एक्स्प्लोर

पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर! FRP चे तुकडे, एकरी 10 ते 12 टन उत्पादन घटलं असतानाच 15 रुपयांची कपात; असली 'दलाली' बंद करा, राजू शेट्टींचा हल्लाबोल

CM relief fund sugarcane cut: अतिवृष्टीबाधितांसाठी प्रति टन 15 रुपये कपात केली जाणार आहे. 15 रुपयांपैकी 5 रुपये बाधित शेतकऱ्यांना, 10 रु. मुख्यमंत्री सहायता निधीत जाणार आहेत.

Sugarcane farmers deduction Maharashtra: भीषण महापूर परिस्थितीने राज्यातील शेतकऱ्यांची दैना झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता सोलापूरसह मराठवाड्यातील पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने काढलेल्या फतव्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. सरकारने (Maharashtra sugarcane politics) ऊसाला प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पाच रुपये बाधित शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत, तर दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत दिले जाणार आहेत. त्यामुळे अतिवृष्टी बाधितांसाठी 15 रुपयांची कपात केली जाणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दणका बसला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या निर्णयावर सडकून टीका केली आणि त्यांनी ही दलाली सरकारने बंद करावी असा प्रहार केला. हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं नसून अजित पवार आणि विखे पाटलांसारख्या साखर सम्राटांच्या बाजूचे असल्याचे त्यांनी म्हटल आहे. 

अतिवृष्टीबाधितांसाठी प्रति टन 15 रुपये कपात (Maha Government decision on sugarcane price cut) 

दरम्यान, अतिवृष्टीबाधितांसाठी प्रति टन 15 रुपये कपात केली जाणार आहे. 15 रुपयांपैकी 5 रुपये बाधित शेतकऱ्यांना, 10 रु. मुख्यमंत्री सहायता निधीत जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, ऊस उत्पादकांकडून पैसे घेण्याला साखर संघानं विरोध केला आहे. राज्यात 1 नोव्हेंबरपासून (Sugarcane crushing season Maharashtra) यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरु होणार आहे. 

सरकारचा नैतिक अधिकार नाही (Raju Shetti criticism Maha government) 

दरम्यान, सरकारच्या निर्णयावर राजू शेट्टी म्हणाले की, सरकारला ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पैशातून कपात करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांनी आरोप केला की राज्य सरकार सातत्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात आणि साखर कारखानदारांच्या बाजूने उभे असते. याचा पुरावा म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा उल्लेख केला. न्यायालयाने शेतकऱ्यांची एफआरपी (FRP) एकरकमी देण्याचे आदेश दिले होते, परंतु राज्य सरकारने या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊन स्थगितीची मागणी केली. यावरून हे स्पष्ट होते की सरकार अजित पवार आणि विखे पाटील यांच्यासारख्या साखर सम्राटांच्या बाजूचे आहे, शेतकऱ्यांच्या नाही, असे शेट्टी म्हणाले. 

ऊस उत्पादकांचे स्वतःचे नुकसान (Raju Shetti on Sugarcane Farmer) 

शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले की, अतिवृष्टीचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे. त्यांचे एकरी 10 ते 12 टनांचे उत्पादन घटले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर हा 'जिझिया कर' लादणे अन्यायकारक आहे. जर सरकारला स्वतःच्या निधीतून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे जमत नसेल, तर त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर भार टाकू नये. एका शेतकऱ्याच्या खिशातून पैसे काढून दुसऱ्याला देणे आणि त्यातील 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणे, याला शेट्टी यांनी "दलाली" असे संबोधले आहे.
सरकारने अशा प्रकारच्या दलालीच्या भानगडीत पडू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी सरकारच्या या भूमिकेची तुलना "घरात सुनेवर जाच करायचा आणि शेजाऱ्याच्या घरात जेवण घालायचं" या म्हणीशी केली. राजू शेट्टी यांनी सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला असून, सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही तर साखर सम्राटांच्या हिताचे रक्षण करत असल्याचा आरोप केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Embed widget