन दिवस होऊनही गृहमंत्री कुठे गायब आहेत? अशी विचारणा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी ट्विट करत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. 

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहेत?

देशमुख यांनी ट्विट करत म्हटले आहे की, दोन दिवसांपासून महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहेत? बदलापूर येथे इतकी संवेदनशील घटना घडली, त्यावर गृहमंत्री  उत्तरे कधी देणार आहेत! बदलापूरमध्ये चिमुरडींवर घडलेल्या घटनेनंतर  20 ऑगस्ट रोजी बदलापूर येथील लोकल ट्रेनच्या रेल्वे ट्रॅकवर हजारोंचा जमाव उतरला होता. 12 तास आंदोलन करताना तोडफोड आणि पोलिसांवर दगडफेक झाली. 

महाराष्ट्र बंदची घोषणा

पोलिसांनी 300 आंदोलकांवर एफआयआर नोंदवला असून आतापर्यंत 72 जणांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, या प्रकरणाच्या तपासासाठी आयजी आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात होणार असून सरकारी वकील उज्ज्वल निकम हे असतील. आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीने (MVA) 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे.

पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही

ही घटना 12 आणि 13 ऑगस्ट रोजी घडली. आदर्श शाळेतील 23 वर्षीय सफाई कामगार अक्षय शिंदेनं दोन्ही मुलींचे लैंगिक शोषण केले. यानंतर दोन्ही मुली शाळेत जाण्यास घाबरू लागल्या. पालकांना संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. एका पालकाने त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी तपासणी केली असता खरी घटना समोर आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पॉक्सो प्रकरण असूनही एफआयआर नोंदवण्यास विलंब केला होता. 

मुलीच्या पालकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बदलापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर दोन दिवसांनी शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 17 ऑगस्ट रोजी आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपी अक्षयची १ ऑगस्ट रोजी शाळेतच कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती. पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यासाठी 12 तासांपेक्षा जास्त वेळ घेतल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता. सुरुवातीला पोलीस तक्रारही ऐकत नव्हते.

राहुल गांधी म्हणाले, एफआयआरसाठीही आंदोलन करावे लागेल का?

राहुल गांधींनी बुधवारी सोशल मीडियावर लिहिले की, पश्चिम बंगाल, यूपी, बिहारनंतर महाराष्ट्रातही मुलींवरील लाजिरवाण्या गुन्ह्यांमुळे समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? बदलापुरात दोन निरपराधांवर घडलेल्या गुन्ह्य़ानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पहिले पाऊल उचलले नाही तोपर्यंत जनता 'न्यायासाठी याचना' करत रस्त्यावर उतरली आहे. आता एफआयआर नोंदवण्यासाठी आंदोलन करावे लागेल का? अखेर पीडितांना पोलीस ठाण्यात जाणेही अवघड का झाले आहे?

न्याय मिळवून देण्यापेक्षा गुन्हे लपविण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातात, ज्याचा सर्वात मोठा बळी महिला आणि दुर्बल घटकातील लोक आहेत. एफआयआर न नोंदवल्याने पीडितांना निराश तर होतेच पण गुन्हेगारांना धीरही मिळतो. समाजातील महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी काय पावले उचलली पाहिजेत, याचा सर्व सरकार, नागरिक आणि राजकीय पक्षांना गांभीर्याने विचार करावा लागेल. न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, तो पोलिस आणि प्रशासनाच्या इच्छेवर अवलंबून राहू शकत नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 7.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्यSitaram Yechury Demise : सीताराम येचुरी यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरु होते उपचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
Embed widget