एक्स्प्लोर

'प्रभू, पवारसाहेबांना सद्बुद्धी दे, नाहीतर महाराष्ट्राची त्यांच्या तावडीतून सुटका तरी कर', भाजप नेत्याचं पत्र

Anil Bonde Letter To Sharad Pawar : अनिल बोंडे यांनी शरद पवारांना पत्र लिहून आपल्याला प्रभू श्रीरामचंद्र विदर्भावर अन्याय न करण्याची सद्बुद्धी देवो याकरता देवाकडे साकडं मागणार आहे असं म्हटलं आहे.

Anil Bonde Letter To Sharad Pawar :  माजी मंत्री तथा भाजप नेते डॉ.अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक पत्र लिहिलं आहे. बोंडे यांनी शरद पवारांना पत्र लिहून आपल्याला प्रभू श्रीरामचंद्र विदर्भावर अन्याय न करण्याची सद्बुद्धी देवो याकरता देवाकडे साकडं मागणार अशा आशयाचे पत्र त्यांनी लिहले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा 10 तारखेला अमरावतीमध्ये नियोजित दौरा आहे. त्यांच्या अमरावती येथील दौऱ्यावर माजी मंत्री तथा भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी टीका करून प्रभू श्रीरामचंद्राच्या नवमीला होत असलेल्या आगमनावर पवार साहेबांना विदर्भाला सावत्र वागणुकीऐवजी न्याय करण्याची सद्बुद्धी प्रभू श्रीरामचंद्रांनी द्यावी असे साकडे डॉ. अनिल बोंडे यांनी भगवान श्री रामाकडे मागितले आहे. 

पत्रात बोंडेंनी म्हटलं आहे की, विदर्भाने शरद पवार यांच्या सर्व कारकीर्द पाहिली. विदर्भाला डावलून पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप देण्याची त्यांची वृत्तीही पाहली. पवार साहेबांच्या समक्ष विदर्भातील सिंचनाचा अनुशेष निर्माण झाला. ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्र सिंचनानी परिपूर्ण झाला तेव्हा विदर्भ कोरडा राहिला. त्याचीच परिणीती विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये झाली. साखर सम्राटाचे हित जोपासणारे पवार साहेब कापूस पट्ट्यासाठी दुर्दैवाने कधीच उदार झाले नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. 

बोंडेंनी म्हटलं आहे की,  देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये बळीराजा योजनेच्या माध्यमातून काही धरणे पूर्ण झालीत. जलयुक्त शिवार बंद पाडून जलसंधारणाची लहान लहान कामे सुद्धा थांबवली. अमरावतीची पंचतारांकित एम.आय.डी.सी. आपल्या काळात पडीकच होती. देवेंद्र फडणवीस सरकार मध्येच पहिल्यांदा रेमंड, गुप्ता, व इतर टेक्स्टाईल कंपन्याचे कारखाने सुरु झाले. अमरावतीच्या पालकमंत्र्याला जणू आपलं मविआ सरकार कवडीची किंमत देत नाही आणि त्यामुळे अमरावती एम.आय.डी.सीमध्ये कोणतीही नवीन प्रकल्प सुरु झाले नाही. 

पत्रात बोंडेंनी म्हटलं आहे की, आपल्या सरकारमधील बहादरांनी मोर्शीचे मस्यविज्ञान महाविद्यालय सुद्धा पळवलं. अमरावती नांदगाव पेठ एम.आय.डी.सी. मध्ये या अडीच वर्षाच्या काळात रोजगारासाठी कोणताही उद्योग आला नाही. अमरावतीला आले तर दोन चार कारखाने घेऊन आले असते तर आम्ही पायघड्या पसरून स्वागत केले असते, असंही त्यांनी म्हटलं आहे. 
  
पत्रात बोंडेंनी म्हटलं आहे की, अमरावती शासकीय मेडिकल कॉलेजची मागणी अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. आपल्या मनातील विदर्भाचा दुजाभाव नष्ट करा. विदर्भाला न्याय देण्याची बुद्धी जर शरद पवार साहेबांना होत नसेल तर देवा त्यांच्या आशीर्वादाचं मविआ सरकार दूर कर तेव्हाच विदर्भाला न्याय मिळू शकेल, असं बोंडे यांनी म्हटलं आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 
एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Embed widget