एक्स्प्लोर

Raju Shetti on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची मशाल हाती का घेतली नाही? 'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टींनी स्पष्ट केला खुलासा 

शेतकऱ्यांचा आवाज, सामान्यांचा आवाज, गोरगरिबांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवायचा जबाबदारी आता सर्वसामान्य लोकांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी गावातल्या लोकांनी घेतली पाहिजे, असे राजू शेट्टी म्हणाले.

कोल्हापूर : निवडणूक लढवायला सोपं जावं म्हणून स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाच्या वतीनेच मी निवडणूक लढवत आलो. आता मी राजकीय फायद्यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून, संघटनेला वाऱ्यावर सोडून मी ही निवडणूक लढवू शकत नाही आणि त्यामुळे मी मशाल चिन्ह घेणार नाही असं ठाकरे यांना कळवल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी म्हटले आहे. हातकणंगलेतून (Hatkanangle Lok Sabha) ठाकरे गटातून सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शेट्टी म्हणाले की, हातकणंगलेतून ठाकरेंकडून उमेदवार जाहीर केला आहे. तो त्यांचा निर्णय आहे. परंतु स्वतंत्र लढायची भूमिका मी पहिल्यापासूनच घेतली होती. आता त्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आवाज, सामान्यांचा आवाज, गोरगरिबांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवायचा जबाबदारी आता सर्वसामान्य लोकांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी गावातल्या लोकांनी घेतली पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी आता ही निवडणूक हातात घ्या आणि आपण लढू आणि आपण जिंकू अशी खात्री असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 

म्हणून महाविकास आघाडी सोडली 

शेट्टी यांनी सांगितले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना 2021 मध्येच महाविकास आघाडीतून बाहेर पडली होती आणि त्याचं कारण तीन तुकड्यांमध्ये केलेली एफआरपी आणि भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांवर फिरवलेला वरवंटा या दोन धोरणात्मक बाबीला विरोध म्हणून आम्ही महाविकास आघाडी सोडली होती. त्यानंतर राज्य कार्यकारिणीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाशी अधीन राहून गेल्या तीन वर्षापासून लोकसभेच्या स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारी आम्ही केली होती. 

परंतु अचानक काय झालं मला माहिती नाही. 

मधल्या काळामध्ये भाजपच्या विरोधातील मतविभागणी टाळण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा, असा विचार काही लोकांनी मांडला होता. महाविकास आघाडीचे नेते सातत्याने हातकणंगलेमध्ये आम्ही उमेदवार देणार नाही, जागा स्वाभिमानीला सोडणार असे म्हणत होते. त्यामुळे आम्ही आघाडीत येणार नाही परंतु तिथं उमेदवार उभा केला नाहीत, तर निश्चितच भाजपविरोधातील मतविभागणी टाळता येईल अशी भूमिका घेऊन दोनवेळा मी उद्धवजींना भेटलो होतो, असे त्यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, बरीच सविस्तर चर्चा झाली होती आणि त्यांना काही अंशी ते पटलेलं सुद्धा होतं. लवकरच आम्ही निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं. परंतु अचानक काय झालं मला माहिती नाही. परंतु त्यांच्याकडून मशाल चिन्हावर लढले पाहिजे, असा निरोप आला. आता मशाल चिन्ह हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळालेलं आहे आणि ते चिन्ह घेणं याचा अर्थ मी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असा होता. गेली 30 वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षांमध्ये काम केलेले नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : सातत्यानं ऊस घेतल्याचं परिणाम दिसले, जमिनी नापीक होणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे, शरद पवारांचं कोल्हापूरमध्ये महत्त्वाचं वक्तव्य
सातत्यानं ऊस घेतल्याचं परिणाम दिसले, जमिनी नापीक होणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे : शरद पवार
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
धक्कादायक! 40 फूट दरीत कार कोसळून भीषण अपघात, कोल्हापूरच्या शिरोलीत एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी
धक्कादायक! 40 फूट दरीत कार कोसळून भीषण अपघात, कोल्हापूरच्या शिरोलीत एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
छगन भुजबळांनी दिल्लीत जाण्यासाठी ती अट घालताच भाजपची सपशेल नकारघंटा अन् राजेंद्र जैन यांना लाॅटरी! राज्यसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीत काय काय घडलं?
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
Embed widget