एक्स्प्लोर

Onion : कांदा खरेदीसाठी नाफेडचे प्रतिनिधी मार्केटमध्ये नाहीत, जिथं जखम झाली, तिथंच मलमपट्टी करा; स्वाभिमानीची टीका

Agriculture News : कोणत्याही बाजार समितीत अद्याप नाफेडचे प्रतिनिधी उपस्थित नाहीत. मग कांदा खरेदी कशी होणार? असा सवाल संदीप जगताप यांनी उपस्थित केला.

Onion News : केंद्र सरकारनं (central govt) महाराष्ट्रात दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नाशिक (Nashik) जिल्हाधिकारी यांनी नाफेडला (Nafed) मार्केटमध्ये कांदा खरेदी आदेश दिले आहेत. मात्र, असे असले तरी अद्याप नाफेडचे प्रतिनिधी मार्केटमध्ये आले नसल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी व्यक्त केले. जिथं जखम झाली, तिथंच मलमपट्टी करा असे म्हणत जगताप यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

नेमकं काय म्हणाले संदीप जगताप?

नाफेडला कांदा खरेदी करण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. मात्र, कोणत्याही बाजार समितीत अद्याप नाफेडचे प्रतिनिधी उपस्थित नाहीत. त्यामुळं सरकारचा कांदा खरेदीचा आदेश कितपत प्रत्यक्षात उतरेल ते माहीत नाही, असे जगताप म्हणाले. दरम्यान, कांदा खरेदी केल्यानंतर फार्मर्स कंपन्याना नाफेड 15 दिवसांनी पैसे देते. त्यामुळं आता असा प्रश्न निर्माण होतो की, किती फार्मस कंपन्यांची अर्थिक स्थिती चांगली आहे की, त्या कंपन्या सलग 15 दिवस शेतकऱ्यांना रोख पैसे देतील. त्यामुळं सरकारचा हा निर्णय प्रत्यक्षात उतरणं कठीण असल्याचे जगताप म्हणाले. त्यामुळं जिथं जखम झाली तिथंच मलमपट्टी करा असे जगताप म्हणाले.

...तर कांद्याचे दर 40 ते 50 रुपये राहतील

सद्या कांद्याच्या दरात घसरण होत आहे. कांद्याचे दर वाढवायचे असतील तर केंद्र सरकारनं कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क आकारल्याचा निर्णय मागे घेणं गरजेचं आहे. जर सरकारनं निर्यात शुल्क आकरण्याचा निर्णय मागे घेतला तर कांद्याचे दर 40 ते 50 रुपये राहतील असे संदीप जगताप म्हणाले.

50 रुपये किलोनं कांद्याची खरेदी करा

सरकार 2 हजार 410 रुपये भावाने नाफेडतर्फे कांदा खरेदी करणार आहे. हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे जगताप म्हणाले. जेव्हा कांदा तीन ते दहा रुपये किलोने विकत होता. तेव्हा सरकार झोपले होते का? केंद्राने तेंव्हा या भावाने कांदा खरेदी करायला हवा होता असे जगताप म्हणाले. आज कांदा निर्यात शुल्क लावले नसते तर 40 ते 50 रुपये किलोने कांदा विकला असता. मात्र केंद्र सरकार 24 रुपयांनी कांदा खरेदी करत आहे. म्हणजे मिळणाऱ्या बाजार भावाच्या अर्ध्याच किमतीत ही खरेदी असल्याचे जगताप म्हणाले. शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवण्याचीच सरकारची ही नीती आहे. तुम्हाला खरेदीच करायचा असेल कांदा तर तो पन्नास रुपये किलोने खरेदी करा असे जगताप म्हणाले.

इतर संबंधित बातमी : 

Sharad Pawar On Sugar Export Ban : केंद्र सरकारनं जर साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली तर....वाचा शरद पवार नेमकं काय म्हणाले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget