एक्स्प्लोर

भरधाव रिक्षा खड्ड्यामुळे पलटी, अपघाताचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल

अपघाताचा केंद्रबिंदू असलेल्या खड्डा मोबाईल कॅमेऱ्यात चित्रिकरण करीत असतानाच एक भरधाव रिक्षा त्याच खड्यात आदळून पलटी होऊन अपघात झाल्याचा प्रकारही कॅमेऱ्यात कैद केला.

कल्याण :  भरधाव रिक्षा खड्ड्यात पलटी होऊन अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना कल्याण - भिवंडी मार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेल समोर घडली आहे. विशेष म्हणजे या अपघातापूर्वीच याच खड्यात एका नागरिकाचा अपघात झाला होता. त्याच नागरिकाने अपघाताचा केंद्रबिंदू असलेल्या खड्डा मोबाईल कॅमेऱ्यात चित्रिकरण करीत असतानाच एक भरधाव रिक्षा त्याच खड्यात आदळून पलटी होऊन अपघात झाल्याचा प्रकारही कॅमेऱ्यात कैद केला. त्यांनतर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हि घटना समोर आली आहे. 

कल्याण-भिवंडी मार्गावर गेल्या तीन वर्षापासून रस्ता रुंदीकरण करून सिमेंट रस्त्याचे कासव गतीने काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात होऊन कोणी जखमी झाले तर अनेकांचे  जीवही गेले आहेत. मात्र अनेक वर्षापासून या रस्त्यावरील खड्याचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. त्यातच अर्धवट असलेल्या सिमेंट रस्त्यावर जागोजगी खड्डे आहे. असाच एक खड्डा  कल्याण - भिवंडी मार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेल समोर आहे. याच खड्यामुळे 10 दिवसापूर्वी रिक्षा पटली होऊन  अपघात झाला होता. याप्रकरणी त्यावेळी कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली होती. त्याच अपघाताच्या थराराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. 

जिल्ह्यात सर्वाधिक खड्ड्यांचे साम्राज्य भिवंडी शहर व ग्रामीण भागात पसरले आहे. मात्र जिल्ह्यातील मंत्री, विरोधी पक्ष नेते केवळ या रस्त्याची पाहणी करण्यासाठी येतात. त्याच वेळी संबंधित अधिकारी रस्ता दुरुस्तीचे काम सुरु केल्याचे दाखवता. मात्र मंत्रीसह नेत्यांची पाठ फिरताच खंड्याचे काम अर्धवट असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे  खड्यांच्या राजकारणावरून विरोधी पक्ष असलेले  मनसे, भाजपचे लोकप्रतिनिधी व नेते महाविकास आघाडीला जबाबदार धरून रस्ता दुरुस्तीची मागणी करतात. यावर सत्ताधारी मंत्री म्हणतात पावसाळा गेला कि, खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात येईल. मात्र तोपर्यंत खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन त्यांमध्ये नागरिकांचा हकनाक बळी जातो. तर काही नागरिक गंभीर होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खड्डे दुरुस्तीचा प्रश्न कधी सुटणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आठवडाभरात एकाच ठिकाणी 7 घटना, बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील वंजार पट्टी नाका ते  चाविंद्रा मार्ग निष्कृष्ट असल्याने हे अपघाताचे केंद्रबिंदू ठरत आहे.  आठवड्याभरातच या ठिकाणी अपघातांची 7 घटना घडल्या आहेत. याआधी एकाच दिवशी चार अपघात झाल्याने दुचाकीस्वार थोडक्यात बचावले होते. मात्र त्यानंतर देखील भिवंडी महानगरपालिकेला जाग आलेली नाहीये. आठवड्याभरात एकाच ठिकाणी सात दुचाकीस्वारांचे अपघात झाले आणि तेही थोडक्यात बचावले आहेत. या अपघातांचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  एका आठवड्यात एकाच ठिकाणी सात अपघात घडल्याची बातमी एबीपी माझाने सतत लावून धरली होती. एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन पालिका प्रशासन खडबडून जागी झाले आहे. पालिकेच्या वतीने मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेत पेवर ब्लॉक काढून ते व्यवस्थित बसवण्याच काम हाती घेण्यात आले आहे. 

 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
Devendra Fadnavis Maharashtra Jobs: दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
Devendra Fadnavis Maharashtra Jobs: दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
BMC Election 2026 Mumbai Mayor: मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला, दिल्लीतून महत्त्वाची अपडेट
मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला, दिल्लीतून महत्त्वाची अपडेट
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Embed widget