एक्स्प्लोर

Raju Sheti : ...तर तुम्हाला शेतकरी मातीत घातल्याशिवाय राहणार नाही; कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावल्याने राजू शेट्टींचा हल्लाबोल

जेव्हा शेतीमालाचे भाव वाढतात, शेतकऱ्यांना चार पैसे मिळवण्याची वेळ येते जेव्हा तेव्हा केंद्र सरकार अशा प्रकारचे कायदे करून शेतकऱ्याला खड्ड्यात घालते, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

कोल्हापूर : कांद्याला दर मिळू लागल्यानंतर मोदी सरकारने पुन्हा एकदा खेळी करत निर्यातीवर 40 टक्के कर लावत शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. निर्यातीवर कर लावण्यात आल्यानंतर राज्यासह संपूर्ण देशात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोदी सरकारवर घणाघाती प्रहार केला आहे. निर्यातीवर कर लावून कांदा उत्पादक नव्हे, तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची सडकून टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. 

केंद्र सरकार कायदे करून शेतकऱ्याला खड्ड्यात घालते

राजू शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारचे धोरण नवीन नाही. जेव्हा जेव्हा भाव वाढतात, शेतकऱ्यांना चार पैसे मिळवण्याची वेळ येते जेव्हा तेव्हा केंद्र सरकार अशा प्रकारचे कायदे करून शेतकऱ्याला खड्ड्यात घालते. जेव्हा भाव पडतात, तेव्हा मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतात. भाजीपाल्याचे भाव पडले, फ्लाॅवर, कोबी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर फिरवला. सरकारची प्रतिक्रिया काहीच नाही. टोमॅटोचे भाव पडले, रस्त्यावर लाल चिखल झाला त्यांची प्रतिक्रिया काहीच नाही. टोमॅटोचे भाव पाडल्यानंतर नाफेडने खरेदी केला. 

तर शेतकरी मातीत घातल्याशिवाय राहणार नाही

जून महिन्यांमध्ये अतिवृष्टीने कांद्याचे नुकसान झाले. चाळीतला कांदा सडला. सरकारने मात्र बघ्याची भूमिका घेतली. आता चार पैसे मिळतात म्हटल्यानंतर येणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुका आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ग्राहकांना खूष करण्यासाठी म्हणून जर का हा निर्णय घेत असेल तर केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी हे ध्यानात ठेवावं की या देशांमध्ये जवळपास 60 ते 65 टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. तुम्ही भले त्यांना वेगवेगल्या पिकात विभागले असाल पण आता सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात आलं आहे. एक संकटात सापडला आणि दुसरा मदतीला नाही गेला तर सगळ्यांचीच माती होणार आहे. तेव्हा देशभरातील सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलं आहे, मुठभर ग्राहकांसाठी एकेकाला खिंडीत पकडत असाल तर देशभरातील सगळे शेतकरी एकत्र येऊन तुम्हाला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. 

दुसरीकडे, केंद्राने कांद्याचे निर्यात शुल्क वाढवून तब्बल 40 टक्क्यांवर नेल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत. सरकारच्या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीमध्ये घट होणार आहे आणि त्यामुळे पुढील काळामध्ये किरकोळ बाजारामध्ये कांद्याचे दर घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणूनच केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आणि निषेधार्थ आजपासून नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समिती बेमुदत काळासाठी बंद राहणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
Liquor Ban Protest : दारूमुळं गाव बिघडलं! दारू दुकान बंद करा, नाहीतर लग्नंही होणार नाहीत; महिलांचा संताप, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
दारूमुळं गाव बिघडलं! दारू दुकान बंद करा, नाहीतर लग्नंही होणार नाहीत; महिलांचा संताप, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Kalburgi Crime News: बायकोला मार मार मारलं, मग गाडीखाली झोपवून अंगावरुन फिरवली, फिरायला गेलेल्या दाम्पत्याच्या वादाने टोक गाठलं, हादरवणारी घटना
बायकोला मार मार मारलं, मग गाडीखाली झोपवून अंगावरुन फिरवली, फिरायला गेलेल्या दाम्पत्याच्या वादाने टोक गाठलं, हादरवणारी घटना
Dr. Jaysingrao Pawar : आधुनिक महाराष्ट्राचा वैचारिक कणा जपत समस्त बहुजनांच्या मराठेशाहीचा धगधगता इतिहास मांडणारे, शाहू महाराजांच्या कार्याचा जागतिक प्रसार करणारा अनभिषिक्त सम्राट
डॉ. जयसिंगराव पवार: आधुनिक महाराष्ट्राचा वैचारिक कणा जपत समस्त बहुजनांच्या मराठेशाहीचा धगधगता इतिहास मांडणारे, शाहू महाराजांच्या कार्याचा जागतिक प्रसार करणारा अनभिषिक्त सम्राट

व्हिडीओ

Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Houthi Rebels : कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
US-Iran War : पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
Kerosene : 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, परवानगी किती दिवसांसाठी?
21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय,परवानगी किती दिवसांसाठी?
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
Embed widget