Kolhapur News: तुटलेल्या विजेच्या तारेच्या धक्क्याने मायलेकराचा जागीच मृत्यू; पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथील दुर्दैवी घटना
Kolhapur Crime: आजूबाजूच्या लोकांनी प्रसंग पाहून आरडाओरडा केल्यानंतर माय लेकरांच्या दुर्दैवी मृत्यूची घटना कळाली. एमएसईबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
![Kolhapur News: तुटलेल्या विजेच्या तारेच्या धक्क्याने मायलेकराचा जागीच मृत्यू; पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथील दुर्दैवी घटना mother and her son died on the spot after being struck by a broken power line incident at Nebapur in Panhala taluka kolhapur Kolhapur News: तुटलेल्या विजेच्या तारेच्या धक्क्याने मायलेकराचा जागीच मृत्यू; पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथील दुर्दैवी घटना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/4fedcaa51cfe8b416cf14d4c5f9ccbe11688035495663736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) पन्हाळा तालुक्यातील (Panhala) नेबापूरमध्ये शेतामधील तुटलेल्या वीजेच्या तारेचा स्पर्श होऊन माय लेकरांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. शेतात मुलगा नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी गेल्यानंतर परत न आल्याने त्या आई पाहण्यासाठी गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नंदा गुंगा मगदूम आणि आणि त्यांचा मुलगा अजिंक्य गुंगा मगदूम अशी जागीच मृत्यूमुखी पडलेल्या मायलेकरांची नावे आहेत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अजय नेहमी सकाळच्या सुमारास शेतात जातो. नेहमीच्या सवयीने तो आजही शेतात कामासाठी सकाळी सातच्या सुमारास गेला होता. तासभर काम करून घरी परतणारा मुलगा अजय अजून कसा घरी परतला नाही? या चिंतेत असलेल्या आईने मुलगा फोन केला. मात्र, फोन न उचलल्याने त्या पाहण्यासाठी शेतात गेल्या. शेतात अजय पडल्याचे दिसून आल्यानंतर आई नंदा यांनी अजयला उचलण्याच्या नादात स्पर्श केला असावा आणि त्यांनाही वीजेचा धक्का बसला. मंगळवार पेठ, पन्हाळामध्ये जामदडकी शेतात हा प्रसंग घडला.
आजूबाजूच्या लोकांनी प्रसंग पाहून आरडाओरडा केल्यानंतर माय लेकरांच्या दुर्दैवी मृत्यूची घटना कळाली. एमएसईबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पन्हाळा पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला.
आई गेल्याचं समजताच मुलानंही दुसऱ्याच दिवशी जीव सोडला
दरम्यान, आईचा कृष्णा नदीत पुजनासाठी गेल्यानंतर बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुलाने दुसऱ्याच दिवशी जीव सोडल्याची हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी गावामध्ये 15 दिवसांपूर्वी घडली होती. गोपाळ खंडू पाटील असे त्यांचे नाव आहे.
गोपाळ पाटील यांच्या आई बाबाई खंडू पाटील या कृष्णा नदीमध्ये धार्मिक विधी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आंघोळ करताना त्या नदीत बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर गोपाळ यांना मानसिक धक्का बसला. त्यामुळे उपचार सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी त्यांचेही निधन झाले. ते डेंग्यूसदृश आजाराने आजारी असल्याने सांगलीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरु असतानाच त्यांच्या कानावर आईच्या निधनाची बातमी आल्यानंतर पहाटे त्यांचाही मृत्यू झाला. माय लेकरांचा मृत्यू अवघ्या काही तासांच्या अंतरावर झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)