एक्स्प्लोर

शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघातच मोठा घोटाळा, बोगस तुकड्यांना नियमबाह्य मान्यता, उच्चस्तरीय चौकशी करावी, अनिल देशमुखांची मागणी 

शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मालेगाव मतदारसंघात अनेक शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने अनेक बोगस तुकड्यांना मंजुरी दिली असल्याचे मत शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

Anil Deshmukh on Dada Bhuse : राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मालेगाव मतदारसंघात अनेक शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने अनेक बोगस तुकड्यांना मंजुरी दिली आहे. त्या आधारावर बॅक डेटमध्ये बोगस शिक्षक भरती केल्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाने मोठा आरोप केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे.

शिक्षक भरती घोटाळा राज्यात अनेक ठिकाणी

शिक्षक भरती घोटाळा फक्त नागपूर जिल्हा पुरता मर्यादित नसून राज्यात अनेक ठिकाणी हा घोटाळा झाला असल्याचे अनिल देशमुख म्हणाले. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघातही हा घोटाळा झाला आहे. 2015 पासून नव्या तुकड्यांना मान्यता देण्यात येऊ नये असे असताना शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात अनेक शाळांमध्ये बॅक डेटमध्ये तुकड्यांना मान्यता देऊन शंभर शिक्षकांची बॅक डेटमध्ये नेमणूक केली आहे. एक एक शिक्षक दोन शाळेत नोकरीवर दिसून येत आहे. अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांमध्ये हा प्रकार जास्त दिसून येत असल्याचे अनिल देशमुख म्हणाले. 

शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात एवढा मोठा घोटाळा, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे 

शिक्षण मंत्रांच्या मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस तुकड्यांना नियमबाह्य पद्धतीने मान्यता देऊन बोगस शिक्षक भरती होत असेल, तर राज्यभरातील शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमातून करण्यात यावी, अशी माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे असे देशमुख म्हणाले. नागपूर जिल्ह्यातील बोगस शिक्षक घोटाळा संदर्भात एसआयटीची निर्मिती करण्यात आली असून ती एस आय टी सध्या चौकशी करत आहे. मात्र राज्यसाठीची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत करावी अशी मागणी आहे. शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात एवढा मोठा घोटाळा होत असेल तर त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे असे देशमुख म्हणाले. बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी आमची मागणी आहे सरकारला विनंती करत आहोत पुढेही विनंती करू नाहीतर न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे असे देशमुख म्हणाले. 

शरद पवार यांचा पक्ष आणि अजित पवार यांचा पक्ष एकत्रित येण्याबद्दल चर्चा नाही

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्बात देखील अनिल देशमुकांनी प्रतिक्रिया दिली. साखर संघामध्ये साखर संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांची सभासदांची काल बैठक झाली. त्यामध्ये शरद पवार, अजित पवार हे एकत्रित होते. अशा पद्धतीच्या बैठका साखर संघामध्ये होत असतात. तुम्ही जी शंका घेत आहेत असं काहीही नाही. आमच्या पक्षांमध्ये शरद पवार यांचा पक्ष आणि अजित पवार यांचा पक्ष एकत्रित येण्याबद्दल कुठलीही चर्चा नाही असे देशमुख म्हणाले. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर झाल्या पाहिजे. ज्यांना निवडणुका लढवायच्या आहे, ते तर वाट पाहत आहेत सोबतच जनता ही वाट पाहत आहे. अनेक वर्ष निवडणुका न झाल्यामुळे नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये अत्यंत वाईट स्थिती आहे. निवडून आलेले नगरसेवक लोकांचे प्रश्न सोडवू शकतात. नऊ नऊ वर्षांपासून लोकल बॉडीज मध्ये प्रशासक आहे. अधिकाऱ्यांच्या भरवशावर कारभार सुरू आहे. लवकर निवडणूक झाली पाहिजे ही जनतेची मागणी आहे असे देशमुख म्हणाले. 

 महायुती सत्तेत येऊन अनेक महिने झाले पण रायगड आणि नाशिकला पालकमंत्री नाही

महाविकास आघाडीवर घोटाळ्याचे आरोप करतात, मात्र, त्याचा पुरावा तर दिला पाहिजे. आम्ही बोगस शिक्षक भरती बद्दल आरोप करत असताना पुरावे देत आहोत असे देशमुख म्हणाले. महायुती सत्तेत येऊन अनेक महिने झाले. तरी दुर्दैवी बाब आहे की अनेक जिल्ह्यात पालकमंत्री नाही. रायगड आणि नाशिकमध्ये पालकमंत्री झालेले नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये वाद सुरु आहे. जर सहा सहा महिने जिल्ह्यांना पालकमंत्री देऊ शकत नसाल, तर ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे असे देशमुख म्हणाले.  

शेतकरी कर्जमाफीची वाट पाहतायेत, निर्णय लवकर घ्यावा

राज्य शासन अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीटमुळे होणाऱ्या नुकसानीचा निकष 3 हेक्टर वरून 2 हेक्टर करण्याच्या मनस्थितीत आहे. शेतकरी अडचणीत असताना त्यांच्या पिकांना भाव नसताना असा निर्णय करणे अत्यंत चुकीची ठरेल. राज्य सरकारने या संदर्भात विचार करायला हवा असे देशमुख म्हणाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत राज्य शासन एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस सातबारा कोरा करु असे म्हणायचे. अजित पवार 31 तारखेपर्यंत बँकेत पैसे भरायला शेतकऱ्यांना सांगतात. शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. राज्य सरकारने लवकर त्याबद्दल निर्णय घ्यावा असे देशमुख म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

लवकरच शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याचा निर्णय, मंत्री भुसेंची माहिती, वर्षभरात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुधारणा होणार

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget