एक्स्प्लोर

Kolhapur News : पेरणी हंगाम संपत आला, कोल्हापूर जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा; भात, सोयाबीन उत्पादन घटण्याचा धोका

साधारणपणे मे महिन्याच्या उत्तरार्धात खरीपाच्या हंगामाला प्रारंभ होतो. मान्सूनपूर्व वळीव सरी कोसळतील या अंदाजाने शेतीमध्ये मशागत करून पेरण्या केल्या जातात. मात्र, यंदा जिल्ह्यात वळीव पावसाचा एकही थेंब कोसळला नाही.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल महिनाभर उशिराने मान्सून सक्रिय झाल्यानंतरही शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी किंचित सरी असाच प्रकार गेल्या आठवडाभरापासून सुरु झाला आहे. पेरणीयोग्य पुरेसा पाऊस होत नसल्याने पेरण्या अजूनही खोळंबल्या आहेत.

खरीप पेरणीचा हंगाम संपत आला

साधारणपणे मे महिन्याच्या उत्तरार्धात खरीपाच्या हंगामाला प्रारंभ होतो. मान्सूनपूर्व वळीव सरी कोसळतील या अंदाजाने शेतीमध्ये मशागत करुन पेरण्या केल्या जातात. मात्र, यंदा जिल्ह्यात वळीव पावसाचा एकही थेंब कोसळला नाही. यानंतर मोसमी पाऊस तब्बल महिनाभर उशिरा आल्याने त्याचा थेट परिणाम खरिपातील पेरण्यांवर झाला आहे. सर्वसाधारणपणे खरीप हंगामात 30 जूनपर्यंत पेरण्या केल्या जातात. मात्र, जून महिना संपण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी असतानाही पुरेशा आणि दमदार सरी कोसळलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पेरणीला अजूनही म्हणावा तसा वेग आलेला नाही. खरीप हंगामात वेळेत पेरण्या न झाल्याने त्याचा थेट परिणाम भात आणि सोयाबीनवर होणार असून उत्पादन घटण्याचा धोका आहे. ऊसावरही विपरित परिणाम झाला आहे. जिल्ह्यात मान्सूनने केलेल्या विलंबामुळे रोहिणी नक्षत्र आणि मृग नक्षत्रात कोणत्याही प्रकारची पेरणी होऊ शकलेली नाही. 

कोल्हापूर विभागात ऊस वगळून खरीप पिकाखालील क्षेत्र 7.28 लाख हेक्टर आहे. 21 जूनपर्यंत अवघ्या 0.23 लाख हेक्टरवर म्हणजेच आकड्यात सांगायचं झाल्यास 3.18 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून पेरण्यांनी  वेग घेतला असला, तरी पुरेशा पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे.

शेतकरी निसर्गाच्या चक्रव्युहात अडकला

जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यात पावसाने दमदार सलामी दिली आहे. मात्र, उर्वरित जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, केवळ तुरळक पद्धतीचा पाऊस होत असल्याने परिणामी पेरणीयोग्य ओल जमिनीत न झाल्याने पेरणी करायची कशी, असा प्रश्‍न शेतकऱ्‍यांना पडला आहे. दुसऱ्‍या बाजूला वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादनात घट येण्याची चिंता शेतकऱ्‍यांमध्ये आहे. यामुळे शेतकरी निसर्गाच्या चक्रव्युहात अडकला आहे. कृषी विभागाने यंदाच मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणांचे मोफत आणि अनुदानावर वितरण केले आहे. त्यात याचवर्षी पाऊस लांबल्याने कृषी विभागाच्या सोयाबीनची मूल्य साखळी वाढवण्याच्या प्रयत्नांना ब्रेक लागण्याचा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
पेपरला 15 मिनिटे, घाटात ट्रॅफिक जाम, पाचगणीचा पठ्ठ्या थेट पॅराग्लायडिंगने परीक्षा केंद्रावर पोहोचला!
पेपरला 15 मिनिटे, घाटात ट्रॅफिक जाम, पाचगणीचा पठ्ठ्या थेट पॅराग्लायडिंगने परीक्षा केंद्रावर पोहोचला!
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
Shikhar Dhawan : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Video : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?Anjali Damania On Dhananjay Munde : एक मंत्री किती दहशत माजवणार? अंजली दमानिया कडाडल्या..Chandrashekhar Bawankule Nagpur : भाजपने फोडाफोडीचं राजकारण केलं नाही- बावनकुळेChandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
'आंतरधर्मीय विवाहाला लव्ह जिहाद म्हणणं चुकीचं' केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा कायद्याला विरोध
पेपरला 15 मिनिटे, घाटात ट्रॅफिक जाम, पाचगणीचा पठ्ठ्या थेट पॅराग्लायडिंगने परीक्षा केंद्रावर पोहोचला!
पेपरला 15 मिनिटे, घाटात ट्रॅफिक जाम, पाचगणीचा पठ्ठ्या थेट पॅराग्लायडिंगने परीक्षा केंद्रावर पोहोचला!
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या
Shikhar Dhawan : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
Video : दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला! दोन वर्ष भेटलो नाही, वर्षभरापासून बोललो नाही, लेकाच्या आठवणीने शिखर धवनमधल्या बापाला हुंदका आवरेना
ताक पिण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
ताक पिण्याचे '4' आरोग्यदायी फायदे!
Ladki bahin yojana: सरकार अपात्र लाडक्या बहि‍णींचा टप्याटप्प्याने 'कार्यक्रम' करणार, महत्त्वाची अट टाकल्याने बहुतांश अर्ज बाद होणार
लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाचा नियम लागू, अपात्र महिला खटाखट बाद होणार
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
मोठी बातमी : अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, नाशिकवरुन काल तातडीने पुण्याला रवाना!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.