एक्स्प्लोर

4th March Headlines : बेस्ट बेकरी केस प्रकरणी निकाल, अहमनदनगरमध्ये राष्ट्रवादीचा जनआक्रोश मोर्चा; आज दिवसभरात 

4th March Headlines : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासप्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. 

4th March Headlines :  महानगरपालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भुमिपूजन सोहळा आज दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याबरोबरच बेस्ट बेकरी केस प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय  निकाल देणार आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासप्रकल्पांचे लोकार्पण

 महानगरपालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भुमिपूजन सोहळा आज दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसेच, केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार कुमार केतकर, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे हे नेते देखील उपस्थित राहणार आहेत. 
 
बेस्ट बेकरी केस प्रकरणी निकाल

बेस्ट बेकरी केस प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय  निकाल देणार आहे. साल 2002 मध्ये गुजरातमधील वडोदरा इथं गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिसांचारातील एक गाजलेलं प्रकरण म्हणजे बेस्ट बेकरी हत्याकांड. या प्रकरणी जमावानं 14 जणांना अतिशय निर्घृणपणे मारलं होतं. याप्रकरणातील दोन फरार आरोपींविरोधात मुंबई सत्र न्यायालयाताल विशेष कोर्टात नुकताच खटला पूर्ण झाला आहे. त्यावर आज कोर्ट आपला राखून ठेवलेला निकाल जाहीर करणार आहे.. 

खासदार इम्तियाज जलिल यांचे उपोषण
 
औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याच्या विरोधात आज खासदार इम्तियाज जलिल उपोषण करणार आहेत. जलिल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजल्यापासून साखळी उपोषण करणार आहेत. तर छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्याच्या समर्थनार्थ दुपारी 12 वाजता मनसेच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आलीय. टिव्ही सेंटरजवळ मनसेच्या वतीनं ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. 

 अहमनदनगरमध्ये राष्ट्रवादीचा जनआक्रोश मोर्चा

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सकाळी 10 वाजता नगर - पुणे रोडवर शेतकरी जन आक्रोश आंदोलन रास्ता रोको होणार आहे. कांद्याचे दर कमी झाल्याने हे आंदोलन केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तर संगमनेरमध्येही बसस्थानकासमोर सकाळी 9 वाजता नाशिक – पुणे महामार्गावर आंदोलन करण्यात येणार आहे. राज्याचे माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात या आंदोलनात सहभागी होणार आहेत. 
  
 अहमदनगरमध्ये सावता परिषदेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन

अहमदनगर येथे सावता परिषदेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन आज होणार आहे... या अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे... सकाळी ११ वाजता नंदनवन लॉन्स अहमदनगर येथे दोन सत्रांमध्ये हे अधिवेशन होणार आहे... माळी समाज बांधवांच्या विविध प्रश्नांबाबत या अधिवेशनात चर्चा होणार आहे. 

संजय राऊतांची पुण्यात पत्रकार परिषद 

 शिवसेना खासदार संजय राऊत यांची सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद आहे. कसब्याचे नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकर हे संजय राऊत यांना भेटणार आहेत. 

 कोल्हापुरात मोर्चा 

एकच मिशन जुनी पेन्शन या टॅगलाईन खाली आज कोल्हापुरात महामोर्चा निघणार आहे.. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा असून कुटुंबीयांसह या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. 

 महिला IPL

आजपासून महिला IPL च्या मॅचला होणार सुरूवात होणार आहे. 2023 चा पहिला महिला आयपीएल सीजन आजपासून खेळवला जात आहे. मुंबईतील दोन स्टेडियमवर या मॅच खेळवल्या जाणार आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget