एक्स्प्लोर

'प्रभू, पवारसाहेबांना सद्बुद्धी दे, नाहीतर महाराष्ट्राची त्यांच्या तावडीतून सुटका तरी कर', भाजप नेत्याचं पत्र

Anil Bonde Letter To Sharad Pawar : अनिल बोंडे यांनी शरद पवारांना पत्र लिहून आपल्याला प्रभू श्रीरामचंद्र विदर्भावर अन्याय न करण्याची सद्बुद्धी देवो याकरता देवाकडे साकडं मागणार आहे असं म्हटलं आहे.

Anil Bonde Letter To Sharad Pawar :  माजी मंत्री तथा भाजप नेते डॉ.अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक पत्र लिहिलं आहे. बोंडे यांनी शरद पवारांना पत्र लिहून आपल्याला प्रभू श्रीरामचंद्र विदर्भावर अन्याय न करण्याची सद्बुद्धी देवो याकरता देवाकडे साकडं मागणार अशा आशयाचे पत्र त्यांनी लिहले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा 10 तारखेला अमरावतीमध्ये नियोजित दौरा आहे. त्यांच्या अमरावती येथील दौऱ्यावर माजी मंत्री तथा भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी टीका करून प्रभू श्रीरामचंद्राच्या नवमीला होत असलेल्या आगमनावर पवार साहेबांना विदर्भाला सावत्र वागणुकीऐवजी न्याय करण्याची सद्बुद्धी प्रभू श्रीरामचंद्रांनी द्यावी असे साकडे डॉ. अनिल बोंडे यांनी भगवान श्री रामाकडे मागितले आहे. 

पत्रात बोंडेंनी म्हटलं आहे की, विदर्भाने शरद पवार यांच्या सर्व कारकीर्द पाहिली. विदर्भाला डावलून पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप देण्याची त्यांची वृत्तीही पाहली. पवार साहेबांच्या समक्ष विदर्भातील सिंचनाचा अनुशेष निर्माण झाला. ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्र सिंचनानी परिपूर्ण झाला तेव्हा विदर्भ कोरडा राहिला. त्याचीच परिणीती विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये झाली. साखर सम्राटाचे हित जोपासणारे पवार साहेब कापूस पट्ट्यासाठी दुर्दैवाने कधीच उदार झाले नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. 

बोंडेंनी म्हटलं आहे की,  देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये बळीराजा योजनेच्या माध्यमातून काही धरणे पूर्ण झालीत. जलयुक्त शिवार बंद पाडून जलसंधारणाची लहान लहान कामे सुद्धा थांबवली. अमरावतीची पंचतारांकित एम.आय.डी.सी. आपल्या काळात पडीकच होती. देवेंद्र फडणवीस सरकार मध्येच पहिल्यांदा रेमंड, गुप्ता, व इतर टेक्स्टाईल कंपन्याचे कारखाने सुरु झाले. अमरावतीच्या पालकमंत्र्याला जणू आपलं मविआ सरकार कवडीची किंमत देत नाही आणि त्यामुळे अमरावती एम.आय.डी.सीमध्ये कोणतीही नवीन प्रकल्प सुरु झाले नाही. 

पत्रात बोंडेंनी म्हटलं आहे की, आपल्या सरकारमधील बहादरांनी मोर्शीचे मस्यविज्ञान महाविद्यालय सुद्धा पळवलं. अमरावती नांदगाव पेठ एम.आय.डी.सी. मध्ये या अडीच वर्षाच्या काळात रोजगारासाठी कोणताही उद्योग आला नाही. अमरावतीला आले तर दोन चार कारखाने घेऊन आले असते तर आम्ही पायघड्या पसरून स्वागत केले असते, असंही त्यांनी म्हटलं आहे. 
  
पत्रात बोंडेंनी म्हटलं आहे की, अमरावती शासकीय मेडिकल कॉलेजची मागणी अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. आपल्या मनातील विदर्भाचा दुजाभाव नष्ट करा. विदर्भाला न्याय देण्याची बुद्धी जर शरद पवार साहेबांना होत नसेल तर देवा त्यांच्या आशीर्वादाचं मविआ सरकार दूर कर तेव्हाच विदर्भाला न्याय मिळू शकेल, असं बोंडे यांनी म्हटलं आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget