एक्स्प्लोर

Chhaava Movie Review : तनामनात अंगार फुलवणारा ‘छावा’

Movie Review : संभाजी महाराजांचे हाल हाल करून औरंगजेबाने त्यांना मारले, संभाजी महाराजांचा देहांत झाल खरा पण मनातून औरंगजेब खऱ्या अर्थाने हरला होता.....

छत्रपती संभाजी महाराजांमध्ये विविध गुण होते. ते कलासक्त होते, कविता करायचे, आदर्श पति, पिता होते, शूर तर होतेच तसेच कट्टर धर्माभिमानीही होते. त्यांच्या शौर्याने औरंगजेबालाही थक्क केले होते. असा एक छावा आपल्याकडे का नाही असा प्रश्न त्याला पडला होता. संभाजी महाराजांचे हाल हाल करून औरंगजेबाने त्यांना मारले, संभाजी महाराजांचा देहांत झाल खरा पण मनातून औरंगजेब खऱ्या अर्थाने हरला होता. हा सगळा इतिहास वाचून माहिती होता पण लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांनी हा इतिहास पडद्यावर अक्षरशः जीवंत केला आहे.

चित्रपटाची सुरुवात होते औरंगजेबाच्या दर्शनाने आणि पहिल्या फ्रेमपासूनच चित्रपट पकड घ्यायला सुरुवात करतो. संभाजी महाराजांचे शौर्य दाखवण्यास सुरुवात होते आणि शेवटपर्यंत आपण खुर्चीला खिळून बसतो. संभाजी महाराजांची संपूर्ण गाथा आणि त्यांचे सर्व गुण तीन तासांच्या चित्रपटात दाखवणे अवघड आहे. शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असला तरी चित्रपटात फक्त ९ वर्षांचाच कालावधी घेण्यात आला आहे.

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याची सूत्रे हाती घेतात. शिवाजी महाराजांच्या निधनामुळे सुटकेच्या निश्वास घेणाऱ्या औरगंजेबापुढे संभाजी महाराज नवीन आव्हान उभे करतात. मुघलांचे बुऱ्हाणपूर लुटून संभाजी महाराज औरंगजेबाला ललकारतात. आणि तेथून औरंगजेब आणि संभाजी महाराजांमध्ये शह-काटशहाचा खेळ रंगतो. संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेब उत्तरेतून दक्षिणेकडे कूच करतो. मात्र आपल्या मावळ्यांच्या मदतीने संभाजी महाराज औरंगजेबाच्या सैन्याला सळो की पळो करून सोडतात. आणि मग नेहमी होते तसे घरचेच गद्दार शत्रूला सामील होतात आणि संभाजी महाराजांना मुघलांची सेना कैद करतो.

शिवाजी महाराजांविरुद्ध असलेले शत्रुत्व आणि संभाजी महाराजांनी नाकी नऊ आणल्याने संतापलेला औरंगजेब मग संभाजी महाराजांचा अतोनात क्रूर छळ करतो, मात्र हा छळ संभाजी महाराजा हस्त-हसत सहन करतात त्यामुळे औरंगजेब आणखी चिडतो, संतापतो, त्रस्त होतो.

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपट कशा पद्धतीने चित्रित करायचा आहे हे अगोदरच ठरवलेले होते आणि त्यानुसारच त्यांनी पटकथेची मांडणी केली आणि अगदी तसेच चित्रिकरण केले. संभाजी महाराजांचे शौर्य त्यांनी अगदी उत्कृष्टरित्या सध्याच्या प्रेक्षकांना रुचेल आणि पटेल अशा पद्धतीने सादर केले आहे. चित्रपटाची शेवटची २० मिनिटे उतेकर प्रेक्षकांना खुर्चीत चुळबूळ करण्याचीही संधी देत नाहीत. चित्रपट संपतो तेव्हा प्रेक्षक महाराजांविषयीचे प्रेम स्वतःच्या हृदयात अधिक वाढवून डोळे पुसतच बाहेर पडतो. काही क्षण तर सुन्ही होतो. आणि येथेच उतेकर बाजी जिंकले.

उतेकरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कलाकारांची निवड. औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाची निवड करणे हा एक अत्यंत योग्य  आणि स्तुत्य निर्णय. अक्षय खन्नाने औरंगजेब खऱ्या अर्थाने पडद्यावर जिवंत केलाय. आयुष्याच्या उताराला लागलेल्या औरंगजेबाची चिडचिड. संताप, क्रौर्य त्याने मोजक्याच घटनांमधून प्रखरपणे दाखवले आहे. कोठेही आरडाओरडा न करता शांतपणे त्याने क्रौर्य दाखवले आहे. म्हातारपणी औरंगजेब असाच असू शकेल असे वाटते. अक्षय खन्ना एक चांगला अभिनेता आहे मात्र त्याला त्याची क्षमता दाखवणारे चित्रपट मिळाले नाहीत असे हा चित्रपट पाहून वाटते.

दक्षिणेची अभिनेत्री रश्मिका मंदानाने संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. संभाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टीत येसूबाई त्यांना पदोपदी साथ देत असतात. स्वराज्याची लढाई सोपी नाही हे येसूबाईंनाही माहित असते, कधीही काहीही होऊ शकते, मात्र प्रत्येक वेळी संभाजी महाराजांचे मनोबल आणखी वाढवण्याचा प्रयत्न करणारी येसूबाई रश्मिकाने चांगल्या प्रकारे साकारली आहे. शेवटी राजाराम महाराजांना गादीवर बसवतानाचा खंबीरपणाही रश्मिकाने चांगल्या पद्धतीने दाखवला आहे. संभाजी महाराज आणि येसूबाई यांच्यातील प्रसंगांची मांडणी चांगल्या पद्धतीने करण्यात आली आहे.

आणि विकी कौशल. संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलने कमाल केली आहे. खरे संभाजी महाराज असे असू शकतील असे वाटते. कोणत्याही भूमिकेत स्वतःला अक्षरशः झोकून देणे काय असते हे विकी कौशलने सरदार उधम सिंह, सॅम माणेकशा यांच्या भूमिका साकारताना दाखवून दिले होते. या चित्रपटात तर तो एक पाऊल आणखी पुढे गेलाय आणि संभाजी महाराजांना पडद्यावर जीवंत केलेय. संभाजी महाराजांचे शौर्य दाखवतानाच त्याने संभाजी महाराजांमधील एक पिता आणि पतीही उत्कृष्टरित्या दाखवला आहे. लढाईच्या दृश्यांमध्ये तर त्याने कमालच केली आहे. चित्रपटाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट विकी कौशल आहे.

अन्य  भूमिकांमध्ये दिव्या दत्ता (सोयराबाई), आशुतोष राणा (सरदार हंबीरराव), विनीत सिंह (कवी कलश), नील भूपलम (अकबर), डायना पेंटी (झीनत), प्रदीप सिंह (येसाजी कंक), संतोष जुवेकर (रायाजी), किरण करमरकर (अण्णाजी), सारंग साठ्ये (गणोजी), सुव्रत जोशी (कान्होजी) यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका उत्कृष्टपणे साकारल्या आहेत

ए.आर.रहमानचे संगीत काही विशेष आहे असे म्हणता येणार नाही. आया रे तूफान गाण्यासह प्रत्येक लढाईच्या वेळेचे गाणे स्फूरण चढवणारे आहे. पार्श्वसंगीत काही ठिकाणी खूपच चांगले आहे, विशेषतः औरंगजेबाच्या एंट्रीवेळचे, मात्र काही ठिकाणी ते कानठळ्या बसवणारे झाले आहे.

एकूणच छावा हा चित्रपट प्रत्येकाने पाहिला पाहिजे असे माजे स्वतःचे मत आहे. लक्ष्मण उतेकरांनी संभाजी महाराजांची गाथा हिंदीत सादर करून संभाजी महाराजांना जगभरात नेण्याचे मोलाचे काम केले आहे त्याला आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे.

View More
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जग सोडून जातोय, कधीतरी दोन शब्द प्रेमाचे बोलली असतीस तर, दुसरं लग्न कर, मुलांची काळजी दादा वहिनी घेतील' हसत हसत मरेन म्हणणाऱ्या कॉन्स्टेबलच्या चिट्टीनं काळीज चिरलं
'जग सोडून जातोय, कधीतरी दोन शब्द प्रेमाचे बोलली असतीस तर, दुसरं लग्न कर, मुलांची काळजी दादा वहिनी घेतील' हसत हसत मरेन म्हणणाऱ्या कॉन्स्टेबलच्या चिट्टीनं काळीज चिरलं
Rupee Hits Low: रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला, गेल्या 79 वर्षात घडू नये ते घडलं; चालू वर्षात तब्बल 5 टक्के घसरणीसह नव्वदी पार गेला
रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला, गेल्या 79 वर्षात घडू नये ते घडलं; चालू वर्षात तब्बल 5 टक्के घसरणीसह नव्वदी पार गेला
Indigo Airlines: इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले
इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले
शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पण पार्थ पवारवर 1800 कोटींची सरकारी जमीन खाऊनही कारवाई होत नाही, एफआयआरमध्ये नाव नाही; अंजली दमानियांचा संतापाचा उद्रेक
शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पण पार्थ पवारवर 1800 कोटींची सरकारी जमीन खाऊनही कारवाई होत नाही, एफआयआरमध्ये नाव नाही; अंजली दमानियांचा संतापाचा उद्रेक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MRI City scan News : गेल्या 3 आठवड्यांपासून MRI, CT स्कॅन, एक्स रे सेंटर्स बंद
IAS Fake Officer : बोगस IAS अधिकाऱ्यांच्या जाळ्यात बडे मासे Chhatrapati Sambhajinagar Special Report
Nashik Tapovan Tree Cutting : कुंभमेळा आणि तपोवन, महायुतीत राजकारण Special Report
Maharashtra Flood Help : अतिवृष्टी अहवाल...खरं कोण, खोटं कोण? Special Report
Amruta Fadnavis On Devendra Fadnavis : युतीचा घटस्फोट, नवा गोप्यस्फोट Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जग सोडून जातोय, कधीतरी दोन शब्द प्रेमाचे बोलली असतीस तर, दुसरं लग्न कर, मुलांची काळजी दादा वहिनी घेतील' हसत हसत मरेन म्हणणाऱ्या कॉन्स्टेबलच्या चिट्टीनं काळीज चिरलं
'जग सोडून जातोय, कधीतरी दोन शब्द प्रेमाचे बोलली असतीस तर, दुसरं लग्न कर, मुलांची काळजी दादा वहिनी घेतील' हसत हसत मरेन म्हणणाऱ्या कॉन्स्टेबलच्या चिट्टीनं काळीज चिरलं
Rupee Hits Low: रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला, गेल्या 79 वर्षात घडू नये ते घडलं; चालू वर्षात तब्बल 5 टक्के घसरणीसह नव्वदी पार गेला
रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला, गेल्या 79 वर्षात घडू नये ते घडलं; चालू वर्षात तब्बल 5 टक्के घसरणीसह नव्वदी पार गेला
Indigo Airlines: इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले
इंडिगोची 200 उड्डाणे रद्द, पुणे, मुंबई विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती; हजारो प्रवासी अडकले, लेकरा बाळांसह विमानतळावरच झोपले
शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पण पार्थ पवारवर 1800 कोटींची सरकारी जमीन खाऊनही कारवाई होत नाही, एफआयआरमध्ये नाव नाही; अंजली दमानियांचा संतापाचा उद्रेक
शीतल तेजवानीची अटक फक्त दिखावा, पण पार्थ पवारवर 1800 कोटींची सरकारी जमीन खाऊनही कारवाई होत नाही, एफआयआरमध्ये नाव नाही; अंजली दमानियांचा संतापाचा उद्रेक
IND vs SA 2nd ODI Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 358 धावांचा डोंगर, पण 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 358 धावांचा डोंगर, पण 5 खेळाडूंमुळे टीम इंडियाचा पराभव
Parth Pawar Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी; पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांची कसून चौकशी; पार्थ पवारांवरही अटकेची टांगती तलवार
Pune News: आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
Land Scam Pune Who Is Sheetal Tejwani: पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहारातील मोठा मासा; पोलिसांकडून अटक, जमीन विकणारी शीतल तेजवानी कोण?
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहारातील मोठा मासा; जमीन विकणारी शीतल तेजवानी कोण?
Embed widget