एक्स्प्लोर

Amravati : आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर रेल्वे स्टेशन बंद करा; चांदूरमध्ये रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी जनआंदोलन

Amravati :  कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना राज्यातील रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहे. मात्र विदर्भात अजूनही पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या नाहीत.

अमरावती : आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर रेल्वे स्टेशन बंद करा या घोषणेने अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहर शनिवारी दणाणलं. दहा फुटांचे कुलूप, तीन फुटांची चावी तसेच बैलगाड्या आणि टांग्यांची मिरवणूक आणि शेकडो नागरिकांचा सहभाग. निमित्त होतं रेल रोको कृती समितीचे आंदोलन. रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी भव्य जनआंदोलन करून रेल्वे अधिकाऱ्यांना कुलूप भेट देण्यात आले. यामध्ये सर्व राजकीय पक्ष, संघटना तसेच शहरवासीय सामील झाले होते. काही व्यापारी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभागी झाले होते.

मुंबईत जसं लोकल रेल्वेला महत्व आहे तेच महत्व विदर्भात पॅसेंजर रेल्वेला आहे. कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना राज्यातील रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहे. मात्र विदर्भात अजूनही पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या नाहीत. ज्या सुरू झाल्या त्या स्थानकावर थांबतच नसल्याने प्रवाशी चांगलेच संतापले आहे. 

ज्या गाड्या सुरू झाल्या त्या रेल्वे गाड्यांचा पूर्ववत थांबा केवळ चांदूर रेल्वेलाच देण्यात आला नाही. सर्व गाड्यांचा स्थानिक रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा, अन्यथा स्टेशन बंद करण्यात यावे, यासाठी काल 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीदिनी चांदूर रेल्वे स्टेशन मास्तर यांना कुलूप भेट दिली. यासाठी तब्बल 10 फूट एका भल्यामोठ्या कुलुपाची मिरवणूक चांदूर रेल्वे शहरातून काढण्यात आली.

चांदूर रेल्वे स्थानकावर टाळेबंदीपूर्वी विदर्भ एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, हावडा- अहमदाबाद एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, कुर्ला  एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा होता. मात्र आता या सर्व रेल्वेगाड्या सुरू होऊनही चांदूर रेल्वे स्थानकावर केवळ विदर्भ एक्सप्रेसचाच थांबा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त इतर सुरू असलेल्या गाड्यांचा थांबा देण्यात आला नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्र एक्सप्रेस (01039) ही सिंधी सारख्या छोटया स्थानकावर थांबा घेते. परंतु चांदूर रेल्वे शहरात ही गाडी थांबत नाही. त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा देऊन सर्व नागरिक, सर्व पक्षाचे, संघटनेचे तथा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

या अन्यायाविरूध्द सदर आंदोलन गांधी जयंतीदिनी करण्यात आले. आंदोलनात महात्मा गांधीजींच्या वेशभूषेत कमलकिशोर पनपालीया होते. येत्या पंधरा दिवसात पूर्ववत रेल्वे गाड्यांचा थांबा न मिळाल्यास यापेक्षा उग्र रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला..

पूर्वी चांदूररेल्वे येथे या रेल्वे गाड्यांचा थांबा होता, पण आता या गाड्या चांदूर स्थानकावर थांबत नाहीत. 

विदर्भ एक्सप्रेस
महाराष्ट्र एक्सप्रेस
हावडा- अहमदाबाद एक्सप्रेस
सेवाग्राम एक्सप्रेस
कुर्ला एक्सप्रेस 
अमरावती - जबलपूर
अमरावती - नागपूर सुपरफास्ट

या पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी 

वर्धा - भुसावळ
अमरावती - नागपूर 
नागपूर - भुसावळ

महत्वाच्या बातम्या : 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार घोषित
Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू पुरस्कार घोषित
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: पुन्हा एकदा ट्विस्ट! राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
पुन्हा एकदा ट्विस्ट! राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Sunetra Pawar On Aniket Tatkare Vidhan Parishad Election 2026: कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
कोकणातून अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड; सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट, म्हणाल्या...
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
Embed widget