एक्स्प्लोर

Maharashtra Rain : मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाच्या सरी; बळीराजाचा सगळा हंगाम मातीमोल, मराठवाड्यात कापसाच्या अक्षरशः वाती झाल्या; IMDचा अंदाज काय?

राजधानी मुंबईत पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावल्याचं दिसून आलंय. मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान, पुढील 24 तासात पावसाची तीव्रता कमी होणार असल्याचेही सांगण्यात आलंय.

Maharashtra Rain मुंबई : राज्याती बहुतांश भागात पावसानं उघडीप दिली असली तरी काही भागात मात्र, अद्यापही पाऊस पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आजही (31 ऑक्टोबर) अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. विशेषत: या पावसामुळं कापूस आणि सोयाबीन पिकांचं (Farmers)  मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान, राजधानी मुंबईत पहाटेपासूनच पावसाने (Rain) हजेरी लावल्याचं दिसून आलं. मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस (Maharashtra Weather Update) सुरू आहे. पहाटेपासून पश्चिम उपनगरात ढगाळ वातावरण असून सकाळी साडेसहा वाजेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगर अंधेरी, विलेपार्ले जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड कांदिवली बोरिवली या सर्व परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.

Maharashtra Rain : ऑक्टोबर हिटऐवजी पावसाचेच ‘चटके’, पुढील 24 तासात पावसाचा अंदाज काय?

मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरु असून मुंबई उपनगरातही पावसाची रिपरिप सुरु आहे. अरबी समुद्रातील डिप्रेशन आणि छत्तीसगडवरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पाऊस पडत असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्या आली आहे. अरबी समुद्रातील डिप्रेशनमुळे कोकण किनारपट्टीवर मागील 2 ते 3 दिवसांपासून पाऊस सुरु आहे. दरम्यान, पुढील 24 तासात पावसाची तीव्रता कमी होणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं.

Marathwada Rains: 'सगळा हंगाम मातीमोल', नांदेडमध्ये अतिवृष्टीने कापूस भिजला

नांदेडमध्ये (Nanded) झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, हातातोंडाशी आलेलं कापूस (cotton) आणि सोयाबीनचं (soybean) पीक भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. "भिजलेल्या कापसाच्या अक्षरशः वाती बनल्यात," असं विदारक चित्र सध्या नांदेडमध्ये दिसत आहे. मे महिन्यापासून नांदेड जिल्ह्यात सातत्याने अतिवृष्टी होत असून, यापूर्वी उडीद (Urad) आणि मूग (Moong) यांसारखी पिकेही वाया गेली होती. आता वेचणीला आलेला कापूस पावसामुळे भिजल्याने यंदाचा संपूर्ण हंगाम मातीमोल ठरला आहे. या मोठ्या नुकसानीमुळे नांदेडमधील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे.

दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 9 ते 10 दिवसांपासून सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारीही विविध भागांत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे मका, कपाशी, कांदा आदी पिके जलमय झाली आहे. खरीप हंगाम पूर्णतः उद्ध्वस्त झाला असून, रब्बीचा आधारही क्षीण झालाय. कन्नड तालुक्यातील चापानेरसह परिसरातील गावांना सलग सातव्या दिवशीही जोरदार पावसाने झोडपले. सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, शेतातून अक्षरशः पाणी वाहत आहे. शेतातील हे भयावह चित्र पाहता येत असल्याने शेतकऱ्यांनी आता शेतात जाणं देखील बंद केले आहे.

Konkan Rains : 'हातातोंडाशी आलेला घास गेला', कोकणात भातशेतीचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल

कोकणात (Konkan) कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे (Paddy Farming) मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकरी (Farmers) हवालदिल झाले आहेत. 'लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी,' अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पावसामुळे जवळपास दोन हजार आठशे सत्त्याण्णव (2,897) हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून, शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा -

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Embed widget