एक्स्प्लोर

Uddhav Thackeray on Raju Shetti : राजू शेट्टींनी मातोश्रीवर दोनवेळा भेट घेऊनही हातकणंगलेत उमेदवार का दिला? उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये वाद-विवाद सुरू असतानाच आता आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये राजू शेट्टी यांनी पाठिंबा मागूनही ठाकरे यांनी न देता थेट उमेदवार जाहीर केला आहे.

कोल्हापूर : महाविकास आघाडीमध्ये अत्यंत कळीचा मुद्दा झालेल्या हातकणंगले (Hatkanangale) आणि सांगली (Sangli) लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये वाद-विवाद सुरू असतानाच आता आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये राजू शेट्टी यांनी पाठिंबा मागूनही ठाकरे यांनी न देता थेट उमेदवार जाहीर केला आहे. ठाकरे गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता हातकणंगलेची लढत चौरंगी लढत होणार आहे, तर सांगलीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील हेच राहण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी कडाडून विरोध करूनही काँग्रेस उच्चस्तरीय नेत्यांनी आता सबुरीचा सल्ला दिल्याने जवळपास त्यांचा विरोध मावळल्यात जमा आहे. त्यामुळे वंचितनंतर आता राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष महाविकास आघाडीपासून दूर गेले आहेत.  

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतेचे उमेदवार म्हणून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र माने यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध सुरूच आहे. इतकेच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून त्यांची उमेदवारी रद्द केली जाणार अशी सुद्धा चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून कोणती भूमिका घेतली जाणार? याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती लक्षात घेता राजू शेट्टी यांनी दोनवेळा मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की राजू शेट्टी यांच्यासोबत आमची बोलणी फिस्कटली नाहीत. हातकणंगले हा शिवसेनेचा मतदार संघ आहे. 2019 मध्ये शिवसेनेचा उमेदवार याठिकाणी विजयी झाला होता. कोल्हापूरची जागा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी सोडल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणित पाहता आम्हाला उमेदवार देण्यात यावा अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र राजू शेट्टी यांना आम्ही पाठिंबा देऊ म्हटलं होतं. मात्र, त्यांनी मशाल चिन्हावर लढावे असा प्रस्ताव त्यांना दिला होता. दुसरी जागा सुद्धा जागा सोडल्यास शिवसैनिकांची नाराजी पाढेल याची शक्यता होती. त्यामुळे हातकणंगले आणि सांगली लढण्याचा निर्णय घेतला. 

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत म्हणाले की, राजू शेट्टी यांच्या कामाविषयी स्पष्ट भूमिका होती. शेतकऱ्यांबद्दल ते काम करत आहेत. 2019 मध्ये राजू शेट्टी यांचा पराभव शिवसेनेच्या उमेदवाराने केला. आम्ही पाठिंबा द्यावा, अशी राजू शेट्टी यांची भूमिका होती. मात्र,  पदाधिकाऱ्यांची भूमिका मशाल चिन्हावरच शिवसेनेचा उमेदवार असावा, अशी होती. आम्ही राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव दिला होता व मशाल चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यांनी विचार करून उत्तर देऊ असे सांगितले होते. त्यांनी नकार दिल्याने शाहुवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी दिली आहे. आम्ही  शेवटपर्यंत त्यांना महाविकास आघाडीतून येण्याची विनंती केली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget